ंमुंबई, ता. 26 : "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती'च्या विधिमंडळ गटनेतेपदी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे विद्यमान आमदार गणपतराव देशमुख यांची निवड होण्याची शक्यता आहे. "रिडालोस'च्या घटक पक्षांची उद्या (ता. 27) मुंबईत गटनेता निवडीसाठी बैठक होणार असून, यामध्ये देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची होणार आहे.
विधानसभेच्या 248 जागा लढविणाऱ्या रिडालोसला 11 जागांवर विजय मिळाला. यामध्ये समाजवादी पक्षाच्या तीन, शेतकरी कामगार पक्षाच्या चार, राष्ट्रीय समाज पक्षाची एक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, माकप यांच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. अन्य दोन जागांवर समितीने पाठिंबा दिलेले अपक्ष निवडून आले आहेत. गणपतराव देशमुख गेली 37 वर्षे विधिमंडळात निवडून आले आहेत. विधिमंडळात लोकांच्या प्रश्नावर त्यांची मुलूखमैदान तोफ धडाडली आहे. 1967 मध्ये ते आमदार झाले. 1995 ते 99 हा कालावधी वगळता ते आजपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात निवडुन आले आहेत. एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे गणपतराव देशमुख यांचेच नाव गटनेतेपदासाठी आघाडीवर आहे. रिडालोसच्या घटक पक्षात सर्वात जास्त जागा शेकापने पटकावल्या असल्याने गटनेतेपद शेकापकडे राहण्याची शक्यता आहे.
चौकट
रिडालोसला 30 लाख 70 हजार मते
अठरा घटक पक्षांच्या रिडालोसच्या बाजूने राज्यातील 30 लाख 70 हजार 34 मतदारांनी मतदान केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सपाला 0.74 टक्के, माकपला 0.60 टक्के, जनता दल सेक्युलरला 0.19 टक्के, भाकपला 0.14 टक्के मते मिळाली आहेत.
-------------------
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment