रिडालोस तोंडघशी? 15 नावांची घोषणा
मुंबई, ता. 21 : रिपब्लिकन डाव्या लोकशाही समितीचा घटक पक्ष असलेल्या भाकपने विधानसभा निवडणुकीसाठी आज 15 उमेदवारांची घोषणा केली. यवतमाळच्या कलावती बांदूरकर यांना रिडालोसने काल पाठिंबा जाहीर करीत वणी मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शविली होती; मात्र भाकपने येथून कॉ. अनिल घाटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने रिडालोसच्या नेत्यांवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.
यवतमाळमधील वणी मतदारसंघ विदर्भ जनआंदोलन समितीच्या पाठिंब्यावर उभ्या राहणाऱ्या कलावती बांदूरकर यांना देण्यास तयार असल्याचे रिडालोसच्या नेत्यांनी काल जाहीर केले होते. रविवारी घाईघाईत त्यांना नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला. वणी मतदारसंघ कलावतींसाठी सोडण्याची विनंती "भाकप'ला करू, अशी ग्वाही नेत्यांनी दिली होती; मात्र आज भाकपने वणीतून कॉ. अनिल घाटे यांना उमेदवारी जाहीर करून रिडालोस नेत्यांना तोंडघशी पाडले. कलावती यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कॉंग्रेसवर गोळी झाडण्याच्या प्रयत्नात असलेल्या "रिडालोस'च्या नेत्यांना त्यामुळे चपराक बसली असून आता ते काय भूमिका घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत रिडालोस नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की अजून आमची "भाकप'शी चर्चा झालेली नाही; मात्र या प्रश्नी तोडगा काढला जाईल.
भाकपचे आज जाहीर झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे : धामणगाव- तुकाराम भस्मे, तिवसा- साबीर हुसेन, आर्वी- प्रा. राजू गोरडे, साकोली- चंद्रशेखर टेंभुर्णी, औरंगाबाद मध्य- अशफाक सलामी, शेवगाव- ऍड. सुभाष लांडे, भोसरी कॉ. सुकुमार दामले, चोपडा- मधुकर साळुंखे, शिरपूर- रामचंद्र पावरा, कोल्हापूर शहर- दिलीप पवार, पलूस-कडेगाव- डॉ. श्रीकांत जाधव, डोंबिवली- काळू कोमास्कर, चारकोप- अखिलेश गौड, शिवडी- कॉ. नारायण घागरे.
Wednesday, December 23, 2009
पक्षाच्या यशासाठी "त्यांनी' त्यागली पादत्राणे!
ंमुंबई, ता. 3 : सत्ता आणि पैसा यांच्याभोवती फिरणाऱ्या राजकारणात निष्ठावंत कार्यकर्ते दुर्मिळ झालेले असतानाच, मुंबईतील एका शिवसैनिकाने व मनसैनिकाने आपापल्या पक्षाच्या यशासाठी अनवाणी फिरण्याची प्रतिज्ञा करून अद्यापही पक्षनिष्ठेची बेटं कायम असल्याचे दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीतील यशासाठी अनेक उमेदवारांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत, तर दुसऱ्या बाजूला निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नवस आणि प्रतिज्ञांचे अस्त्र घेऊन स्वतःला निवडणुकीच्या रणसंग्रामात झोकून दिले आहे.
शिवसेनेचे वरळी शाखाप्रमुख अरविंद भोसले यांनी, नारायण राणे यांचा पराभव झाल्याशिवाय पादत्राणे घालणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञाच केली आहे. महसूलमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला आव्हान देत केलेली बंडखोरी त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांनी सांगितले, की ""कणकवलीच्या पोटनिवडणुकीत राणे यांच्या दहशतीचा सामना मी केला. त्यांची दहशत संपविण्याची शपथ मी घेतली आहे''.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मला नगरसेवकपदाची उमेदवारी देऊ केली होती; पण मी ती नाकारली. गेली दोन वर्षे मी अनवाणी फिरत आहे. माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मी कणकवलीचे तालुका संपर्कप्रमुखपद पक्षाकडे मागून घेतले.'' या वेळी कुडाळमध्ये राणे यांचा पराभव होईल आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण होईल, अशी आशा भोसले व्यक्त करतात.
घाटकोपर येथील तृतीय पंथीयांच्या संघटनेचे अध्यक्ष जतिन यांनी, मनसेची सत्ता येईपर्यंत अनवाणी राहण्याची शपथ घेतली आहे. घाटकोपर (पश्चिम) येथील भटवाडीलगत राहणाऱ्या जतिन आणि त्यांचे गुरू रवींद्र साळवे यांना राज ठाकरे यांच्या मनसेची सत्ता यावी, असे मनोमन वाटते. जतिन यांनी राज यांची भेट घेऊन तृतीयपंथी आणि देवदासी यांच्या समस्या मांडल्या होत्या. जतीन सांगतात, की देवदासींना मासिक वेतन, रेशनकार्ड, मतदानाचा अधिकार देण्याचे आश्वासन राज यांनी दिले आहे. त्यामुळेच मनसेची सत्ता यावी, अशी आमची इच्छा आहे. आदिमाया शक्तीला यासाठी साकडे घातले असून, मनसेची सत्ता येईपर्यंत देवीला अभिषेक करणार नाही आणि पादत्राणे घालणार नाही, अशी प्रतिज्ञा या नवरात्रोत्सवात आपण केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
..............................
शिवसेनेचे वरळी शाखाप्रमुख अरविंद भोसले यांनी, नारायण राणे यांचा पराभव झाल्याशिवाय पादत्राणे घालणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञाच केली आहे. महसूलमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला आव्हान देत केलेली बंडखोरी त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांनी सांगितले, की ""कणकवलीच्या पोटनिवडणुकीत राणे यांच्या दहशतीचा सामना मी केला. त्यांची दहशत संपविण्याची शपथ मी घेतली आहे''.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मला नगरसेवकपदाची उमेदवारी देऊ केली होती; पण मी ती नाकारली. गेली दोन वर्षे मी अनवाणी फिरत आहे. माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मी कणकवलीचे तालुका संपर्कप्रमुखपद पक्षाकडे मागून घेतले.'' या वेळी कुडाळमध्ये राणे यांचा पराभव होईल आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण होईल, अशी आशा भोसले व्यक्त करतात.
घाटकोपर येथील तृतीय पंथीयांच्या संघटनेचे अध्यक्ष जतिन यांनी, मनसेची सत्ता येईपर्यंत अनवाणी राहण्याची शपथ घेतली आहे. घाटकोपर (पश्चिम) येथील भटवाडीलगत राहणाऱ्या जतिन आणि त्यांचे गुरू रवींद्र साळवे यांना राज ठाकरे यांच्या मनसेची सत्ता यावी, असे मनोमन वाटते. जतिन यांनी राज यांची भेट घेऊन तृतीयपंथी आणि देवदासी यांच्या समस्या मांडल्या होत्या. जतीन सांगतात, की देवदासींना मासिक वेतन, रेशनकार्ड, मतदानाचा अधिकार देण्याचे आश्वासन राज यांनी दिले आहे. त्यामुळेच मनसेची सत्ता यावी, अशी आमची इच्छा आहे. आदिमाया शक्तीला यासाठी साकडे घातले असून, मनसेची सत्ता येईपर्यंत देवीला अभिषेक करणार नाही आणि पादत्राणे घालणार नाही, अशी प्रतिज्ञा या नवरात्रोत्सवात आपण केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
..............................
आमदार बशीर पटेल यांचा राष्ट्रवादीला रामराम
मुंबई, ता. 24 : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर आमदार बशीर पटेल यांनी आज नाट्यमय घडामोडींनंतर समाजवादी पक्षात प्रवेश केला असून समाजवादी पक्षातर्फे त्यांनी मुंबादेवी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, "सपा'चे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी 17 उमेदवारांची आज घोषणा केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमरखाडी येथील आमदार बशीर पटेल यांच्या मतदारसंघात पुनर्रचनेनंतर मोठा फेरबदल झाल्याने लगतच्या मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती; मात्र त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी न मिळाल्याने बंडाचे निशाण फडकावत ते "सपा'त दाखल झाले आहेत. कॉंग्रेसशी आघाडी असताना मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या बशीर पटेल यांच्याऐवजी नवाब मलिक मंत्री झाल्याने नाराज झालेल्या पटेल यांनी समाजवादी पक्षाला अलविदा करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता; मात्र या वेळी जागावाटपात उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पुन्हा पक्ष बदलला आहे. मुंबादेवी मतदारसंघातून आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते आता तिसऱ्या आघाडीच्या पाठिंब्यावर लढणार आहेत.
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी बशीर पटेल यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. आमदार पटेल मात्र या वेळी उपस्थित नव्हते. आझमी यांनी "सपा'च्या 17 उमेदवारांची घोषणा केली. उमेदवार पुढीलप्रमाणे : नवापूर- संजय गवळी, सिंदखेड- विजयसिंग राजपूत, बाळापूर- डॉ. सुधीर ढोले, रिसोड- शिवा बंगी, मालेगाव- चंद्रशेखर देवरे, नाशिक मध्य- सय्यद मुशीर, कोपरी- पाचपाखाडी- रामनारायण यादव, दिंडोशी- श्रीकांत मिश्रा, वर्सोवा- चंगेश मुलतानी, कालिना- अहमद आझमी, वांद्रे (पश्चिम)- रिझवान मर्चंट, वांद्रे (पूर्व)- शब्बीर हुसेन, भायखळा- सर्फराज आरजू, मुंबादेवी- बशीर पटेल, इंदापूर- वसंत मोरे, चिंचवड- राम शरमाळे, कसबा पेठ- अनिल अहमद यांना उमेदवारी देण्यात आली असून उर्वरित उमेदवारांची घोषणा उद्या (ता. 25) करण्यात येणार असल्याचे आझमी यांनी सांगितले.
कॉंग्रेस आघाडी सरकारने अल्पसंख्याक दलितांवर अन्याय केला आहे. त्याचा जाब राज्यातील जनता कॉंग्रेसला निवडणुकीत विचारेल, असा विश्वास अबू आझमी यांनी व्यक्त केला.
.......
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमरखाडी येथील आमदार बशीर पटेल यांच्या मतदारसंघात पुनर्रचनेनंतर मोठा फेरबदल झाल्याने लगतच्या मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती; मात्र त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी न मिळाल्याने बंडाचे निशाण फडकावत ते "सपा'त दाखल झाले आहेत. कॉंग्रेसशी आघाडी असताना मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या बशीर पटेल यांच्याऐवजी नवाब मलिक मंत्री झाल्याने नाराज झालेल्या पटेल यांनी समाजवादी पक्षाला अलविदा करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता; मात्र या वेळी जागावाटपात उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पुन्हा पक्ष बदलला आहे. मुंबादेवी मतदारसंघातून आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते आता तिसऱ्या आघाडीच्या पाठिंब्यावर लढणार आहेत.
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी बशीर पटेल यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. आमदार पटेल मात्र या वेळी उपस्थित नव्हते. आझमी यांनी "सपा'च्या 17 उमेदवारांची घोषणा केली. उमेदवार पुढीलप्रमाणे : नवापूर- संजय गवळी, सिंदखेड- विजयसिंग राजपूत, बाळापूर- डॉ. सुधीर ढोले, रिसोड- शिवा बंगी, मालेगाव- चंद्रशेखर देवरे, नाशिक मध्य- सय्यद मुशीर, कोपरी- पाचपाखाडी- रामनारायण यादव, दिंडोशी- श्रीकांत मिश्रा, वर्सोवा- चंगेश मुलतानी, कालिना- अहमद आझमी, वांद्रे (पश्चिम)- रिझवान मर्चंट, वांद्रे (पूर्व)- शब्बीर हुसेन, भायखळा- सर्फराज आरजू, मुंबादेवी- बशीर पटेल, इंदापूर- वसंत मोरे, चिंचवड- राम शरमाळे, कसबा पेठ- अनिल अहमद यांना उमेदवारी देण्यात आली असून उर्वरित उमेदवारांची घोषणा उद्या (ता. 25) करण्यात येणार असल्याचे आझमी यांनी सांगितले.
कॉंग्रेस आघाडी सरकारने अल्पसंख्याक दलितांवर अन्याय केला आहे. त्याचा जाब राज्यातील जनता कॉंग्रेसला निवडणुकीत विचारेल, असा विश्वास अबू आझमी यांनी व्यक्त केला.
.......
निपाणीहून बैलगाडी ओढत त्याने मुंबई गाठली
वाळव्यातील तरुण शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन
मुंबई, ता. 18 : "निवडणुका आल्या की सत्ताधारी, राजकारणी शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्यांच्या हिताचा गमजा मारतात; मात्र शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नाही. शेतात जीव ओतूनही हाती काही लागत नाही. शेतकऱ्यांच्या या व्यथेकडे मायबाप सरकारने लक्ष द्यावे "इडा-पिडा टळून बळीचे राज्य यावे', अशी इच्छा आहे ती बैलगाडी ओढत नऊ सप्टेंबरला 9 वाजून 9 मिनिटांनी निपाणीहून निघालेल्या वाळवा येथील साखराळे गावच्या विजय
जाधव या तरुण शेतकऱ्याची. विजय तब्बल नऊ दिवसांचा प्रवास करून आज मुंबईत दाखल झाला.
बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या विजयने गावातच शेती करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला. चार एकर उसाच्या शेतात त्याचे कुटुंब राबते; मात्र शेतात राबूनही हाती काहीच पडत नाही. शेतीचा खर्च वाढता असल्याने व शेतमालाला हमी भाव नसल्याने तोट्याची शेती किती काळ करायची, असा प्रश्न त्याला सतावतोय. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या या दुरवस्थेने व्यथित झालेल्या विजयने सरकारचे आणि शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेच्या सिंहासनावर बसणाऱ्या राजकारण्यांचे डोळे उघडावेत, यासाठी ही अभिनव यात्रा काढली. तंबाखू उत्पादकांच्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडलेल्या निपाणी येथील शेतकऱ्यांच्या स्मारकाला अभिवादन करून विजयने आपल्या प्रवासाला सुरवात केली. दररोज 60 ते 70 कि.मी. गाडी ओढत चालण्याचा विजयने विक्रम केला. नऊ दिवसांत त्याने तब्बल 555 कि.मी. प्रवास केला. एवढ्या प्रवासाने त्याचे पाय सुजले होते. पायाच्या तळव्याला जखमा होऊन त्यातून ओघळणारे रक्तही सुकून गेले. गाडी ओढून खांद्याला जखमा झाल्या; मात्र विजयचा निर्धार तुटला नाही. त्याने मुंबई गाठलीच; मात्र मंत्रालयाकडे जाण्यापासून पोलिसांनीही त्याला रोखून धरले. परिणामी त्याला आझाद मैदानातच बसावे लागले. त्याच्या या यात्रेस महाराष्ट्र शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे.
शेतमालाचे भाव वास्तव उत्पादन खर्चावर आधारित व डॉ. एम. एस. स्वामिनाथन समितीच्या शिफारशीनुसार 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांना मिळावेत, समितीच्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी, सार्वजनिक वितरणव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याने लाभार्थींना थेट सबसिडी द्यावी, शेतकऱ्यांना खतासाठी दिली जाणारी रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी आदी मागण्या विजय जाधव याने कृषी खात्याच्या सचिवाची भेट घेऊन आज केल्या
..........
मुंबई, ता. 18 : "निवडणुका आल्या की सत्ताधारी, राजकारणी शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्यांच्या हिताचा गमजा मारतात; मात्र शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नाही. शेतात जीव ओतूनही हाती काही लागत नाही. शेतकऱ्यांच्या या व्यथेकडे मायबाप सरकारने लक्ष द्यावे "इडा-पिडा टळून बळीचे राज्य यावे', अशी इच्छा आहे ती बैलगाडी ओढत नऊ सप्टेंबरला 9 वाजून 9 मिनिटांनी निपाणीहून निघालेल्या वाळवा येथील साखराळे गावच्या विजय
जाधव या तरुण शेतकऱ्याची. विजय तब्बल नऊ दिवसांचा प्रवास करून आज मुंबईत दाखल झाला.
बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या विजयने गावातच शेती करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला. चार एकर उसाच्या शेतात त्याचे कुटुंब राबते; मात्र शेतात राबूनही हाती काहीच पडत नाही. शेतीचा खर्च वाढता असल्याने व शेतमालाला हमी भाव नसल्याने तोट्याची शेती किती काळ करायची, असा प्रश्न त्याला सतावतोय. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या या दुरवस्थेने व्यथित झालेल्या विजयने सरकारचे आणि शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेच्या सिंहासनावर बसणाऱ्या राजकारण्यांचे डोळे उघडावेत, यासाठी ही अभिनव यात्रा काढली. तंबाखू उत्पादकांच्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडलेल्या निपाणी येथील शेतकऱ्यांच्या स्मारकाला अभिवादन करून विजयने आपल्या प्रवासाला सुरवात केली. दररोज 60 ते 70 कि.मी. गाडी ओढत चालण्याचा विजयने विक्रम केला. नऊ दिवसांत त्याने तब्बल 555 कि.मी. प्रवास केला. एवढ्या प्रवासाने त्याचे पाय सुजले होते. पायाच्या तळव्याला जखमा होऊन त्यातून ओघळणारे रक्तही सुकून गेले. गाडी ओढून खांद्याला जखमा झाल्या; मात्र विजयचा निर्धार तुटला नाही. त्याने मुंबई गाठलीच; मात्र मंत्रालयाकडे जाण्यापासून पोलिसांनीही त्याला रोखून धरले. परिणामी त्याला आझाद मैदानातच बसावे लागले. त्याच्या या यात्रेस महाराष्ट्र शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे.
शेतमालाचे भाव वास्तव उत्पादन खर्चावर आधारित व डॉ. एम. एस. स्वामिनाथन समितीच्या शिफारशीनुसार 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांना मिळावेत, समितीच्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी, सार्वजनिक वितरणव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याने लाभार्थींना थेट सबसिडी द्यावी, शेतकऱ्यांना खतासाठी दिली जाणारी रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी आदी मागण्या विजय जाधव याने कृषी खात्याच्या सचिवाची भेट घेऊन आज केल्या
..........
लोहा मतदारसंघात शह-काटशहाचे राजकारण
प्रताप चिखलीकरांना लोकभारतीची उमेदवारी
मुंबई, ता. 25 : मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विरोधक आणि बंडखोर आमदार प्रताप चिखलीकर यांना लोकभारती पक्षाने लोहा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. लोकभारतीचे आमदार कपिल पाटील केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक असून लोकभारती व चिखलीकरांच्या आडून कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याने आजी मुख्यमंत्र्याला शह दिला आहे.
लोहा येथे आज अशोक चव्हाण यांच्या गाडीवर प्रताप चिखलीकर यांच्या समर्थकांनी दगडफेक केली. विलासराव देशमुख यांचे समर्थक असणारे चिखलीकर लोहातून कॉंग्रेसतर्फे इच्छुक होते; मात्र आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडून चव्हाण यांनी चिखलीकरांचा पत्ता कापल्याची चर्चा आहे. आज लोकभारती पक्षातर्फे चिखलीकर यांनी लोहातून अर्ज दाखल केला. कपिल पाटील व चिखलीकर हे दोन्हीही मोहरे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक असून अशोक चव्हाण यांचे विरोधक आहेत. त्यामुळे लोहातील या राजकारणाला आजी - माजी मुख्यमंत्र्यांतील कुरघोडीचा वास असल्याची चर्चा आहे. लोहातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकरअण्णा धोंडगे लढत आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना स्थानिक पातळीवर शह देण्यासाठी कपिल पाटील यांनी चिखलीकर यांच्या पाठीशी तिसऱ्या आघाडीचे बळ उभे केले आहे. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीतही कपिल पाटील, चिखलीकर या जोडीने चव्हाण यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.
रिपब्लिकन डावी लोकशाही समितीचा घटक पक्ष असणारा लोकभारती 12 जागा लढविणार आहे. पक्षाच्या 12 उमेदवारांची घोषणा कपिल पाटील यांनी केली. प्रताप चिखलीकर आणि वसंत जाधव या कॉंग्रेसच्या दोन बंडखोरांना लोकभारतीचे तिकीट बहाल केले. वसंत जाधव माहीम मतदारसंघातून लढणार आहेत. लोकभारतीतर्फे विक्रोळी - विनोद कांबळी, घाटकोपर (पश्चिम) - शरद कदम, रत्नागिरी - अभिजित हेगशेट्ये, नांदेड उत्तर - श्याम निलंगेकर, भोकरदन - भगवान लहाने, बेलापूर - सुकुमार किल्लेदार, वसई- दत्ता नर, करमाळा - ऍड. आजिनाथ शिंदे, बार्शी - नितीन भोसले, उल्हासनगर - साई बलराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कपबशी चिन्हावर 55 उमेदवार लढणार
स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि लोकभारती हे तिसऱ्या आघाडीतील घटक पक्षांचे 55 उमेदवार "कपबशी' या एकाच चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे लोकभारतीच्या वतीने सांगण्यात आले.
...........
मुंबई, ता. 25 : मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विरोधक आणि बंडखोर आमदार प्रताप चिखलीकर यांना लोकभारती पक्षाने लोहा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. लोकभारतीचे आमदार कपिल पाटील केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक असून लोकभारती व चिखलीकरांच्या आडून कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याने आजी मुख्यमंत्र्याला शह दिला आहे.
लोहा येथे आज अशोक चव्हाण यांच्या गाडीवर प्रताप चिखलीकर यांच्या समर्थकांनी दगडफेक केली. विलासराव देशमुख यांचे समर्थक असणारे चिखलीकर लोहातून कॉंग्रेसतर्फे इच्छुक होते; मात्र आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडून चव्हाण यांनी चिखलीकरांचा पत्ता कापल्याची चर्चा आहे. आज लोकभारती पक्षातर्फे चिखलीकर यांनी लोहातून अर्ज दाखल केला. कपिल पाटील व चिखलीकर हे दोन्हीही मोहरे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक असून अशोक चव्हाण यांचे विरोधक आहेत. त्यामुळे लोहातील या राजकारणाला आजी - माजी मुख्यमंत्र्यांतील कुरघोडीचा वास असल्याची चर्चा आहे. लोहातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकरअण्णा धोंडगे लढत आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना स्थानिक पातळीवर शह देण्यासाठी कपिल पाटील यांनी चिखलीकर यांच्या पाठीशी तिसऱ्या आघाडीचे बळ उभे केले आहे. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीतही कपिल पाटील, चिखलीकर या जोडीने चव्हाण यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.
रिपब्लिकन डावी लोकशाही समितीचा घटक पक्ष असणारा लोकभारती 12 जागा लढविणार आहे. पक्षाच्या 12 उमेदवारांची घोषणा कपिल पाटील यांनी केली. प्रताप चिखलीकर आणि वसंत जाधव या कॉंग्रेसच्या दोन बंडखोरांना लोकभारतीचे तिकीट बहाल केले. वसंत जाधव माहीम मतदारसंघातून लढणार आहेत. लोकभारतीतर्फे विक्रोळी - विनोद कांबळी, घाटकोपर (पश्चिम) - शरद कदम, रत्नागिरी - अभिजित हेगशेट्ये, नांदेड उत्तर - श्याम निलंगेकर, भोकरदन - भगवान लहाने, बेलापूर - सुकुमार किल्लेदार, वसई- दत्ता नर, करमाळा - ऍड. आजिनाथ शिंदे, बार्शी - नितीन भोसले, उल्हासनगर - साई बलराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कपबशी चिन्हावर 55 उमेदवार लढणार
स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि लोकभारती हे तिसऱ्या आघाडीतील घटक पक्षांचे 55 उमेदवार "कपबशी' या एकाच चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे लोकभारतीच्या वतीने सांगण्यात आले.
...........
गद्दारांचो बदला घेवूक कोकणात चला
ंमुंबई, ता. 28 : शिवसेनेचो विश्वासघात करणाऱ्या गद्दारांचो बदलो घेवची आणि बदल घडवूची वेळ इली आसा. शिवसैनिकांनी कोकणात गावाकडे जावून लोकांका जागवूक व्हया, असे आवाहन शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज केले. दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत झालेल्या सिंधुदुर्गवासीय मुंबईकर शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात देण्याचा निर्धार शिवसैनिकांनी या वेळी केला.
कोकणातील गावा-गावातील मतांवर मुंबईकर चाकरमान्यांचा पगडा मोठा असतो. चाकरमान्यांचा शब्द सहसा खाली पडू दिला जात नाही. त्यामुळेच निवडणुका आल्या, की मुंबईतले चाकरमानी क्रियाशील होतात आणि आपल्या गावाशी संपर्क ठेवून असतात. विधानसभा निवडणूक शिवसेनेसाठी कोकणात मोठे आव्हान असल्याने मुंबईकर चाकरमानी सक्रिय झाले आहेत. मुंबईकर शिवसैनिकांनी शिवसेनेला सिंधुदुर्गात पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार केला आहे. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशत संपली आहे. या दहशतीचा पगडा झुगारून शिवसैनिकांनी काम करावे व गद्दाराला धडा शिकवावा, असे आवाहन शिवडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख गजानन चव्हाण यांनी केले.
राणे यांच्या राजकारणाला स्थानिक जनता विटली आहे. कोकणाला उद्ध्वस्त करणारे खाण प्रकल्प आणल्याने लोकांच्या मनात राग आहे. लोकांना जिल्ह्यात बदल हवा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि खुद्द कॉंग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आहेत. या संधीचा फायदा घेऊन राणे यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
नारायण राणे यांच्या विरोधात कुडाळ मतदारसंघातून लढणारे वैभव नाईक व सावंतवाडीचे उमेदवार शिवराम दळवी यांना विजयी करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. या वेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजकारणासाठी राजकारणात
समाजकारणासाठी राजकारणात आलो आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यातील संवेदनशील माणूस पाहिला आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी राजकारणात आलो, असे माहीम येथील शिवसेनेचे उमेदवार अभिनेते आदेश बांदेकर यांनी या वेळी सांगितले. जिथे अन्याय दिसेल तेथे हा आदेश आक्रमक होईल, असे त्यांनी ठासून सांगितले.
-----------------------
कोकणातील गावा-गावातील मतांवर मुंबईकर चाकरमान्यांचा पगडा मोठा असतो. चाकरमान्यांचा शब्द सहसा खाली पडू दिला जात नाही. त्यामुळेच निवडणुका आल्या, की मुंबईतले चाकरमानी क्रियाशील होतात आणि आपल्या गावाशी संपर्क ठेवून असतात. विधानसभा निवडणूक शिवसेनेसाठी कोकणात मोठे आव्हान असल्याने मुंबईकर चाकरमानी सक्रिय झाले आहेत. मुंबईकर शिवसैनिकांनी शिवसेनेला सिंधुदुर्गात पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार केला आहे. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशत संपली आहे. या दहशतीचा पगडा झुगारून शिवसैनिकांनी काम करावे व गद्दाराला धडा शिकवावा, असे आवाहन शिवडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख गजानन चव्हाण यांनी केले.
राणे यांच्या राजकारणाला स्थानिक जनता विटली आहे. कोकणाला उद्ध्वस्त करणारे खाण प्रकल्प आणल्याने लोकांच्या मनात राग आहे. लोकांना जिल्ह्यात बदल हवा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि खुद्द कॉंग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आहेत. या संधीचा फायदा घेऊन राणे यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
नारायण राणे यांच्या विरोधात कुडाळ मतदारसंघातून लढणारे वैभव नाईक व सावंतवाडीचे उमेदवार शिवराम दळवी यांना विजयी करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. या वेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजकारणासाठी राजकारणात
समाजकारणासाठी राजकारणात आलो आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यातील संवेदनशील माणूस पाहिला आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी राजकारणात आलो, असे माहीम येथील शिवसेनेचे उमेदवार अभिनेते आदेश बांदेकर यांनी या वेळी सांगितले. जिथे अन्याय दिसेल तेथे हा आदेश आक्रमक होईल, असे त्यांनी ठासून सांगितले.
-----------------------
आरिफ खान यांना हॅट्ट्रिकची संधी
ंमतदारसंघाच्या पुनर्रचनेत कुर्ला विधानसभा मतदारसंघाचा काही भाग मिळून चांदीवली मतदारसंघ तयार झाला आहे. पवई आय.आय.टी., पंचकुटी, हिरानंदानी, कुर्ला जरीमरी, मिलिंद नगर, असल्फा व्हिलेज आदी भाग या मतदारसंघात येतो. कुर्ला मतदारसंघातून कॉंग्रेसचे आरिफ नसीम खान दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. लोकसभा निवडणुकीतही येथील मतदारांनी कॉंग्रेसच्या पारड्यात मताचे दान भरभरून टाकले होते. हे पाहता, विधानसभा निवडणुकीतही येथे कॉंग्रेसचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेसचे वर्चस्व असणारा कुर्ल्यातील बहुतांश भाग चांदीवली मतदारसंघात समाविष्ट झाला. त्यामुळे या वेळी आरिफ खान यांनी चांदीवलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 2004 च्या निवडणुकीत खान यांना एक लाख 19 हजार 612 मते मिळाली होती. एकूण मतांच्या 55.36 टक्के ही मते होती; तर शिवसेनेच्या दत्ताराम गुजर यांना एकूण मतांच्या 35.69 टक्के मते मिळाली होती. खान यांना या वेळी शिवसेनेच्या दत्ताराम गुजर या पारंपरिक उमेदवाराऐवजी नव्या दमाच्या उमेदवार चित्रा सांगळे यांचा सामना करावा लागणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्थानिक नगरसेवक दिलीप लांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला चांदीवलीत 25 हजार 368 मते मिळाली होती. शिवसेना-भाजप युतीच्या मतांच्या वाट्यात मनसे भागीदार झाल्याने युतीची लोकसभा निवडणुकीत युतीची पीछेहाट झाली. विधानसभा निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती घडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून, त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवार सांगळे यांना बसण्याची शक्यता आहे. मनसे आणि शिवसेनेच्या काटाकाटीच्या राजकारणात कॉंग्रेसचा फायदा होण्याची चिन्हे आहेत. मनसेचे उमेदवार दिलीप लांडे हे स्थानिक नगरसेवक असल्याने ते लक्षणीय मते घेतील, असा अंदाज आहे.
रिपब्लिकन डावी लोकशाही समितीकडून सहदेव खटके यांनी आपले दंड थोपटले आहेत. खटके हेही नवखे उमेदवार आहेत. कॉंग्रेस आघाडीच्या विरोधात व दलित, अल्पसंख्याकांच्या हिताचा सूर आळवीत "रिडालोस'ने निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. मात्र येथील बहुसंख्य मुस्लिम, दलित मतदार हा कॉंग्रेसचा परंपरागत पाठीराखा आहे. शिवाय कॉंग्रेसचा उमेदवारही मुस्लिम समाजातील असल्याने "रिडालोस'चा कॉंग्रेसवर फारसा परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही.
येथे बहुजन समाज पक्षानेही आपला उमेदवार दिला आहे; मात्र येथे खरा सामना कॉंग्रेस, मनसे व शिवसेना यांच्यातच होणार आहे. बसपने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मते घेतली होती. त्यामुळे नसीम खान यांना बसप काही प्रमाणात उपद्रवी ठरेल, इतकेच. मतदारसंघात अनुसूचित जाती-जमातींचे सुमारे 20 हजार मतदार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे पाच टक्के, तर अनुसूचित जमातीचे 0.61 टक्का मतदार आहेत. येथील निकाल फिरविण्याची ताकद मुस्लिम मतदारांमध्ये आहे. उत्तर भारतीय व अन्य समाजांचे मतदार मात्र तुलनेने कमी आहेत. या गोष्टी आणि कॉंग्रेसचा प्रभाव, मनसे फॅक्टर या बाबी लक्षात घेता, ही निवडणूक सध्या तरी कॉंग्रेससाठी सोपी असल्याचे दिसून येत आहे.
...................
चौकट :
एकूण मतदार
तीन लाख 46 हजार 866
पुरुष मतदार -
दोन लाख 7 हजार 971,
महिला -
ेएक लाख 38 हजार 835
------------------------------
कॉंग्रेसचे वर्चस्व असणारा कुर्ल्यातील बहुतांश भाग चांदीवली मतदारसंघात समाविष्ट झाला. त्यामुळे या वेळी आरिफ खान यांनी चांदीवलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 2004 च्या निवडणुकीत खान यांना एक लाख 19 हजार 612 मते मिळाली होती. एकूण मतांच्या 55.36 टक्के ही मते होती; तर शिवसेनेच्या दत्ताराम गुजर यांना एकूण मतांच्या 35.69 टक्के मते मिळाली होती. खान यांना या वेळी शिवसेनेच्या दत्ताराम गुजर या पारंपरिक उमेदवाराऐवजी नव्या दमाच्या उमेदवार चित्रा सांगळे यांचा सामना करावा लागणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्थानिक नगरसेवक दिलीप लांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला चांदीवलीत 25 हजार 368 मते मिळाली होती. शिवसेना-भाजप युतीच्या मतांच्या वाट्यात मनसे भागीदार झाल्याने युतीची लोकसभा निवडणुकीत युतीची पीछेहाट झाली. विधानसभा निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती घडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून, त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवार सांगळे यांना बसण्याची शक्यता आहे. मनसे आणि शिवसेनेच्या काटाकाटीच्या राजकारणात कॉंग्रेसचा फायदा होण्याची चिन्हे आहेत. मनसेचे उमेदवार दिलीप लांडे हे स्थानिक नगरसेवक असल्याने ते लक्षणीय मते घेतील, असा अंदाज आहे.
रिपब्लिकन डावी लोकशाही समितीकडून सहदेव खटके यांनी आपले दंड थोपटले आहेत. खटके हेही नवखे उमेदवार आहेत. कॉंग्रेस आघाडीच्या विरोधात व दलित, अल्पसंख्याकांच्या हिताचा सूर आळवीत "रिडालोस'ने निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. मात्र येथील बहुसंख्य मुस्लिम, दलित मतदार हा कॉंग्रेसचा परंपरागत पाठीराखा आहे. शिवाय कॉंग्रेसचा उमेदवारही मुस्लिम समाजातील असल्याने "रिडालोस'चा कॉंग्रेसवर फारसा परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही.
येथे बहुजन समाज पक्षानेही आपला उमेदवार दिला आहे; मात्र येथे खरा सामना कॉंग्रेस, मनसे व शिवसेना यांच्यातच होणार आहे. बसपने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मते घेतली होती. त्यामुळे नसीम खान यांना बसप काही प्रमाणात उपद्रवी ठरेल, इतकेच. मतदारसंघात अनुसूचित जाती-जमातींचे सुमारे 20 हजार मतदार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे पाच टक्के, तर अनुसूचित जमातीचे 0.61 टक्का मतदार आहेत. येथील निकाल फिरविण्याची ताकद मुस्लिम मतदारांमध्ये आहे. उत्तर भारतीय व अन्य समाजांचे मतदार मात्र तुलनेने कमी आहेत. या गोष्टी आणि कॉंग्रेसचा प्रभाव, मनसे फॅक्टर या बाबी लक्षात घेता, ही निवडणूक सध्या तरी कॉंग्रेससाठी सोपी असल्याचे दिसून येत आहे.
...................
चौकट :
एकूण मतदार
तीन लाख 46 हजार 866
पुरुष मतदार -
दोन लाख 7 हजार 971,
महिला -
ेएक लाख 38 हजार 835
------------------------------
आघाड्या आणि युतीला निळ्या झेंड्याचा आधार
मुंबई,ता.3 : रिपब्किन ऐक्याचे आणि रिपब्लिकन मतांच्या परिणामाची कोणी कितीही चेष्टा केली तरी रिपब्किन राजकारणाच्या निळ्या झेंड्याचा आधार घेतल्या शिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला सुरक्षित वाटत नाही. असंख्य गटांमध्ये विभागलेल्या रिपब्लिकन चळवळीचे प्रतीक "निळा झेंडा'च असल्याने त्यातल्या कोणत्याही गटाने अध्याप वेगळा रंग घेतलेला नाही. त्यामुळे एखादा कार्यकर्ता आणि त्याचे लेटरहेड एवढ्याच बळावर खांद्यावर निळा झेंडा घेतलेला एखादा गट नेता तरी आपल्या सोबत असावा यासाठी सर्वच पक्षाचे प्रयत्न सुरू असतात. या निवडणुकीतही शिवसेनेसह सर्व पक्षांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये निळा झेंडा दिसतो तो त्यामुळेच.
दलित आणि विशेषतः आंबेडकरी समाजाला सोबत घेतल्या शिवाय निवडणुकांचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. पाच ते सहा टक्के मतदान असणाऱ्या या समाजाला वगळल्यास त्याच्या नाराजीचा फटका निवडणुकीत बसू शकतो. याची जाणीव कॉंग्रेस आघाडीसह शिवसेना- भाजप यांना सुद्धा आहे. त्यामुळेच लहान मोठ्या रिपब्लिकन गटांना सोबत घेऊन आपण सर्वसमावेशक राजकारण करीत असल्याचे दाखविण्याचा डाव्यांपासून उजव्यांपर्यंत प्रत्येकाचाच प्रयत्न असतो.त्यासाठी आपल्या आघाडी वा युतीसोबत निळा झेंडा नावापुरती का होईना पण हवा, असा प्रत्येकाचाच आग्रह असतो. त्याची तरतूद सर्व राजकीय पक्षांनी याही निवडणुकीत केली आहे.
रिपब्लिकन पक्षाला सोबत घेण्याची सुरूवात कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली. रिपब्लिकन पक्षाचे नेते दादासाहेब गायकवाड यांना त्यांनी सोबत घेतले. तेथूनच रिपब्लिकन पक्ष व कॉंग्रेसची सलगी झाली. पुढे . रिपब्किन चळवळीतील ज्येष्ठ नेते व बिहारचे राज्यपाल रा.सु. गवई यांनी कॉंग्रेसशी दोस्ती केली .ती आज ही आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामदास आठवले यांना सोबत घेऊन यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे चालवला. रिपब्लिकन नेते दादासाहेब गायकवाड, गवई, ऍड. प्रकाश आंबेडकर, आठवले या मोठ्या नेत्यांनी कॉंग्रेसशी वेळोवेळी घरोबा केला.
यावेळी रामदास आठवले यांनी ऐक्याचा नारा दिल्याने सारे रिपब्लिकन गट निळ्या झेंड्याखाली एकत्रित राहतील अशी अपेक्षा होती मात्र याही ऐक्याची फाटाफूट झाली आणि रिपब्लिकन गट आपापल्यापरीने रिपब्लिकन पक्षाचे निळे झेंडे घेऊन कॉग्रेस आघाडी आणि युतीच्या तंबूत डेरेदाखल झाले.
ऐक्यातून फुटून डॉ. राजेंद्र गवई कॉंग्रेसच्या तंबूत शिरले . त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारसभा आणि रथावर पंजा आणि घड्याळासह रिपब्लिकनचा निळा झेंडा फडकू लागला. तर तानसेन ननावरे, अनिल कांबळे हे रिपब्लिकन नेते शिवसेनेच्या तंबूत शिरले. त्यामुळे युतीकडे शिवशक्ती- भिमशक्तीचा प्रयोग झाल अन् युतीलाही रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेंड्याची सोय झाली. तिसऱ्या आघाडीसोबत आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे असल्याने सध्या या तीनही प्रमुख प्रतिस्पर्धी आघाड्यांकडे रिपब्लिकनचा "निळा झेंडा' ही एक कॉमन गोष्ट दिसते.
..............
दलित आणि विशेषतः आंबेडकरी समाजाला सोबत घेतल्या शिवाय निवडणुकांचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. पाच ते सहा टक्के मतदान असणाऱ्या या समाजाला वगळल्यास त्याच्या नाराजीचा फटका निवडणुकीत बसू शकतो. याची जाणीव कॉंग्रेस आघाडीसह शिवसेना- भाजप यांना सुद्धा आहे. त्यामुळेच लहान मोठ्या रिपब्लिकन गटांना सोबत घेऊन आपण सर्वसमावेशक राजकारण करीत असल्याचे दाखविण्याचा डाव्यांपासून उजव्यांपर्यंत प्रत्येकाचाच प्रयत्न असतो.त्यासाठी आपल्या आघाडी वा युतीसोबत निळा झेंडा नावापुरती का होईना पण हवा, असा प्रत्येकाचाच आग्रह असतो. त्याची तरतूद सर्व राजकीय पक्षांनी याही निवडणुकीत केली आहे.
रिपब्लिकन पक्षाला सोबत घेण्याची सुरूवात कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली. रिपब्लिकन पक्षाचे नेते दादासाहेब गायकवाड यांना त्यांनी सोबत घेतले. तेथूनच रिपब्लिकन पक्ष व कॉंग्रेसची सलगी झाली. पुढे . रिपब्किन चळवळीतील ज्येष्ठ नेते व बिहारचे राज्यपाल रा.सु. गवई यांनी कॉंग्रेसशी दोस्ती केली .ती आज ही आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामदास आठवले यांना सोबत घेऊन यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे चालवला. रिपब्लिकन नेते दादासाहेब गायकवाड, गवई, ऍड. प्रकाश आंबेडकर, आठवले या मोठ्या नेत्यांनी कॉंग्रेसशी वेळोवेळी घरोबा केला.
यावेळी रामदास आठवले यांनी ऐक्याचा नारा दिल्याने सारे रिपब्लिकन गट निळ्या झेंड्याखाली एकत्रित राहतील अशी अपेक्षा होती मात्र याही ऐक्याची फाटाफूट झाली आणि रिपब्लिकन गट आपापल्यापरीने रिपब्लिकन पक्षाचे निळे झेंडे घेऊन कॉग्रेस आघाडी आणि युतीच्या तंबूत डेरेदाखल झाले.
ऐक्यातून फुटून डॉ. राजेंद्र गवई कॉंग्रेसच्या तंबूत शिरले . त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारसभा आणि रथावर पंजा आणि घड्याळासह रिपब्लिकनचा निळा झेंडा फडकू लागला. तर तानसेन ननावरे, अनिल कांबळे हे रिपब्लिकन नेते शिवसेनेच्या तंबूत शिरले. त्यामुळे युतीकडे शिवशक्ती- भिमशक्तीचा प्रयोग झाल अन् युतीलाही रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेंड्याची सोय झाली. तिसऱ्या आघाडीसोबत आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे असल्याने सध्या या तीनही प्रमुख प्रतिस्पर्धी आघाड्यांकडे रिपब्लिकनचा "निळा झेंडा' ही एक कॉमन गोष्ट दिसते.
..............
कॉंग्रेस आघाडीतील बंडखोरांना रिडालोसची रसद
40 मतदारसंघांसाठी तिसऱ्या आघाडीकडे उमेदवारच नाहीत
मुंबई, ता. 6 : कॉंग्रेसच्या विरोधात हाळी देत विधानसभा निवडणुकीच्या रणमैदानात उतरलेल्या "रिडालोस'ने कॉंग्रेसच्या चार बंडखोर उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे जागावाटपाचा घोळ आणि घटक पक्षांच्या स्थानिक तडजोडी यामुळे रिडालोसला विधानसभेच्या 40 जागांवर उमेदवार उभे करण्यात अपयश आले आहे.
कॉंग्रेस आणि प्रस्थापित पक्षांच्या विरोधात "रिडालोस'ने दंड थोपटले आहेत. विधानसभेच्या 288 जागा लढण्याचे मनसुबे रिडालोसने आखले होते. मात्र काही घटक पक्षांनी स्थानिक पातळ्यांवर केलेल्या तडजोडीमुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटपाचा घोळ सुटला नाही. परिणामी राज्यातील 40 मतदारसंघात "रिडालोस'ला उमेदवार उभे करता आले नाहीत. यामध्ये राजुरा, वणी, कन्नड, बागलाण, येवला, धुळे ग्रामीण, सिंदखेड, जळगाव शहर, एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर, खामगाव, अकोट, बाळापूर, रिसोड, मोर्शी, तुमसर, अमरावती, गडचिरोली, अहेरी, बोरिवली, दिंडोशी, भिवंडी ग्रामीण, भांडुप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, कांदिवली पूर्व, मलबार हिल, श्रीवर्धन, नेवासा, केज, औसा, उमरगा, कराड दक्षिण, शाहूवाडी, शिराळा, तासगाव- कवठेमहांकाळ, जत आणि वर्धा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. रिपब्लिकन युनायटेडला 11 ठिकाणी; तर समाजवादी पक्षाला पाच मतदारसंघांत उमेदवारच मिळू शकले नाहीत. राष्ट्रीय समाज पक्षालाही चार जागांवर उमेदवार मिळू शकले नाहीत. त्यामुळे 17 पक्षांच्या या आघाडीला सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करणे शक्य झाले नाही.
याची कसर भरून काढण्यासाठी रिडालोसने 10 जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य पक्षातील बंडखोरांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाच्या विरोधात शड्डू ठोकून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या कॉंग्रेसच्या बंडखोरांना रसद पुरवून कॉंग्रेसला शह देण्याचा प्रयत्न "रिडालोस'च्या नेत्यांनी केला आहे.
अमरावती मतदारसंघातील कॉंग्रेसचे बंडखोर व अर्थ राज्यमंत्री सुनील देशमुख यांना रिडालोसने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिल्याने देशमुख यांनी बंडाचे निशाण फडकावत कॉंग्रेसपुढे आव्हान निर्माण केले आहे. सिंदखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यासह वर्धा येथील कॉंग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुरेश देशमुख आणि कॉंग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांना रिडालोसने पाठबळ पुरविले आहे. त्यामुळे या मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. चाळीसगावमध्ये भाजपचे बंडखोर एम. के. अण्णा पाटील, कागलमधील संजय मंडलिक, कोल्हापूर दक्षिणमधील धनंजय महाडिक, इस्लामपूरमध्ये वैभव नायकवडी, बडनेरामध्ये रवी राणा; तसेच गडचिरोली, आदेरी, कराड दक्षिण येथील अपक्ष उमेदवारांनाही रिडालोसने पाठिंबा
.............
मुंबई, ता. 6 : कॉंग्रेसच्या विरोधात हाळी देत विधानसभा निवडणुकीच्या रणमैदानात उतरलेल्या "रिडालोस'ने कॉंग्रेसच्या चार बंडखोर उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे जागावाटपाचा घोळ आणि घटक पक्षांच्या स्थानिक तडजोडी यामुळे रिडालोसला विधानसभेच्या 40 जागांवर उमेदवार उभे करण्यात अपयश आले आहे.
कॉंग्रेस आणि प्रस्थापित पक्षांच्या विरोधात "रिडालोस'ने दंड थोपटले आहेत. विधानसभेच्या 288 जागा लढण्याचे मनसुबे रिडालोसने आखले होते. मात्र काही घटक पक्षांनी स्थानिक पातळ्यांवर केलेल्या तडजोडीमुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटपाचा घोळ सुटला नाही. परिणामी राज्यातील 40 मतदारसंघात "रिडालोस'ला उमेदवार उभे करता आले नाहीत. यामध्ये राजुरा, वणी, कन्नड, बागलाण, येवला, धुळे ग्रामीण, सिंदखेड, जळगाव शहर, एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर, खामगाव, अकोट, बाळापूर, रिसोड, मोर्शी, तुमसर, अमरावती, गडचिरोली, अहेरी, बोरिवली, दिंडोशी, भिवंडी ग्रामीण, भांडुप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, कांदिवली पूर्व, मलबार हिल, श्रीवर्धन, नेवासा, केज, औसा, उमरगा, कराड दक्षिण, शाहूवाडी, शिराळा, तासगाव- कवठेमहांकाळ, जत आणि वर्धा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. रिपब्लिकन युनायटेडला 11 ठिकाणी; तर समाजवादी पक्षाला पाच मतदारसंघांत उमेदवारच मिळू शकले नाहीत. राष्ट्रीय समाज पक्षालाही चार जागांवर उमेदवार मिळू शकले नाहीत. त्यामुळे 17 पक्षांच्या या आघाडीला सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करणे शक्य झाले नाही.
याची कसर भरून काढण्यासाठी रिडालोसने 10 जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य पक्षातील बंडखोरांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाच्या विरोधात शड्डू ठोकून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या कॉंग्रेसच्या बंडखोरांना रसद पुरवून कॉंग्रेसला शह देण्याचा प्रयत्न "रिडालोस'च्या नेत्यांनी केला आहे.
अमरावती मतदारसंघातील कॉंग्रेसचे बंडखोर व अर्थ राज्यमंत्री सुनील देशमुख यांना रिडालोसने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिल्याने देशमुख यांनी बंडाचे निशाण फडकावत कॉंग्रेसपुढे आव्हान निर्माण केले आहे. सिंदखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यासह वर्धा येथील कॉंग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुरेश देशमुख आणि कॉंग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांना रिडालोसने पाठबळ पुरविले आहे. त्यामुळे या मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. चाळीसगावमध्ये भाजपचे बंडखोर एम. के. अण्णा पाटील, कागलमधील संजय मंडलिक, कोल्हापूर दक्षिणमधील धनंजय महाडिक, इस्लामपूरमध्ये वैभव नायकवडी, बडनेरामध्ये रवी राणा; तसेच गडचिरोली, आदेरी, कराड दक्षिण येथील अपक्ष उमेदवारांनाही रिडालोसने पाठिंबा
.............
मतदारांची "कृपा' कॉंग्रेसवर?
कालिना विधानसभा मतदारसंघात या वेळी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणि शिवसेना-भाजप युतीचे ऍड. दीनानाथ तिवारी यांच्यात प्रमुख लढत होणार असून, मनसेच्या चंद्रकांत मोरे यांचे "रेल्वे इंजिन' युतीच्या मार्गात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कालिनामध्ये "कमळ' फुलण्याची शक्यता कमी आहे. कॉंग्रेसचे उमेदवार कृपाशंकर सिंह यांचा "हात' उत्तर भारतीय आणि झोपडीवासीयांच्या "साथ' राहिल्याने त्याचा फायदा कृपाशंकर यांना होणार आहे.
सांताक्रूझ विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कालिना हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. कॉंग्रेस आघाडीच्या जागावाटपात या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे कामगारमंत्री नवाब मलिक यांनी दावा केला होता; मात्र दिल्लीतील वजन वापरून कृपाशंकर सिंह यांनी कालिनाची उमेदवारी मिळविली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे कृपाशंकर यांना विजयाची खात्री वाटत आहे.
कालिना मतदारसंघात उत्तर भारतीय, मुस्लिम आणि झोपडीवासीय मतदारांची संख्या जास्त आहे. हे लक्षात घेऊन भाजपनेही येथून ऍड. तिवारी यांच्या रूपाने अमराठी उमेदवार देऊन कृपाशंकर सिंह यांना शह दिला आहे. त्यामुळे येथे खरी टक्कर या दोन अमराठी उमेदवारांत होईल. ऍड. तिवारी यांचाही मतदारसंघात चांगला संपर्क आहे. उत्तर मध्य मुंबई जिल्हा भाजपचे ते अध्यक्ष आहेत. मृदू स्वभाव आणि मतदारांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या कलेचा त्यांना फायदा होऊ शकतो. मनसेचा मराठी उमेदवार रिंगणात असल्याने येथील मराठी मते भाजपच्या पारड्यात किती पडतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
मनसेने लोकसभा निवडणुकीत पहिल्याच दणक्यात या मतदारसंघात 23 हजार 678 मतांची कमाई केली होती. विधानसभेतही हा प्रभाव कायम राहिल्यास त्याचा तडाखा युतीच्या उमेदवाराला बसेल. कॉंग्रेस आघाडी आणि युतीच्या अमराठी उमेदवारांसमोर चंद्रकांत मोरे यांना मनसेने आखाड्यात उतरविले आहे. दोन प्रमुख पक्षांचे उमेदवार अमराठी असल्याने मराठी मते "रेल्वे इंजिना'वर पडण्याची शक्यता आहे; मात्र या दोन उमेदवारांच्या तुलनेत मनसेचे मोरे यांचा राजकीय अनुभव कमी आहे. मतदासंघातील त्यांचा संपर्क कमी आहे. त्यामुळे आपले चिन्ह आणि चेहरा संपूर्ण मतदारसंघात पोहचविण्यासाठी त्यांना जास्त कष्ट करावे लागत आहेत. अमराठी भाषकांचा मतदारसंघ असल्याने त्यांच्या मराठी बाण्यालाही येथे प्रचारात हिंदीचा साज चढवावा लागला आहे. हिंदी भाषेतील प्रचारपत्रके वाटून त्यांना मतदारांना साकडे घालावे लागत आहेत.
एकूणच येथील अमराठी मतदारच निकाल ठरविणार असून, त्यामुळे कॉंग्रेसला विजयाची अधिक संधी दिसते.
झोपडपट्टी पुनर्वसन आणि पावसाळ्यात कालिना परिसरात भरणारे पाणी आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळशेजारील झोपडीवासीयांचे पुनर्वसन आदी प्रमुख प्रश्न या मतदारसंघात आहेत.
......
कालिना विधानसभा मतदारसंघ
पुरुष - 142798
स्त्री - 110245
एकूण - 253058
सांताक्रूझ विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कालिना हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. कॉंग्रेस आघाडीच्या जागावाटपात या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे कामगारमंत्री नवाब मलिक यांनी दावा केला होता; मात्र दिल्लीतील वजन वापरून कृपाशंकर सिंह यांनी कालिनाची उमेदवारी मिळविली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे कृपाशंकर यांना विजयाची खात्री वाटत आहे.
कालिना मतदारसंघात उत्तर भारतीय, मुस्लिम आणि झोपडीवासीय मतदारांची संख्या जास्त आहे. हे लक्षात घेऊन भाजपनेही येथून ऍड. तिवारी यांच्या रूपाने अमराठी उमेदवार देऊन कृपाशंकर सिंह यांना शह दिला आहे. त्यामुळे येथे खरी टक्कर या दोन अमराठी उमेदवारांत होईल. ऍड. तिवारी यांचाही मतदारसंघात चांगला संपर्क आहे. उत्तर मध्य मुंबई जिल्हा भाजपचे ते अध्यक्ष आहेत. मृदू स्वभाव आणि मतदारांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या कलेचा त्यांना फायदा होऊ शकतो. मनसेचा मराठी उमेदवार रिंगणात असल्याने येथील मराठी मते भाजपच्या पारड्यात किती पडतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
मनसेने लोकसभा निवडणुकीत पहिल्याच दणक्यात या मतदारसंघात 23 हजार 678 मतांची कमाई केली होती. विधानसभेतही हा प्रभाव कायम राहिल्यास त्याचा तडाखा युतीच्या उमेदवाराला बसेल. कॉंग्रेस आघाडी आणि युतीच्या अमराठी उमेदवारांसमोर चंद्रकांत मोरे यांना मनसेने आखाड्यात उतरविले आहे. दोन प्रमुख पक्षांचे उमेदवार अमराठी असल्याने मराठी मते "रेल्वे इंजिना'वर पडण्याची शक्यता आहे; मात्र या दोन उमेदवारांच्या तुलनेत मनसेचे मोरे यांचा राजकीय अनुभव कमी आहे. मतदासंघातील त्यांचा संपर्क कमी आहे. त्यामुळे आपले चिन्ह आणि चेहरा संपूर्ण मतदारसंघात पोहचविण्यासाठी त्यांना जास्त कष्ट करावे लागत आहेत. अमराठी भाषकांचा मतदारसंघ असल्याने त्यांच्या मराठी बाण्यालाही येथे प्रचारात हिंदीचा साज चढवावा लागला आहे. हिंदी भाषेतील प्रचारपत्रके वाटून त्यांना मतदारांना साकडे घालावे लागत आहेत.
एकूणच येथील अमराठी मतदारच निकाल ठरविणार असून, त्यामुळे कॉंग्रेसला विजयाची अधिक संधी दिसते.
झोपडपट्टी पुनर्वसन आणि पावसाळ्यात कालिना परिसरात भरणारे पाणी आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळशेजारील झोपडीवासीयांचे पुनर्वसन आदी प्रमुख प्रश्न या मतदारसंघात आहेत.
......
कालिना विधानसभा मतदारसंघ
पुरुष - 142798
स्त्री - 110245
एकूण - 253058
निवडणुकीच्या आखाड्यात 588 गुन्हेगार
मुंबई, ता. 10 : राजकारणात गुन्हेगारांची वाढती संख्या आणि धनिकांच्या हाती जाणाऱ्या सत्तेच्या चाव्या याबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत हेच चित्र निर्माण झाले आहे. विधानसभेच्या 288 मतदारसंघांतील तब्बल 588 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. मुंबई आणि उपनगरातील सर्वाधिक 87 उमेदवारांचा यात समावेश आहे; तर 461 करोडपती उमेदवार जनतेकडे मतांचे "दान' मागत आहेत. नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थेने आज प्रसिद्ध केलेल्या पाहणी अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.
एनईडब्ल्यू आणि सहकारी संस्थांनी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांच्या अधारे ही पाहणी केली आहे. या पाहणीत अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा शिवसेना, भाजप आणि मनसे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या 153 उमेदवारांपैकी 98 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत; तर भाजपच्या 114 पैकी 66, मनसेच्या 141 पैकी 81 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. या पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेस आघाडी मात्र पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 112 पैकी 40 आणि कॉंग्रेसच्या 164 पैकी 56 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत; तर गुन्हेगारांना उमेदवारी देण्याबाबत चर्चेत राहणाऱ्या "बसप'च्या 276 उमेदवारांपैकी 47 उमेदवारांवर विविध गुन्हे आहेत.
करोडपतींमध्ये कॉंग्रेसचा वरचष्मा
करोडपती उमेदवारांमध्ये कॉंग्रेस आघाडीवर आहे. राज्यात एकूण 461 करोडपती मतांचे "दान' मिळविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कॉंग्रेसचे 103, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 83, भाजपचे 59, मनसेचे 34, शिवसेनेचे 69, बसपचे 17 करोडपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण उमेदवारांपैकी 58 टक्के उमेदवार करोडपती आहेत.
उच्च शिक्षणाच्या बाबतीत मात्र सर्व पक्षांच्या उमेदवारांची बोंब आहे. केवळ 36 टक्के उमेदवार पदवीधर आहेत. 580 उमेदवारांचे दहावीपर्यंतही शिक्षण झालेले नाही; तर 1029 उमेदवारांकडे स्वतःचे पॅनकार्ड नसल्याचे पाहणीत उघड झाल्याचे नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
..................
एनईडब्ल्यू आणि सहकारी संस्थांनी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांच्या अधारे ही पाहणी केली आहे. या पाहणीत अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा शिवसेना, भाजप आणि मनसे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या 153 उमेदवारांपैकी 98 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत; तर भाजपच्या 114 पैकी 66, मनसेच्या 141 पैकी 81 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. या पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेस आघाडी मात्र पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 112 पैकी 40 आणि कॉंग्रेसच्या 164 पैकी 56 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत; तर गुन्हेगारांना उमेदवारी देण्याबाबत चर्चेत राहणाऱ्या "बसप'च्या 276 उमेदवारांपैकी 47 उमेदवारांवर विविध गुन्हे आहेत.
करोडपतींमध्ये कॉंग्रेसचा वरचष्मा
करोडपती उमेदवारांमध्ये कॉंग्रेस आघाडीवर आहे. राज्यात एकूण 461 करोडपती मतांचे "दान' मिळविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कॉंग्रेसचे 103, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 83, भाजपचे 59, मनसेचे 34, शिवसेनेचे 69, बसपचे 17 करोडपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण उमेदवारांपैकी 58 टक्के उमेदवार करोडपती आहेत.
उच्च शिक्षणाच्या बाबतीत मात्र सर्व पक्षांच्या उमेदवारांची बोंब आहे. केवळ 36 टक्के उमेदवार पदवीधर आहेत. 580 उमेदवारांचे दहावीपर्यंतही शिक्षण झालेले नाही; तर 1029 उमेदवारांकडे स्वतःचे पॅनकार्ड नसल्याचे पाहणीत उघड झाल्याचे नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
..................
उमेदवारांनी घेतली विश्रांती निकालाच्या अंदाजासाठी काथ्याकूट
मुंबई, ता. 14 : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली निवडणुकीची धामधूम काल मतदानानंतर थंडावली आणि राजकीय ताणतणावाखाली वावरणाऱ्या उमेदवारांनी पहिला अध्याय संपल्याने आज हुश्श म्हणत सुटकेचा निःश्वास सोडला. कोणी निवांत झोप घेतली, कोणी स्वीमिंगला गेले; तर कोणी मासळीबाजारात जाऊन मासे आणले. महिला उमेदवारांनी दिवाळीच्या फराळाला हात घातला. निकालाचा काथ्याकूट आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासही उमेदवार विसरले नाहीत.
राजकीय आघाड्या, व्यूहरचना, प्रचारसभा, कार्यकर्त्यांच्या बैठका, शह-काटशह यामुळे नेते आणि उमेदवारांच्या डोक्याचा अक्षरशः भुगा झाला होता. झोप आणि जेवणाचे तीन-तेरा वाजले. मतदारसंघात पदयात्रा काढून उमेदवारांचे जोडे झिजले. प्रचारसभा आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये भाषणे ठोकून घशाला कोरड पडली; तर मतदारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नाकीनऊ आले. राजकीय पक्षांचे प्रमुख नेते पायाला भिंगरी बांधून राज्यभर फिरले. या साऱ्या धावपळीमुळे त्यांची चांगलीच दमछाक झाली. मंगळवारी मतदानानंतर जनमताचा कौल आणि उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आणि नेत्यांची धावपळ थांबली.
दिवाळीनंतर निकालाचा फटाका फुटणार असल्याने त्याची धाकधूक सर्वच उमेदवारांना असली, तरी गेल्या महिनाभराच्या धावपळीतून त्यांना आज मिळालेला निवांतपणा त्यांनी सत्कारणी लावला. त्यामुळे आज ते रिलॅक्स होते. मनसेचे विलेपार्लेतील उमेदवार शिरीष पारकर यांनी आज मासळी बाजार गाठला. मुलीला शाळेत सोडले आणि दूरध्वनीवरून कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी मात्र दिवसभर मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. निकालाचा अंदाज घेतला. कॉंग्रेसचे उमेदवार कृष्णा हेगडे यांनी स्वीमिंगला जाऊन ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आणि रात्री कुटुंबासमवेत डीनरचा बेत आखला.
नबाव मलिक रमले कुटुंबात
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अणुशक्तीनगरमधील उमेदवार व कामगार मंत्री नवाब मलिक यांनी आपला वेळ आज लहानग्या नातवाला दिला. त्याच्याशी ते मनसोक्त खेळण्यात रमले. त्यानंतर कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना धन्यवाद दिले. त्यांनी झालेले मतदान आणि निकालांची आकडेमोड केली. भाजपचे मलबार हिलचे उमेदवार मंगलप्रभात लोढा यांनी देवदर्शन केले. वांद्रे पूर्वचे उमेदवार बाळा सावंत, भांडुपचे उमेदवार सुनील राऊत यांनी सकाळी विश्रांती घेऊन दुपारी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. वांद्रे पूर्वच्या मनसेच्या उमेदवार शिल्पा सरपोतदार यांनी मात्र दिवाळीच्या स्वागतात स्वतःला झोकून दिले आणि बाहेरची लढाई संपवून त्या घरच्या आघाडीवर रुजू झाल्या.
दिवाळी तोंडावर आल्याने काही उमेदवारांनी "होम मिनिस्टरला' वेळ देत दिवाळीत गोडवा कायम राखण्याचा प्रयत्न केला. बहुतांशी उमेदवारांनी आजचा दिवस कुटुंबासोबत घालवला. काहींनी निवांत झोप घेणे पसंत केले; तर काही नेत्यांनी घराबाहेर जाण्याचे टाळत कार्यकर्त्यांना घरीच बोलावून निकालाचा अंदाज घेण्यासाठी आकड्यांची उलटसुलट मांडणी केली. आपापल्या मतदारसंघांत झालेले मतदान, मतदानाला बाहेर पडलेले नागरिक, कोणत्या पॉकेटमध्ये किती प्रतिसाद मिळाला, त्याचा निकालावर काय परिणाम होईल याचा प्रमुख कार्यकर्त्यांसोबत काथ्याकूट करीत निकालाचा अंदाज घेतला. प्रसारमाध्यमे आणि काही संस्थांनी वर्तवलेल्या जनमत चाचण्यांचा अंदाज घेत स्वतःची गणिते मांडण्यात धन्यता मानली.
..........
राजकीय आघाड्या, व्यूहरचना, प्रचारसभा, कार्यकर्त्यांच्या बैठका, शह-काटशह यामुळे नेते आणि उमेदवारांच्या डोक्याचा अक्षरशः भुगा झाला होता. झोप आणि जेवणाचे तीन-तेरा वाजले. मतदारसंघात पदयात्रा काढून उमेदवारांचे जोडे झिजले. प्रचारसभा आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये भाषणे ठोकून घशाला कोरड पडली; तर मतदारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नाकीनऊ आले. राजकीय पक्षांचे प्रमुख नेते पायाला भिंगरी बांधून राज्यभर फिरले. या साऱ्या धावपळीमुळे त्यांची चांगलीच दमछाक झाली. मंगळवारी मतदानानंतर जनमताचा कौल आणि उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आणि नेत्यांची धावपळ थांबली.
दिवाळीनंतर निकालाचा फटाका फुटणार असल्याने त्याची धाकधूक सर्वच उमेदवारांना असली, तरी गेल्या महिनाभराच्या धावपळीतून त्यांना आज मिळालेला निवांतपणा त्यांनी सत्कारणी लावला. त्यामुळे आज ते रिलॅक्स होते. मनसेचे विलेपार्लेतील उमेदवार शिरीष पारकर यांनी आज मासळी बाजार गाठला. मुलीला शाळेत सोडले आणि दूरध्वनीवरून कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी मात्र दिवसभर मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. निकालाचा अंदाज घेतला. कॉंग्रेसचे उमेदवार कृष्णा हेगडे यांनी स्वीमिंगला जाऊन ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आणि रात्री कुटुंबासमवेत डीनरचा बेत आखला.
नबाव मलिक रमले कुटुंबात
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अणुशक्तीनगरमधील उमेदवार व कामगार मंत्री नवाब मलिक यांनी आपला वेळ आज लहानग्या नातवाला दिला. त्याच्याशी ते मनसोक्त खेळण्यात रमले. त्यानंतर कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना धन्यवाद दिले. त्यांनी झालेले मतदान आणि निकालांची आकडेमोड केली. भाजपचे मलबार हिलचे उमेदवार मंगलप्रभात लोढा यांनी देवदर्शन केले. वांद्रे पूर्वचे उमेदवार बाळा सावंत, भांडुपचे उमेदवार सुनील राऊत यांनी सकाळी विश्रांती घेऊन दुपारी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. वांद्रे पूर्वच्या मनसेच्या उमेदवार शिल्पा सरपोतदार यांनी मात्र दिवाळीच्या स्वागतात स्वतःला झोकून दिले आणि बाहेरची लढाई संपवून त्या घरच्या आघाडीवर रुजू झाल्या.
दिवाळी तोंडावर आल्याने काही उमेदवारांनी "होम मिनिस्टरला' वेळ देत दिवाळीत गोडवा कायम राखण्याचा प्रयत्न केला. बहुतांशी उमेदवारांनी आजचा दिवस कुटुंबासोबत घालवला. काहींनी निवांत झोप घेणे पसंत केले; तर काही नेत्यांनी घराबाहेर जाण्याचे टाळत कार्यकर्त्यांना घरीच बोलावून निकालाचा अंदाज घेण्यासाठी आकड्यांची उलटसुलट मांडणी केली. आपापल्या मतदारसंघांत झालेले मतदान, मतदानाला बाहेर पडलेले नागरिक, कोणत्या पॉकेटमध्ये किती प्रतिसाद मिळाला, त्याचा निकालावर काय परिणाम होईल याचा प्रमुख कार्यकर्त्यांसोबत काथ्याकूट करीत निकालाचा अंदाज घेतला. प्रसारमाध्यमे आणि काही संस्थांनी वर्तवलेल्या जनमत चाचण्यांचा अंदाज घेत स्वतःची गणिते मांडण्यात धन्यता मानली.
..........
अबू आझमींना विजयाची दुहेरी लॉटरी
मुंबई, ता. 22 : मी मी म्हणणाऱ्या काही बड्या नेत्यांना आज मतदारांनी घरी बसवले; तर काहींना विजयाने थोडक्यात हुलकावणी देत त्यांची सत्त्वपरीक्षा घेतली. मात्र समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांना मात्र भिवंडी पूर्व आणि मानखुर्द-शिवाजीनगर या दोन्ही मतदारसंघात विजयाची लॉटरी लागली असून "भगवान देता है तो छप्पर फाडके' या म्हणीचा प्रत्यय त्यांना आला. दरम्यान, आझमी यांना एका मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार असल्याने येथे पोटनिवडणूक अटळ आहे.
लोकसभा निवडणुकीत मुंबईतून नशीब अजमावणारे माजी खासदार अबू आझमी आज दोन मतदारसंघांतून निवडून आले. लोकसभेत हुलकावणी देणारे त्यांचे नशीब विधानसभा निवडणुकीत फळफळले आहे. रिपब्लिकन डावी लोकशाही समितीच्या पाठिंब्यावर भिवंडी पूर्व आणि मानखुर्द शिवाजीनगर या मुस्लिम बहुल मतदारसंघातून रिंगणात उतरण्याचा सेफ गेम अबू आझमी खेळले होते. या दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी आझमी यांच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले. भिवंडी पूर्व मतदारसंघात आझमी यांनी 17 हजार 981 मतांनी प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला; तर मानखुर्द येथे 14 हजार 117 एवढे मताधिक्य मिळवून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना चीतपट केले. समाजवादी पक्षाला नवापूर आणि भिवंडी या अन्य दोन जागांवर विजय मिळाल्याने विजयाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
पोटनिवडणूक होणार
भारतीय संविधानातील तरतुदीनुसार आझमी यांना एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता येईल. त्यामुळे त्यांना भिवंडी किंवा शिवाजीनगर मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार आहे; त्यामुळे तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. याबाबत राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी शेखर चन्ने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आझमी यांनी कोणत्याही एका मतदारसंघातून राजीनामा सादर केल्यानंतर तेथे पोटनिवडणूक घेण्यात येईल, असे सांगितले.
..........
लोकसभा निवडणुकीत मुंबईतून नशीब अजमावणारे माजी खासदार अबू आझमी आज दोन मतदारसंघांतून निवडून आले. लोकसभेत हुलकावणी देणारे त्यांचे नशीब विधानसभा निवडणुकीत फळफळले आहे. रिपब्लिकन डावी लोकशाही समितीच्या पाठिंब्यावर भिवंडी पूर्व आणि मानखुर्द शिवाजीनगर या मुस्लिम बहुल मतदारसंघातून रिंगणात उतरण्याचा सेफ गेम अबू आझमी खेळले होते. या दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी आझमी यांच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले. भिवंडी पूर्व मतदारसंघात आझमी यांनी 17 हजार 981 मतांनी प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला; तर मानखुर्द येथे 14 हजार 117 एवढे मताधिक्य मिळवून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना चीतपट केले. समाजवादी पक्षाला नवापूर आणि भिवंडी या अन्य दोन जागांवर विजय मिळाल्याने विजयाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
पोटनिवडणूक होणार
भारतीय संविधानातील तरतुदीनुसार आझमी यांना एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता येईल. त्यामुळे त्यांना भिवंडी किंवा शिवाजीनगर मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार आहे; त्यामुळे तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. याबाबत राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी शेखर चन्ने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आझमी यांनी कोणत्याही एका मतदारसंघातून राजीनामा सादर केल्यानंतर तेथे पोटनिवडणूक घेण्यात येईल, असे सांगितले.
..........
विलेपार्ल्यात कॉंग्रेसचा निसटता विजय
मनसेने खोडा घातल्याने शिवसेना तोंडघशी
ंमुंबई, ता. 22 : उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे कृष्णा हेगडे यांना निसटता विजय मिळाला असून, शिवसेनेचे विनायक राऊत यांचा 1704 मतांनी पराभव झाला. कॉंग्रेसला कडवी झुंज देणाऱ्या राऊत यांना लोकसभा निवडणुकीप्रमाणेच याही वेळी मनसेमुळेच एकप्रकारे धोबीपछाड खावी लागली. त्यामुळे हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने विलेपार्ले मतदारसंघात नऊ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. या वेळी मात्र कॉंग्रेसच्या कृष्णा हेगडे यांना 1704 मतांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. दहाव्या फेरीपर्यंत विनायक राऊत आणि हेगडे यांच्यात पाठशिवनीचा खेळ सुरू होता. कधी हेगडे, तर कधी राऊत आघाडीवर राहत असल्याने दोन्ही पक्षांच्या समर्थकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राऊत यांनी सुरुवातीच्या काळात घेतलेल्या आघाडीमुळे ते निसटती बाजी मारणार असे वाटत असतानाच हेगडे यांनी प्रत्येक फेरीत दोन हजार मतांची कमाई करीत 11 व्या फेरीत आघाडी घेतली. राऊत यांच्या पारड्यातील मते कमी होत असतानाच शिरीष पारकर यांच्या पारड्यातील मते वाढत गेली. शेवटच्या दोन फेऱ्यांपर्यंत रंगतदार ठरलेल्या या लढाईत अखेर कॉंग्रेसने बाजी मारली.
हेगडे यांना 44 हजार 338 मते मिळाली, तर राऊत यांना 42 हजार 634 मतांवर समाधान मानावे लागले. मनसेचे पारकर यांनीही मतांची जोरदार कमाई करीत एकप्रकारे कॉंग्रेसच्या विजयाला हातभारच लावला. पारकर यांना 35 हजार 156 मते मिळाली. मनसे आणि शिवसेना यांच्या भांडणात कॉंग्रेसने बाजी मारली. मनसेमुळे झालेला हा पराभव शिवसैनिकांच्या जिव्हारी लागल्याचे चित्र होते. हेगडे यांना विजयी घोषित करताच मतदान केंद्राबाहेर जमलेल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत परिसर दणाणून सोडला.
-------------------
ंमुंबई, ता. 22 : उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे कृष्णा हेगडे यांना निसटता विजय मिळाला असून, शिवसेनेचे विनायक राऊत यांचा 1704 मतांनी पराभव झाला. कॉंग्रेसला कडवी झुंज देणाऱ्या राऊत यांना लोकसभा निवडणुकीप्रमाणेच याही वेळी मनसेमुळेच एकप्रकारे धोबीपछाड खावी लागली. त्यामुळे हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने विलेपार्ले मतदारसंघात नऊ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. या वेळी मात्र कॉंग्रेसच्या कृष्णा हेगडे यांना 1704 मतांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. दहाव्या फेरीपर्यंत विनायक राऊत आणि हेगडे यांच्यात पाठशिवनीचा खेळ सुरू होता. कधी हेगडे, तर कधी राऊत आघाडीवर राहत असल्याने दोन्ही पक्षांच्या समर्थकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राऊत यांनी सुरुवातीच्या काळात घेतलेल्या आघाडीमुळे ते निसटती बाजी मारणार असे वाटत असतानाच हेगडे यांनी प्रत्येक फेरीत दोन हजार मतांची कमाई करीत 11 व्या फेरीत आघाडी घेतली. राऊत यांच्या पारड्यातील मते कमी होत असतानाच शिरीष पारकर यांच्या पारड्यातील मते वाढत गेली. शेवटच्या दोन फेऱ्यांपर्यंत रंगतदार ठरलेल्या या लढाईत अखेर कॉंग्रेसने बाजी मारली.
हेगडे यांना 44 हजार 338 मते मिळाली, तर राऊत यांना 42 हजार 634 मतांवर समाधान मानावे लागले. मनसेचे पारकर यांनीही मतांची जोरदार कमाई करीत एकप्रकारे कॉंग्रेसच्या विजयाला हातभारच लावला. पारकर यांना 35 हजार 156 मते मिळाली. मनसे आणि शिवसेना यांच्या भांडणात कॉंग्रेसने बाजी मारली. मनसेमुळे झालेला हा पराभव शिवसैनिकांच्या जिव्हारी लागल्याचे चित्र होते. हेगडे यांना विजयी घोषित करताच मतदान केंद्राबाहेर जमलेल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत परिसर दणाणून सोडला.
-------------------
मुंबईत रिडालोसचे पानिपत
रिपब्लिकनची पाटी कोरी; आठवलेंच्या नेतृत्वाचा फुगा फुटला
मुंबई, ता. 22 : विविध एक्झिट पोलचे अंदाज चुकवीत रिपब्लिकन डाव्या लोकशाही समितीने 11 जागांवर विजय मिळविला आहे; मात्र मुंबईत रिडालोसचे पुरते पानिपत झाले. रिडालोसचा सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन युनायटेडला एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे माजी खासदार व रिडालोसचे निमंत्रक रामदास आठवले यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
समाजवादी पार्टी आणि शेतकरी कामगार पक्षाची कामगिरी या वेळी उंचावली आहे. अलिबाग मतदारसंघातून शेकापच्या मीनाक्षी पाटील, उरणमधून विवेक पाटील, सांगोलातून गणपतराव देशमुख, पेणमधून धैर्यशील पाटील विजयी झाले असून, पनवेलची जागा मात्र शेकापला राखता आली नाही. भिवंडी-पूर्व व शिवाजीनगर येथून समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि भिवंडीतून रशीद मोमीन व शरद गावीत यांनी नवापूर मतदारसंघात विजय मिळविला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पश्चिम महाराष्ट्रात निर्माण केलेली हवा फारशी टिकली नाही. केवळ पंढरपूर मतदारसंघात "स्वाभिमानी'च्या भारत भालके यांना विजय मिळाला; स्वाभिमानीला इतर ठिकाणी अपयश आले.
भाकपच्या डहाणू येथील राजाराम ओझरे यांना विजय मिळाला; तर आमदार जीवा पंडू गावीत व आमदार नरसय्या आडम यांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे बाबासाहेब पाटील हे अहमदपूरमधून विजयी झाले आहेत. रिडालोसने पाठिंबा दिलेले बार्शीतून दिलीप सोपल, वर्ध्यातून सुरेश देशमुख, माळशीरमधून उत्तम जाणकर यांनी विजयश्री खेचून आणली.
रिपब्लिकनची पाटी कोरीच
रिडालोसमधील सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन युनायटेडला आपले खातेही खोलता आले नाही. रिपब्लिकनने 107 जागांवर उमेदवार उभे केले होते. मुंबई आणि उपनगरातील बहुतांशी जागांवर रिपब्लिकनचे उमेदवार उभे होते; मात्र त्यांना तिसरा क्रमांकही गाठता आला नाही. सर्वच ठिकाणी त्यांना मतदारांनी अस्मान दाखविले. गाजावाजा करीत झालेल्या रिपब्लिकन ऐक्यावर दलित मतदारांनी विश्वास दाखविलेला नाही. कॉंग्रेसला धडा शिकविण्याची भाषा करणाऱ्या माजी खासदार रामदास आठवले यांच्यासह सर्वच रिपब्लिकन नेत्यांना आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. "पैसा आणि वेळ कमी पडल्याने रिडालोसला यश मिळाले नाही', अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. जनतेला तिसरा पर्याय देण्याची भाषा करणाऱ्या रिडालोसला मनसेएवढेही यश मिळविता आले नाही.
बसपला नाकारले
मायावतींच्या बहुजन समाज पक्षालाही खाते खोलता आले नाही. मुंबईवर बसपने लक्ष केंद्रित केले होते; मात्र बसपच्या पदरी निराशाच पडली आहे. मायावतींच्या हत्तीला महाराष्ट्राच्या जनतेने नाकारले आहे.
-----------------------
मुंबई, ता. 22 : विविध एक्झिट पोलचे अंदाज चुकवीत रिपब्लिकन डाव्या लोकशाही समितीने 11 जागांवर विजय मिळविला आहे; मात्र मुंबईत रिडालोसचे पुरते पानिपत झाले. रिडालोसचा सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन युनायटेडला एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे माजी खासदार व रिडालोसचे निमंत्रक रामदास आठवले यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
समाजवादी पार्टी आणि शेतकरी कामगार पक्षाची कामगिरी या वेळी उंचावली आहे. अलिबाग मतदारसंघातून शेकापच्या मीनाक्षी पाटील, उरणमधून विवेक पाटील, सांगोलातून गणपतराव देशमुख, पेणमधून धैर्यशील पाटील विजयी झाले असून, पनवेलची जागा मात्र शेकापला राखता आली नाही. भिवंडी-पूर्व व शिवाजीनगर येथून समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि भिवंडीतून रशीद मोमीन व शरद गावीत यांनी नवापूर मतदारसंघात विजय मिळविला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पश्चिम महाराष्ट्रात निर्माण केलेली हवा फारशी टिकली नाही. केवळ पंढरपूर मतदारसंघात "स्वाभिमानी'च्या भारत भालके यांना विजय मिळाला; स्वाभिमानीला इतर ठिकाणी अपयश आले.
भाकपच्या डहाणू येथील राजाराम ओझरे यांना विजय मिळाला; तर आमदार जीवा पंडू गावीत व आमदार नरसय्या आडम यांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे बाबासाहेब पाटील हे अहमदपूरमधून विजयी झाले आहेत. रिडालोसने पाठिंबा दिलेले बार्शीतून दिलीप सोपल, वर्ध्यातून सुरेश देशमुख, माळशीरमधून उत्तम जाणकर यांनी विजयश्री खेचून आणली.
रिपब्लिकनची पाटी कोरीच
रिडालोसमधील सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन युनायटेडला आपले खातेही खोलता आले नाही. रिपब्लिकनने 107 जागांवर उमेदवार उभे केले होते. मुंबई आणि उपनगरातील बहुतांशी जागांवर रिपब्लिकनचे उमेदवार उभे होते; मात्र त्यांना तिसरा क्रमांकही गाठता आला नाही. सर्वच ठिकाणी त्यांना मतदारांनी अस्मान दाखविले. गाजावाजा करीत झालेल्या रिपब्लिकन ऐक्यावर दलित मतदारांनी विश्वास दाखविलेला नाही. कॉंग्रेसला धडा शिकविण्याची भाषा करणाऱ्या माजी खासदार रामदास आठवले यांच्यासह सर्वच रिपब्लिकन नेत्यांना आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. "पैसा आणि वेळ कमी पडल्याने रिडालोसला यश मिळाले नाही', अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. जनतेला तिसरा पर्याय देण्याची भाषा करणाऱ्या रिडालोसला मनसेएवढेही यश मिळविता आले नाही.
बसपला नाकारले
मायावतींच्या बहुजन समाज पक्षालाही खाते खोलता आले नाही. मुंबईवर बसपने लक्ष केंद्रित केले होते; मात्र बसपच्या पदरी निराशाच पडली आहे. मायावतींच्या हत्तीला महाराष्ट्राच्या जनतेने नाकारले आहे.
-----------------------
"रेल्वे इंजिना'च्या धडकेने शिवसेना "जायबंदी'
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस आघाडीने विजय मिळविला आहे, तर कॉंग्रेसचे आमदार जनार्दन चांदुरकर यांचा पराभव करीत शिवसेनेचे नगरसेवक बाळा सावंत यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघात युतीचा भगवा फडकावला व युतीची लाज राखली. कालिना मतदारसंघातून गृहराज्यमंत्री (शहर) नसीम खान यांनी दणदणीत विजय मिळवीत हॅट्ट्रिक साधली आहे. अन्य मतदारसंघात मात्र कॉंग्रेसला युती आणि मनसेच्या उमेदवारांनी कडवी झुंज दिली. मनसेच्या "रेल्वे इंजिना'ने युतीला धडक दिल्याने युतीवर जायबंदी होण्याची पाळी आली.
लोकसभा निवडणुकीत उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य संपादन करीत कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत निर्माण केलेला वरचष्मा कायम राखला आहे. कॉंग्रेसचे चार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक आणि शिवसेनेचा एक असे बलाबल या लोकसभा मतदारसंघात तयार झाले आहे.
आघाडीने जिंकलेल्या पाचपैकी वांद्रे-पश्चिम आणि विलेपार्ले या जागा निसटत्या मतांच्या फरकाने आल्या. युती आणि मनसेच्या उमेदवारांची एकत्रित मते आघाडीच्या विजयी उमेदवारांपेक्षा अधिक आहेत. मनसे व युती एकत्रित असते, तर चांदिवली वगळता अन्य मतदारसंघात चित्र काही वेगळेच दिसले असते.
विलेपार्लेत हेगडेंचा निसटता विजय
मुंबई कॉंग्रेसचे प्रवक्ते कृष्णा हेगडे आणि शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्यात "कॉंटे की टक्कर' अपेक्षित होती. मनसेचा फटका राऊत यांना बसेल असा होरा होता. घडलेही तसेच. अटीतटीच्या लढतीत कृष्णा हेगडे यांचा 1 हजार 704 मतांनी निसटता विजय झाला. राऊत यांना 42 हजार 634 मते मिळाली. मनसचे उमेदवार शिरीष पारकर यांनी 35 हजार 156 मतांची कमाई केली. ते तिसऱ्या स्थानावर राहिले. राऊत आणि पारकर यांच्यात मराठी मतांचे विभाजन झाल्याने राऊत यांना तिसऱ्यांदा पराभवाचे पाणी चाखावे लागले. स्थानिक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करीत राऊत यांनी चांगली लढत दिली होती. मात्र रेल्वे इंजिनाचा धक्का बसल्याने राऊत तोंडघशी पडले; तर विजयाचा दावा करणारे शिरीष पारकर यांनी कॉंग्रेसच्या विजयात हातभार लावला. मात्र लोकसभेच्या तुलनेत मनसेने या वेळी येथून जास्त मतांची कमाई केली आहे.
"वांद्रे-पश्चिमे'त सिद्दीकींची दमछाक
या मतदारसंघातून कॉंग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांचा विजय मोठ्या फरकाने होईल, असे वाटत होते; मात्र भाजपच्या आशीष शेलार यांनी त्यांना चांगले झुंजविले. त्यामुळे केवळ 1 हजार 691 मतांची सिद्दीकी यांना आघाडी मिळाली. वांद्रे पश्चिम हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे; मात्र शेलार यांनी सिद्दीकी यांची दमछाक केली. मनसेचा उमेदवार या मतदारसंघात नव्हता. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात सरळ लढत झाली. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मिळालेली आघाडी कायम राखण्यात सिद्दीकी यांना यश मिळाले आहे.
"वांद्रे-पूर्व'मध्ये भगवा
लगतच्या मतदारसंघात हाराकिरी होत असताना शिवसेनेच्या प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांनी वांद्रे पूर्वमध्ये विजयश्री खेचून आणली. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान असलेल्या "मातोश्री'चा अंतर्भाव असलेल्या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला. बाळा सावंत यांच्या समोर मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांचे आव्हान प्रामुख्याने होते. मात्र मनसेला मात देत सावंत यांनी भगवा फडकावला आहे. सन 2004 च्या विधानसभा निवडणुकीत यशाने त्यांना हुलकावणी दिली होती. या वेळी मात्र त्यांनी जनार्दन चांदुरकर यांचा पराभव करून वचपा काढला. त्यांना 7 हजार 420 एवढे मताधिक्य मिळाले. मनसेच्या शिल्पा सरपोतदार या तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेल्या असून त्यांना 19 हजार 109 मते मिळाली आहेत. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत शिल्पा सरपोतदार यांना अपयशाचा सामना करावा लागला.
कालिनात मनसेचे आव्हान
कालिना मतदारसंघात मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी 12 हजार 921 मतांनी विजय मिळवला आहे. मनसेच्या चंद्रकांत मोरे या नवख्या उमेदवाराने त्यांना अनपेक्षित लढत दिली. कॉंग्रेस आणि युती यांच्यात प्रामुख्याने लढत होईल, असे मानले जात होते. मात्र भाजपचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष दीनानाथ तिवारी हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. त्यांना अवघी 13 हजार 994 मते मिळाली आहेत; तर मनसेच्या मोरे यांनी 38 हजार 284 मते मिळवली आहेत. कृपाशंकर सिंह यांचा येथील उत्तर भारतीयांशी असलेला संपर्क आणि कॉंग्रेसचे वर्चस्व पाहता कृपाशंकर यांना मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती. मात्र मनसेने त्याच्या विजयी वारूचा वेग रोखून धरला. धरला त्यामुळे त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळवता आले नाही.
चांदिवलीवर कॉंग्रेसची पकड
कुर्ला मतदारसंघातून आतापर्यंत दोन टर्म विधानसभेवर धडक देणाऱ्या गृहराज्यमंत्री नसीम खान यांनी या वेळी मतदारसंघांच्या पुनर्रचनेत नव्याने तयार झालेल्या चांदिवली मतदारसंघातून मनसेच्या दिलीप लांडे यांचा 33 हजार 715 मतांनी पराभव करीत विजयाची हॅट्ट्रिक साधली. त्यांचा हा विजय एकतर्फी मानला जात आहे. नसीम खान यांना 82 हजार 616 मते मिळाली आहेत. दिलीप लांडे यांना 48 हजार 901 मते मिळाली. शिवसेनेने मात्र येथे हाराकिरी केली. सेनेच्या उमेदवार चित्रा सांगळे यांना 22 हजार 782 मते मिळाली आहेत. नसिम खान यांची मतदारसंघावरील पकड यामुळे अधिकच घट्ट झाली आहे; तर मनसेला मिळालेली मते उत्साहवर्धक आहेत. सेनेला मात्र आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पुढील काळात धडपडावे लागणार आहे.
"कुर्ल्या'त राष्ट्रवादीला लाभ
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अनिल कांबळे यांनी कुर्ला मतदारसंघात शिवसेनेच्या मंगेश कुडाळकर यांचा 6 हजार 971 मतांनी पराभव केला. त्यांना 41 हजार 891 मते मिळाली असून कुडाळकर यांना 34 हजार 920 मते मिळाली. शिवसेनेच्या विजयाचा मार्ग येथे मनसेने रोखून धरला. मनसे आणि सेनेच्या उमेदवारांची मते पाहता हे चित्र स्पष्ट होते. मनसेच्या सदाशिव लोखंडे यांनी 33 हजार 967 मतांची कमाई केली. मनसे आणि शिवसेनेच्या भांडणात राष्ट्रवादीचा लाभ झाला. कुर्ला मतदारसंघ राखीव झाल्याने कामगार मंत्री नवाब मलिक यांच्याऐवजी या मतदारसंघाचा वारसा अनिल कांबळे यांच्याकडे आला. कांबळे यांनी पहिल्याच प्रयत्नात विजयश्री मिळवली आहे. "मनसेला मत म्हणजे कॉंग्रेसला मत' या शिवसेनेच्या प्रचाराला मराठी मतदारांनी केराची टोपली दाखवली आहे. बहुतांश मतदारसंघात शिवसेनेची पीछेहाट झाली असून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.
..........
लोकसभा निवडणुकीत उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य संपादन करीत कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत निर्माण केलेला वरचष्मा कायम राखला आहे. कॉंग्रेसचे चार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक आणि शिवसेनेचा एक असे बलाबल या लोकसभा मतदारसंघात तयार झाले आहे.
आघाडीने जिंकलेल्या पाचपैकी वांद्रे-पश्चिम आणि विलेपार्ले या जागा निसटत्या मतांच्या फरकाने आल्या. युती आणि मनसेच्या उमेदवारांची एकत्रित मते आघाडीच्या विजयी उमेदवारांपेक्षा अधिक आहेत. मनसे व युती एकत्रित असते, तर चांदिवली वगळता अन्य मतदारसंघात चित्र काही वेगळेच दिसले असते.
विलेपार्लेत हेगडेंचा निसटता विजय
मुंबई कॉंग्रेसचे प्रवक्ते कृष्णा हेगडे आणि शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्यात "कॉंटे की टक्कर' अपेक्षित होती. मनसेचा फटका राऊत यांना बसेल असा होरा होता. घडलेही तसेच. अटीतटीच्या लढतीत कृष्णा हेगडे यांचा 1 हजार 704 मतांनी निसटता विजय झाला. राऊत यांना 42 हजार 634 मते मिळाली. मनसचे उमेदवार शिरीष पारकर यांनी 35 हजार 156 मतांची कमाई केली. ते तिसऱ्या स्थानावर राहिले. राऊत आणि पारकर यांच्यात मराठी मतांचे विभाजन झाल्याने राऊत यांना तिसऱ्यांदा पराभवाचे पाणी चाखावे लागले. स्थानिक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करीत राऊत यांनी चांगली लढत दिली होती. मात्र रेल्वे इंजिनाचा धक्का बसल्याने राऊत तोंडघशी पडले; तर विजयाचा दावा करणारे शिरीष पारकर यांनी कॉंग्रेसच्या विजयात हातभार लावला. मात्र लोकसभेच्या तुलनेत मनसेने या वेळी येथून जास्त मतांची कमाई केली आहे.
"वांद्रे-पश्चिमे'त सिद्दीकींची दमछाक
या मतदारसंघातून कॉंग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांचा विजय मोठ्या फरकाने होईल, असे वाटत होते; मात्र भाजपच्या आशीष शेलार यांनी त्यांना चांगले झुंजविले. त्यामुळे केवळ 1 हजार 691 मतांची सिद्दीकी यांना आघाडी मिळाली. वांद्रे पश्चिम हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे; मात्र शेलार यांनी सिद्दीकी यांची दमछाक केली. मनसेचा उमेदवार या मतदारसंघात नव्हता. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात सरळ लढत झाली. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मिळालेली आघाडी कायम राखण्यात सिद्दीकी यांना यश मिळाले आहे.
"वांद्रे-पूर्व'मध्ये भगवा
लगतच्या मतदारसंघात हाराकिरी होत असताना शिवसेनेच्या प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांनी वांद्रे पूर्वमध्ये विजयश्री खेचून आणली. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान असलेल्या "मातोश्री'चा अंतर्भाव असलेल्या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला. बाळा सावंत यांच्या समोर मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांचे आव्हान प्रामुख्याने होते. मात्र मनसेला मात देत सावंत यांनी भगवा फडकावला आहे. सन 2004 च्या विधानसभा निवडणुकीत यशाने त्यांना हुलकावणी दिली होती. या वेळी मात्र त्यांनी जनार्दन चांदुरकर यांचा पराभव करून वचपा काढला. त्यांना 7 हजार 420 एवढे मताधिक्य मिळाले. मनसेच्या शिल्पा सरपोतदार या तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेल्या असून त्यांना 19 हजार 109 मते मिळाली आहेत. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत शिल्पा सरपोतदार यांना अपयशाचा सामना करावा लागला.
कालिनात मनसेचे आव्हान
कालिना मतदारसंघात मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी 12 हजार 921 मतांनी विजय मिळवला आहे. मनसेच्या चंद्रकांत मोरे या नवख्या उमेदवाराने त्यांना अनपेक्षित लढत दिली. कॉंग्रेस आणि युती यांच्यात प्रामुख्याने लढत होईल, असे मानले जात होते. मात्र भाजपचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष दीनानाथ तिवारी हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. त्यांना अवघी 13 हजार 994 मते मिळाली आहेत; तर मनसेच्या मोरे यांनी 38 हजार 284 मते मिळवली आहेत. कृपाशंकर सिंह यांचा येथील उत्तर भारतीयांशी असलेला संपर्क आणि कॉंग्रेसचे वर्चस्व पाहता कृपाशंकर यांना मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती. मात्र मनसेने त्याच्या विजयी वारूचा वेग रोखून धरला. धरला त्यामुळे त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळवता आले नाही.
चांदिवलीवर कॉंग्रेसची पकड
कुर्ला मतदारसंघातून आतापर्यंत दोन टर्म विधानसभेवर धडक देणाऱ्या गृहराज्यमंत्री नसीम खान यांनी या वेळी मतदारसंघांच्या पुनर्रचनेत नव्याने तयार झालेल्या चांदिवली मतदारसंघातून मनसेच्या दिलीप लांडे यांचा 33 हजार 715 मतांनी पराभव करीत विजयाची हॅट्ट्रिक साधली. त्यांचा हा विजय एकतर्फी मानला जात आहे. नसीम खान यांना 82 हजार 616 मते मिळाली आहेत. दिलीप लांडे यांना 48 हजार 901 मते मिळाली. शिवसेनेने मात्र येथे हाराकिरी केली. सेनेच्या उमेदवार चित्रा सांगळे यांना 22 हजार 782 मते मिळाली आहेत. नसिम खान यांची मतदारसंघावरील पकड यामुळे अधिकच घट्ट झाली आहे; तर मनसेला मिळालेली मते उत्साहवर्धक आहेत. सेनेला मात्र आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पुढील काळात धडपडावे लागणार आहे.
"कुर्ल्या'त राष्ट्रवादीला लाभ
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अनिल कांबळे यांनी कुर्ला मतदारसंघात शिवसेनेच्या मंगेश कुडाळकर यांचा 6 हजार 971 मतांनी पराभव केला. त्यांना 41 हजार 891 मते मिळाली असून कुडाळकर यांना 34 हजार 920 मते मिळाली. शिवसेनेच्या विजयाचा मार्ग येथे मनसेने रोखून धरला. मनसे आणि सेनेच्या उमेदवारांची मते पाहता हे चित्र स्पष्ट होते. मनसेच्या सदाशिव लोखंडे यांनी 33 हजार 967 मतांची कमाई केली. मनसे आणि शिवसेनेच्या भांडणात राष्ट्रवादीचा लाभ झाला. कुर्ला मतदारसंघ राखीव झाल्याने कामगार मंत्री नवाब मलिक यांच्याऐवजी या मतदारसंघाचा वारसा अनिल कांबळे यांच्याकडे आला. कांबळे यांनी पहिल्याच प्रयत्नात विजयश्री मिळवली आहे. "मनसेला मत म्हणजे कॉंग्रेसला मत' या शिवसेनेच्या प्रचाराला मराठी मतदारांनी केराची टोपली दाखवली आहे. बहुतांश मतदारसंघात शिवसेनेची पीछेहाट झाली असून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.
..........
रिडालोसच्या गटनेतेपदी गणपतराव देशमुख?
ंमुंबई, ता. 26 : "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती'च्या विधिमंडळ गटनेतेपदी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे विद्यमान आमदार गणपतराव देशमुख यांची निवड होण्याची शक्यता आहे. "रिडालोस'च्या घटक पक्षांची उद्या (ता. 27) मुंबईत गटनेता निवडीसाठी बैठक होणार असून, यामध्ये देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची होणार आहे.
विधानसभेच्या 248 जागा लढविणाऱ्या रिडालोसला 11 जागांवर विजय मिळाला. यामध्ये समाजवादी पक्षाच्या तीन, शेतकरी कामगार पक्षाच्या चार, राष्ट्रीय समाज पक्षाची एक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, माकप यांच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. अन्य दोन जागांवर समितीने पाठिंबा दिलेले अपक्ष निवडून आले आहेत. गणपतराव देशमुख गेली 37 वर्षे विधिमंडळात निवडून आले आहेत. विधिमंडळात लोकांच्या प्रश्नावर त्यांची मुलूखमैदान तोफ धडाडली आहे. 1967 मध्ये ते आमदार झाले. 1995 ते 99 हा कालावधी वगळता ते आजपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात निवडुन आले आहेत. एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे गणपतराव देशमुख यांचेच नाव गटनेतेपदासाठी आघाडीवर आहे. रिडालोसच्या घटक पक्षात सर्वात जास्त जागा शेकापने पटकावल्या असल्याने गटनेतेपद शेकापकडे राहण्याची शक्यता आहे.
चौकट
रिडालोसला 30 लाख 70 हजार मते
अठरा घटक पक्षांच्या रिडालोसच्या बाजूने राज्यातील 30 लाख 70 हजार 34 मतदारांनी मतदान केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सपाला 0.74 टक्के, माकपला 0.60 टक्के, जनता दल सेक्युलरला 0.19 टक्के, भाकपला 0.14 टक्के मते मिळाली आहेत.
-------------------
विधानसभेच्या 248 जागा लढविणाऱ्या रिडालोसला 11 जागांवर विजय मिळाला. यामध्ये समाजवादी पक्षाच्या तीन, शेतकरी कामगार पक्षाच्या चार, राष्ट्रीय समाज पक्षाची एक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, माकप यांच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. अन्य दोन जागांवर समितीने पाठिंबा दिलेले अपक्ष निवडून आले आहेत. गणपतराव देशमुख गेली 37 वर्षे विधिमंडळात निवडून आले आहेत. विधिमंडळात लोकांच्या प्रश्नावर त्यांची मुलूखमैदान तोफ धडाडली आहे. 1967 मध्ये ते आमदार झाले. 1995 ते 99 हा कालावधी वगळता ते आजपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात निवडुन आले आहेत. एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे गणपतराव देशमुख यांचेच नाव गटनेतेपदासाठी आघाडीवर आहे. रिडालोसच्या घटक पक्षात सर्वात जास्त जागा शेकापने पटकावल्या असल्याने गटनेतेपद शेकापकडे राहण्याची शक्यता आहे.
चौकट
रिडालोसला 30 लाख 70 हजार मते
अठरा घटक पक्षांच्या रिडालोसच्या बाजूने राज्यातील 30 लाख 70 हजार 34 मतदारांनी मतदान केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सपाला 0.74 टक्के, माकपला 0.60 टक्के, जनता दल सेक्युलरला 0.19 टक्के, भाकपला 0.14 टक्के मते मिळाली आहेत.
-------------------
हिंदीतूनच शपथ घेणार : अबू आझमी
मुंबई, ता. 2 : नवनिर्वाचित आमदारांनी मराठीतून शपथ घ्यावी; अन्यथा त्यांना मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला असतानाच समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मात्र आपण हिंदी भाषेतूनच आमदार म्हणून शपथ घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाकरे आणि आझमी यांच्यातील धुमश्चक्रीत भर पडणार आहे.
नवनिर्वाचित आमदार अबू आझमी यांच्या हिंदी प्रेमावर मनसेने कडवट टीका केली आहे. या पर्श्वभूमीवर आझमी यांनी आपण मुंबईत 40 वर्षे राहत असून विधानसभेत निवडून आल्यामुळे मराठी भाषेचे धडेही गिरवणार असून मराठीला स्वप्नातही विरोध करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती इंग्रजी, मराठीप्रमाणे हिंदी भाषेतून मिळावी, अशी मागणी अबू आझमी यांनी विधिमंडळाच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन नुकतीच केली होती. आमदार म्हणून शपथही हिंदीतूनच घेणार असल्याची घोषणा या वेळी त्यांनी केली होती. त्यामुळे मनसेला पुन्हा एकदा आंदोलनाचा आयता विषय मिळाला. आझमींच्या लाठ्याकाठ्या वाटपाच्या वक्तव्याने यापूर्वी मनसेच्या हाती आयते कोलीत दिले होते. आझमींच्या नव्या मागणीवर बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "आझमी यांनी उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये चालते व्हावे', असे सुनावले आहे.
मराठी भाषेबद्दल आदर असल्याचे सांगत आझमी यांनी मराठीचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. राष्ट्रभाषेतून शपथ घेण्याची घटनेत तरतुद आहे. त्यामुळे आपण हिंदीतून शपथ घेणार असल्याचे त्यांनी नमुद केले.
"हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. या भाषेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता साधली जावी, हा आपल्या मागणीमागील हेतू होता; मात्र त्याचा विपर्यास करून मला मराठीद्वेशी ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे', असा आरोप आझमी यांनी मनसेचे नाव न घेता केला आहे.
...........
नवनिर्वाचित आमदार अबू आझमी यांच्या हिंदी प्रेमावर मनसेने कडवट टीका केली आहे. या पर्श्वभूमीवर आझमी यांनी आपण मुंबईत 40 वर्षे राहत असून विधानसभेत निवडून आल्यामुळे मराठी भाषेचे धडेही गिरवणार असून मराठीला स्वप्नातही विरोध करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती इंग्रजी, मराठीप्रमाणे हिंदी भाषेतून मिळावी, अशी मागणी अबू आझमी यांनी विधिमंडळाच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन नुकतीच केली होती. आमदार म्हणून शपथही हिंदीतूनच घेणार असल्याची घोषणा या वेळी त्यांनी केली होती. त्यामुळे मनसेला पुन्हा एकदा आंदोलनाचा आयता विषय मिळाला. आझमींच्या लाठ्याकाठ्या वाटपाच्या वक्तव्याने यापूर्वी मनसेच्या हाती आयते कोलीत दिले होते. आझमींच्या नव्या मागणीवर बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "आझमी यांनी उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये चालते व्हावे', असे सुनावले आहे.
मराठी भाषेबद्दल आदर असल्याचे सांगत आझमी यांनी मराठीचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. राष्ट्रभाषेतून शपथ घेण्याची घटनेत तरतुद आहे. त्यामुळे आपण हिंदीतून शपथ घेणार असल्याचे त्यांनी नमुद केले.
"हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. या भाषेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता साधली जावी, हा आपल्या मागणीमागील हेतू होता; मात्र त्याचा विपर्यास करून मला मराठीद्वेशी ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे', असा आरोप आझमी यांनी मनसेचे नाव न घेता केला आहे.
...........
शिवसेना सोडायची त्यांनी खुशाल जावे : शिवसेनाप्रमुख
मुंबई, ता.5 : ""आम्ही अस्वलासारखे आहोत. अस्वलाच्या अंगावरचा एक केस गळाला म्हणून काय फरक पडतो? शिवसेनेतून ज्यांना जायचे त्यांनी खुशाल निघून जावे; परंतु महापालिकेवरचा भगवा कोणत्याही स्थितीत खाली खेचू देणार नाही'', असा ठाम विश्वास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांना "शिवसेना भवना'त तब्बल 35 मिनिटे मार्गदर्शन करून बाळासाहेबांनी या आमदारांचा आत्मविश्वास वाढविला. त्यांना संबोधित करताना शिवसेनाप्रमुख म्हणाले, ""विधानसभा निवडणुकीतील अनेक जय-पराजय आम्ही पचवले आहेत. त्यातून तावून-सुलाखून निघालो आहोत. तुम्ही जरी 44 आमदार असलात तरी मी तुमच्याकडून 88 आमदारांचे काम करून घेईन. समुद्राला चंद्रबळानुसार भरती-ओहोटी येत असते. चंद्रबळ म्हणजे जनताजनार्दन आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ओहोटी आली आहे; पण याच चंद्रबळावर एक दिवस शिवसेनेला भरती येईल, असा विश्वास मला आहे.''
"मराठी माणसाविषयीच्या वक्तव्याचा विपर्यास'
"शिवसेना भवन'कडे येताना दुकानांच्या अनेक पाट्या मराठीत दिसल्या. येथे असणाऱ्या इंग्रजी पाट्यांना त्यावेळी मी स्वत: काळे फासले होते, अशी जुनी आठवण सांगून ""नारायण राणे यांना त्यांच्या कारभारामुळेच मी बाहेर काढले. आता सरमळकरही त्याच वाटेने गेले आहेत'', असे ठाकरे म्हणाले. मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, असे मी कधीही म्हणालो नव्हतो, असे त्यांनी स्पष्ट केले. शेजारीच बसलेल्या खासदार आणि "सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याकडे वळत, ""मी असे कधी म्हणालो होतो का?'' अशी पृच्छा त्यांनी केली. त्यावर राऊत यांनी, ""तुम्ही असे कधी म्हटले नव्हते. मराठी माणसाने पाठ फिरवली एवढेच तुम्ही म्हणालात. मीडियाने त्याचा विपर्यास केला'' असे राऊत म्हणाले. बाळासाहेबांनी प्रसिद्धिमाध्यमांना यावेळीही लक्ष्य केले. सध्या प्रसिद्धिमाध्यमांनी आपल्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
चौकट...
टोले आणि चिमटे
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर पडलेल्या सेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा नामोल्लेख बाळासाहेबांनी यावेळी केला. मात्र त्यात गजानन कीर्तिकर यांचा उल्लेख करण्याचे राहून गेल्याचे लक्षात येताच बाळासाहेबांनी कीर्तिकर यांनीही थोडा-थोडा प्रचार केला, त्यांचे नाव घ्यायचे राहून गेले. नाव घेतले नाही तर ते सोडून जातील, असा टोला लगावला. शिवसेना नेते मनोहर जोशी यांनाही त्यांनी चिमटा काढला.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांना "शिवसेना भवना'त तब्बल 35 मिनिटे मार्गदर्शन करून बाळासाहेबांनी या आमदारांचा आत्मविश्वास वाढविला. त्यांना संबोधित करताना शिवसेनाप्रमुख म्हणाले, ""विधानसभा निवडणुकीतील अनेक जय-पराजय आम्ही पचवले आहेत. त्यातून तावून-सुलाखून निघालो आहोत. तुम्ही जरी 44 आमदार असलात तरी मी तुमच्याकडून 88 आमदारांचे काम करून घेईन. समुद्राला चंद्रबळानुसार भरती-ओहोटी येत असते. चंद्रबळ म्हणजे जनताजनार्दन आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ओहोटी आली आहे; पण याच चंद्रबळावर एक दिवस शिवसेनेला भरती येईल, असा विश्वास मला आहे.''
"मराठी माणसाविषयीच्या वक्तव्याचा विपर्यास'
"शिवसेना भवन'कडे येताना दुकानांच्या अनेक पाट्या मराठीत दिसल्या. येथे असणाऱ्या इंग्रजी पाट्यांना त्यावेळी मी स्वत: काळे फासले होते, अशी जुनी आठवण सांगून ""नारायण राणे यांना त्यांच्या कारभारामुळेच मी बाहेर काढले. आता सरमळकरही त्याच वाटेने गेले आहेत'', असे ठाकरे म्हणाले. मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, असे मी कधीही म्हणालो नव्हतो, असे त्यांनी स्पष्ट केले. शेजारीच बसलेल्या खासदार आणि "सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याकडे वळत, ""मी असे कधी म्हणालो होतो का?'' अशी पृच्छा त्यांनी केली. त्यावर राऊत यांनी, ""तुम्ही असे कधी म्हटले नव्हते. मराठी माणसाने पाठ फिरवली एवढेच तुम्ही म्हणालात. मीडियाने त्याचा विपर्यास केला'' असे राऊत म्हणाले. बाळासाहेबांनी प्रसिद्धिमाध्यमांना यावेळीही लक्ष्य केले. सध्या प्रसिद्धिमाध्यमांनी आपल्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
चौकट...
टोले आणि चिमटे
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर पडलेल्या सेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा नामोल्लेख बाळासाहेबांनी यावेळी केला. मात्र त्यात गजानन कीर्तिकर यांचा उल्लेख करण्याचे राहून गेल्याचे लक्षात येताच बाळासाहेबांनी कीर्तिकर यांनीही थोडा-थोडा प्रचार केला, त्यांचे नाव घ्यायचे राहून गेले. नाव घेतले नाही तर ते सोडून जातील, असा टोला लगावला. शिवसेना नेते मनोहर जोशी यांनाही त्यांनी चिमटा काढला.
एसएनडीटी विद्यापीठाच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना फटका
ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा उरकली
ंमुंबई, ता. 9 : एसएनडीटी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाच्या तुघलकी कारभाराचा चांगलाच फटका आज विद्यार्थांना बसला. "पोस्ट ग्रॅज्युएट अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन' या अभ्यासक्रमाच्या प्रथमसत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका वेळेत उपलब्ध न झाल्याने तब्बल चार तास विद्यार्थ्यांना परीक्षागृहाबाहेर ताटकळत बसावे लागल्याने मनस्ताप सहन करवा लागला.
एसएनडीटी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या "पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन' शाखेत 13 विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथमसत्राची लेखी परीक्षा आजपासून (ता. 9) सुरू झाली. परीक्षा विभागाने याबाबतचे वेळापत्रक सुमारे पंधरा दिवस आधीच जाहीर केले होते, असे असताना आज पहिल्या पेपरलाच परीक्षा विभागाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. सकाळी 10.30 वाजता "चाइल्ड डेव्हलपमेंट' या विषयाची परीक्षा होती. मात्र सकाळी परीक्षागृहात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परीक्षेची कोणत्याही प्रकारची तयारी नसल्याचे दिसून आले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता परीक्षा होणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे चिडलेल्या विद्यार्थ्यांनी तेथेच ठिय्या दिला आणि परीक्षा घेतली नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे धाव घेतली. त्यामुळे परीक्षा विभागाने ऐनवेळी धावाधाव करून नव्याने प्रश्नपत्रिका तयार करून दुपारी दोन वाजता कशीबशी परीक्षा उरकून घेतली, अशी माहिती एका विद्यार्थिनीने दिली.
दरम्यान "ज्या प्राध्यापकांनी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या ते सध्या दूरस्थ शिक्षण विभागात कार्यरत नाहीत. "चाइल्ड डेव्हलपमेंट' या विषयाच्या प्रश्नपत्रिका त्यांच्याकडेच राहिल्या आहेत. त्यामुळे नव्याने प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घ्यावी लागली', अशी सारवासारव विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाचे संचालक चंद्रकांत पुरी यांनी "सकाळ'शी बोलताना केली.
विद्यापीठाच्या या गोंधळी कारभारामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाला जबाबदार कोण, असा सवाल केला जात असून विद्यापीठाच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनविसेचे सरचिटणीस गजानन काळे यांनी दिला आहे
...........
ंमुंबई, ता. 9 : एसएनडीटी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाच्या तुघलकी कारभाराचा चांगलाच फटका आज विद्यार्थांना बसला. "पोस्ट ग्रॅज्युएट अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन' या अभ्यासक्रमाच्या प्रथमसत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका वेळेत उपलब्ध न झाल्याने तब्बल चार तास विद्यार्थ्यांना परीक्षागृहाबाहेर ताटकळत बसावे लागल्याने मनस्ताप सहन करवा लागला.
एसएनडीटी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या "पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन' शाखेत 13 विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथमसत्राची लेखी परीक्षा आजपासून (ता. 9) सुरू झाली. परीक्षा विभागाने याबाबतचे वेळापत्रक सुमारे पंधरा दिवस आधीच जाहीर केले होते, असे असताना आज पहिल्या पेपरलाच परीक्षा विभागाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. सकाळी 10.30 वाजता "चाइल्ड डेव्हलपमेंट' या विषयाची परीक्षा होती. मात्र सकाळी परीक्षागृहात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परीक्षेची कोणत्याही प्रकारची तयारी नसल्याचे दिसून आले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता परीक्षा होणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे चिडलेल्या विद्यार्थ्यांनी तेथेच ठिय्या दिला आणि परीक्षा घेतली नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे धाव घेतली. त्यामुळे परीक्षा विभागाने ऐनवेळी धावाधाव करून नव्याने प्रश्नपत्रिका तयार करून दुपारी दोन वाजता कशीबशी परीक्षा उरकून घेतली, अशी माहिती एका विद्यार्थिनीने दिली.
दरम्यान "ज्या प्राध्यापकांनी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या ते सध्या दूरस्थ शिक्षण विभागात कार्यरत नाहीत. "चाइल्ड डेव्हलपमेंट' या विषयाच्या प्रश्नपत्रिका त्यांच्याकडेच राहिल्या आहेत. त्यामुळे नव्याने प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घ्यावी लागली', अशी सारवासारव विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाचे संचालक चंद्रकांत पुरी यांनी "सकाळ'शी बोलताना केली.
विद्यापीठाच्या या गोंधळी कारभारामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाला जबाबदार कोण, असा सवाल केला जात असून विद्यापीठाच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनविसेचे सरचिटणीस गजानन काळे यांनी दिला आहे
...........
अखेर "म्हाडा'ने परीक्षा पुढे ढकलली
सरकारी समन्वय नसल्याने एकाच दिवशी तीन परीक्षा
ंमुंबई, ता. 11 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, म्हाडा आणि ठाणे वनविभाग यांनी विविध पदांसाठी एकाच दिवशी (ता. 29 नोव्हेंबर 2009) परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्यासमोर उभा केलेला पेचप्रसंग "म्हाडा'ने आपली परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अखेर टळला आहे. सरकारी खात्यातील समन्वयाचा अभाव, एकाच दिवशी परीक्षांचे होणारे आयोजन, ऐनवेळी बदलण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा यामुळे हजारो परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागत असून सरकारी बाबूंच्या या भोंगळ कारभाराबद्दल विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक या पदांसाठी 29 नोव्हेंबर 2009 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर "म्हाडा'मार्फतही वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक या दोन पदांसाठी याच तारखेला परीक्षा घेतली जाणार होती. तशी तारीखही जाहीर करण्यात आली होती. तर ठाणे वनविभागाच्या वतीनेही 29 नोव्हेंबरलाच लेखापाल व वनपाल पदांसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय नोकरी मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी या तिन्ही परीक्षांसाठी अर्ज दाखल केले आहेत. सुरुवातीला एमपीएससी आणि म्हाडाच्या परीक्षांच्या तारखा वेगळ्या होत्या. त्यात पुन्हा बदल करण्यात आला. मात्र हा बदल करताना संबंधित अधिकाऱ्यांनी अन्य विभागांशी समन्वय साधला नसल्याने तिन्ही परीक्षा एकाच दिवशी जाहीर झाल्या. त्यामुळे विद्यार्थी काळजीत पडले. एकाच दिवशी तीन विभागाच्या परीक्षा झाल्यास या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन परीक्षांना मुकावे लागले असते.
दरम्यान, तिन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्याचा साक्षात्कार उशिरा का होईना संबंधित विभागांना झाला; त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळले आहे. "म्हाडा'ने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने 29 रोजी होणारी परीक्षा रद्द केली आहे. ही परीक्षा आता 20 डिसेंबर रोजी घेण्यात येईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. शासनाच्या कार्यालयातील समन्वयाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी केला आहे.
............
ंमुंबई, ता. 11 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, म्हाडा आणि ठाणे वनविभाग यांनी विविध पदांसाठी एकाच दिवशी (ता. 29 नोव्हेंबर 2009) परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्यासमोर उभा केलेला पेचप्रसंग "म्हाडा'ने आपली परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अखेर टळला आहे. सरकारी खात्यातील समन्वयाचा अभाव, एकाच दिवशी परीक्षांचे होणारे आयोजन, ऐनवेळी बदलण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा यामुळे हजारो परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागत असून सरकारी बाबूंच्या या भोंगळ कारभाराबद्दल विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक या पदांसाठी 29 नोव्हेंबर 2009 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर "म्हाडा'मार्फतही वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक या दोन पदांसाठी याच तारखेला परीक्षा घेतली जाणार होती. तशी तारीखही जाहीर करण्यात आली होती. तर ठाणे वनविभागाच्या वतीनेही 29 नोव्हेंबरलाच लेखापाल व वनपाल पदांसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय नोकरी मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी या तिन्ही परीक्षांसाठी अर्ज दाखल केले आहेत. सुरुवातीला एमपीएससी आणि म्हाडाच्या परीक्षांच्या तारखा वेगळ्या होत्या. त्यात पुन्हा बदल करण्यात आला. मात्र हा बदल करताना संबंधित अधिकाऱ्यांनी अन्य विभागांशी समन्वय साधला नसल्याने तिन्ही परीक्षा एकाच दिवशी जाहीर झाल्या. त्यामुळे विद्यार्थी काळजीत पडले. एकाच दिवशी तीन विभागाच्या परीक्षा झाल्यास या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन परीक्षांना मुकावे लागले असते.
दरम्यान, तिन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्याचा साक्षात्कार उशिरा का होईना संबंधित विभागांना झाला; त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळले आहे. "म्हाडा'ने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने 29 रोजी होणारी परीक्षा रद्द केली आहे. ही परीक्षा आता 20 डिसेंबर रोजी घेण्यात येईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. शासनाच्या कार्यालयातील समन्वयाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी केला आहे.
............
रिडालोसला घरघर
नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू
मुंबई, ता. 13 : विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने रिपब्लिकन डावी लोकशाही समितीतील घटक पक्षांत अस्वस्थता पसरली असून काही पक्ष पुढील काळात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नवी समीकरणे जुळवू लागले आहेत. त्यामुळे काही घटक पक्ष रिडालोसला रामराम करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कॉंग्रेस आघाडीच्या विरोधात दंड थोपटून निवडणुकीच्या रणमैदानात उतरलेल्या रिडालोसचा भ्रमनिरास झाला. राज्यात पर्यायी आघाडी म्हणून रिडालोसने स्वत:ला प्रमोट करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र सतरा पक्षांच्या रिडालोसला 17 जगाही जिंकता आल्या नाहीत. सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन युनायटेड आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता राखणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघनेकडून मोठी अपेक्षा होती. ती फोल ठरली. रिपब्लिकनची पाटी कोरी राहिली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार भारत भालके कॉंग्रेसच्या तंबूत डेरेदाखल झाले.
निवडणुकीनंतर झालेल्या या पडझडीचा अंदाज घेण्यासाठी "रिडालोस'च्या सर्व घटक पक्षांचे नेते आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आत्मचिंतनात गुंतले आहेत. माजी खासदार रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकनचे विभागवार चिंतन मेळावे होणार आहेत; तर शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष यांनीही यशापयशाचा आढावा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही "वनबैठकी'त आत्मचिंतन केले. "रिडालोस'च्या माध्यमातून लढल्यामुळे पक्षाला काही प्रमाणात फटका बसल्याचे मत या वेळी काही नेत्यांनी मांडले. येत्या काळात नवी समीकरणे जुळवून रिडालोसला सोडचिठ्ठी देण्याची मागणी काही नेत्यांनी केल्याचे सांगण्यात आले. "रिडालोस'मध्ये "लॉस' आमचाच झाला, अशी खंत एका वरिष्ठ नेत्याने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
रिपब्लिकन युनायटेडच्या नेत्यांमध्येही अशीच भावना आहे. रिडालोसच्या माध्यमातून लढल्यामुळे रिपब्लिकनचे नुकसान झाले. रिपब्लिकन नेत्यांची मते घटक पक्षाच्या उमेदवारांना पडली; मात्र रिपब्लिकनच्या उमेदवारांना घटक पक्षांच्या वोट बॅंकेचा फायदा झाला नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी काळात रिपब्लिकन पक्षही नव्या सवंगड्याचा शोध घेण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रिडालोसचे नेते प्रा. एस. व्ही. जाधव यांनी, रिडालोस पुढील काळातही अखंड राहील, असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, कामगार, वाढती महागाई, वादळ, पाऊस यामुळे झालेले नुकसान आदी प्रश्नांवर आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
(चौकट)
जोशी-शेट्टी एकत्रित येणार?
शेतकरी कामगार संघटनेचे नेते शरद जोशी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई, ता. 13 : विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने रिपब्लिकन डावी लोकशाही समितीतील घटक पक्षांत अस्वस्थता पसरली असून काही पक्ष पुढील काळात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नवी समीकरणे जुळवू लागले आहेत. त्यामुळे काही घटक पक्ष रिडालोसला रामराम करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कॉंग्रेस आघाडीच्या विरोधात दंड थोपटून निवडणुकीच्या रणमैदानात उतरलेल्या रिडालोसचा भ्रमनिरास झाला. राज्यात पर्यायी आघाडी म्हणून रिडालोसने स्वत:ला प्रमोट करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र सतरा पक्षांच्या रिडालोसला 17 जगाही जिंकता आल्या नाहीत. सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन युनायटेड आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता राखणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघनेकडून मोठी अपेक्षा होती. ती फोल ठरली. रिपब्लिकनची पाटी कोरी राहिली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार भारत भालके कॉंग्रेसच्या तंबूत डेरेदाखल झाले.
निवडणुकीनंतर झालेल्या या पडझडीचा अंदाज घेण्यासाठी "रिडालोस'च्या सर्व घटक पक्षांचे नेते आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आत्मचिंतनात गुंतले आहेत. माजी खासदार रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकनचे विभागवार चिंतन मेळावे होणार आहेत; तर शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष यांनीही यशापयशाचा आढावा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही "वनबैठकी'त आत्मचिंतन केले. "रिडालोस'च्या माध्यमातून लढल्यामुळे पक्षाला काही प्रमाणात फटका बसल्याचे मत या वेळी काही नेत्यांनी मांडले. येत्या काळात नवी समीकरणे जुळवून रिडालोसला सोडचिठ्ठी देण्याची मागणी काही नेत्यांनी केल्याचे सांगण्यात आले. "रिडालोस'मध्ये "लॉस' आमचाच झाला, अशी खंत एका वरिष्ठ नेत्याने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
रिपब्लिकन युनायटेडच्या नेत्यांमध्येही अशीच भावना आहे. रिडालोसच्या माध्यमातून लढल्यामुळे रिपब्लिकनचे नुकसान झाले. रिपब्लिकन नेत्यांची मते घटक पक्षाच्या उमेदवारांना पडली; मात्र रिपब्लिकनच्या उमेदवारांना घटक पक्षांच्या वोट बॅंकेचा फायदा झाला नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी काळात रिपब्लिकन पक्षही नव्या सवंगड्याचा शोध घेण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रिडालोसचे नेते प्रा. एस. व्ही. जाधव यांनी, रिडालोस पुढील काळातही अखंड राहील, असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, कामगार, वाढती महागाई, वादळ, पाऊस यामुळे झालेले नुकसान आदी प्रश्नांवर आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
(चौकट)
जोशी-शेट्टी एकत्रित येणार?
शेतकरी कामगार संघटनेचे नेते शरद जोशी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
आणि त्यांची रवानगी झाली बालसुधारगृहात
मुंबई, ता. 14 : उत्तर प्रदेशात राहणाऱ्या मुकेशला (नाव बदललेले) मुंबईचे आकर्षण होते. त्याला सिनेमात दहा दहा गुंडांना लोळवणाऱ्या अभिनेता हृतिक रोशनला भेटायचे होते. म्हणून तो घरातून पळून मुंबईत आला खरा, पण मुंबईत पाऊल ठेवताच इथली गर्दी पाहून तो भांबावलेल्या अवस्थेत रेल्वे स्थानकात फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात केली. त्याच्या नातेवाइकांचा शोध सुरू आहे. दिल्लीतील सुखवस्तू कुटुंबात राहणारी आशा (नावात बदल) घरातून पळून आली आणि दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडली. दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकल्याने आई-वडिलांपासून दूर डोंगरीच्या बालसुधारगृहात राहणाऱ्या शेकडो मुलांचा हाही बालदिन सुधारगृहातच साजरा झाला.
मुंबई म्हणजे स्वप्नांचं मायाजाल. मुंबईची आणि इथल्या चंदेरी दुनियेची भुरळ पडून दरवर्षी अनेक मुले आपल्या आवडत्या हिरोला भेटण्यासाठी घरातून पळून मुंबईत येतात; मात्र येथे आल्यावर आपण फसलो याची जाणीव त्यांना होते आणि त्यांची रवानगी बालसुधारगृहात होते; तर कही जण वाईट मार्गाला लागतात.
मुंबईच्या मायाजालात स्वप्ने पूर्ण करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक येतात; मात्र लहान मुलांमध्ये मुंबईचे आकर्षण असते ते चित्रपटात झळकणाऱ्या आपल्या आयडॉलला भेटण्याचे. मुंबईत गेल्यावर ते सहज भेटतील, त्यांच्याशी बोलता येईल, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला मिळेल, या आशेने ते बेधडक घरातून पळून थेट मुंबई गाठतात; मात्र इथे आल्यावर त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो आणि पाठीमागे लागतो तो दुर्दैवाचा फेरा. मुकेशलाही हृतिक रोशनला भेटायचे होते, म्हणून तो घरातून पळून मुंबईत आला. दिल्लीत राहणारी आशा (नावात बदल) शाळेत जायची. आशालाही मुंबई पाहायची होती. वर्गातील वात्रट मुले तिला वर्गातल्याच एका मुलाच्या नावाने चिडवायची. हे सारे घरी कळले तर... या विचाराने आशा घाबरली. त्यामुळे ती घरातून एक लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन मुंबईत पळून आली. मुंबईत तिची गाठ एका तरुणाशी पडली. काही वेळ त्याच्यासोबत राहिल्यावर तिच्या लक्षात आले, की आपल्याला फसविण्याचा त्याचा इरादा आहे. त्यामुळे तिने तडक पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तिची बालसुधारगृहात रवानगी केली. तेथून नुकतेच तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले, असे बालसुधारगृहाचे अधीक्षक एच. ए. जाधव यांनी सांगितले.
डोंगरीच्या बालसुधारगृहात बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधून पळून आलेल्या मुलांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील मुलांचे प्रमाण कमी असल्याचे जाधव यांनी सांगितले. घरातल्या भांडणाला कंटाळून, घरी काम करायला लागते म्हणून, आई-वडील मारतात म्हणूनही अनेक मुले पळून येतात. रेल्वे स्थानके, उद्याने आदी सार्वजनिक ठिकाणांहून काही सामाजिक संस्था, पोलिस यांच्यामार्फत ही मुले बालसुधारगृहात दाखल होत असल्याचे ते म्हणाले. बालकामगार म्हणून सोडविण्यात आलेली, पालकांनी सांभाळण्याची झंझट नको म्हणून टाकलेली मतिमंद मुलेही या सुधारगृहात आहेत. बालदिनाच्या निमित्ताने आज सुधारगृहात झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.
............
मुंबई म्हणजे स्वप्नांचं मायाजाल. मुंबईची आणि इथल्या चंदेरी दुनियेची भुरळ पडून दरवर्षी अनेक मुले आपल्या आवडत्या हिरोला भेटण्यासाठी घरातून पळून मुंबईत येतात; मात्र येथे आल्यावर आपण फसलो याची जाणीव त्यांना होते आणि त्यांची रवानगी बालसुधारगृहात होते; तर कही जण वाईट मार्गाला लागतात.
मुंबईच्या मायाजालात स्वप्ने पूर्ण करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक येतात; मात्र लहान मुलांमध्ये मुंबईचे आकर्षण असते ते चित्रपटात झळकणाऱ्या आपल्या आयडॉलला भेटण्याचे. मुंबईत गेल्यावर ते सहज भेटतील, त्यांच्याशी बोलता येईल, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला मिळेल, या आशेने ते बेधडक घरातून पळून थेट मुंबई गाठतात; मात्र इथे आल्यावर त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो आणि पाठीमागे लागतो तो दुर्दैवाचा फेरा. मुकेशलाही हृतिक रोशनला भेटायचे होते, म्हणून तो घरातून पळून मुंबईत आला. दिल्लीत राहणारी आशा (नावात बदल) शाळेत जायची. आशालाही मुंबई पाहायची होती. वर्गातील वात्रट मुले तिला वर्गातल्याच एका मुलाच्या नावाने चिडवायची. हे सारे घरी कळले तर... या विचाराने आशा घाबरली. त्यामुळे ती घरातून एक लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन मुंबईत पळून आली. मुंबईत तिची गाठ एका तरुणाशी पडली. काही वेळ त्याच्यासोबत राहिल्यावर तिच्या लक्षात आले, की आपल्याला फसविण्याचा त्याचा इरादा आहे. त्यामुळे तिने तडक पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तिची बालसुधारगृहात रवानगी केली. तेथून नुकतेच तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले, असे बालसुधारगृहाचे अधीक्षक एच. ए. जाधव यांनी सांगितले.
डोंगरीच्या बालसुधारगृहात बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधून पळून आलेल्या मुलांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील मुलांचे प्रमाण कमी असल्याचे जाधव यांनी सांगितले. घरातल्या भांडणाला कंटाळून, घरी काम करायला लागते म्हणून, आई-वडील मारतात म्हणूनही अनेक मुले पळून येतात. रेल्वे स्थानके, उद्याने आदी सार्वजनिक ठिकाणांहून काही सामाजिक संस्था, पोलिस यांच्यामार्फत ही मुले बालसुधारगृहात दाखल होत असल्याचे ते म्हणाले. बालकामगार म्हणून सोडविण्यात आलेली, पालकांनी सांभाळण्याची झंझट नको म्हणून टाकलेली मतिमंद मुलेही या सुधारगृहात आहेत. बालदिनाच्या निमित्ताने आज सुधारगृहात झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.
............
त्यांना गोळीने दिली जखम भावाच्या मृत्यूची
ंमुंबई : रायफलीतून गोळ्या झाडत दोघे जण त्या दिवशी सीएसटी रेल्वेस्थानकात शिरले. बेफामपणे गोळीबार करीत ते धडाधड माणसं मारत होते. लोक सैरावैरा पळत होते. त्यात माझा सख्खा भाऊसुद्धा होता. ते पाहून मी घाबरले... काय करायचे मला कळत नव्हते. एवढ्यात कोणी तरी ओरडले, "मरना है क्या' आणि मी भानावर येण्यापूर्वीच माझ्या पायाला एक गोळी लागली. मी कोसळले आणि माझ्यासमोर माझ्या भावाच्या छातीत गोळी लागून तो ठार झाला. 26/11 ला सीएसटी रेल्वेस्थानकात मृत्यूचे भयाण तांडव अनुभवणाऱ्या बोरिवली येथील विजयादेवींना त्या दिवशीचा प्रसंग सांगताना आपले अश्रू आवरता येत नव्हते.
ंमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कोणी वडील, कोणी आई, मुले तर कोणी अख्खा परिवार गमावला. प्रत्येकाच्या दुर्दैवाचे दशावतार वेगळे. प्रत्येकाची कहाणी काळजाला घरे पाडणारी.
विजयादेवी आपल्या नातेवाईकांसह गोरखपूरला निघाल्या होत्या. त्यांचा पती, भाऊ आणि अन्य दोन महिला त्यांना निरोप देण्यासाठी सीएसटीपर्यंत आल्या होत्या. विजयादेवींच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग आजही अगदी स्पष्ट आहे. ""स्थानकावरील स्वच्छतागृहात जाऊन मी परतत असतानाच अचानक फायरिंग सुरू झाली. लोक धावत होते. माझ्याही पायाला गोळी लागली. मी कोसळले; पण कोसळताना मेस्त्रीलाल मौर्य या माझ्या सख्ख्या भावाला गोळी लागल्याचे मी पाहिले. त्याला वाचवायची ताकद माझ्यात नव्हती. माझ्या डोळ्यासमोर त्याचा मृत्यू झाला. तो क्रूर हल्ला... मी आयुष्यात असा प्रसंग कधी पाहिला नव्हता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोक आणि क्रूरकर्म्याचा तो अमानुष गोळीबार आजही विसरता येत नाही. माझा जीव वाचला; पण भावाचा मृत्यू झाल्याची सल मनात कायम आहे. निरपराध लोकांची घरे उद्ध्वस्त करणाऱ्या दहशतवाद्यांना फाशीच दिली पाहिजे.''
विजयादेवींची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. पतीला पक्षाघात झाल्यामुळे घरची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. बांगड्यांचा व्यवसाय करून त्या घर चालवत असत; मात्र पायाला गोळी लागल्याने त्या आता पुरत्या जायबंदी झाल्या आहेत. त्यामुळे व्यवसाय बसला, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दहशतवादी हल्ल्यातून त्या बचावल्या असल्या, तरी रोजच्या लढाईने त्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्या सांगतात, दोन लहान मुलांना घेऊन आता मी परिस्थितीशी दोन हात करीत आहे.
......................
ंमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कोणी वडील, कोणी आई, मुले तर कोणी अख्खा परिवार गमावला. प्रत्येकाच्या दुर्दैवाचे दशावतार वेगळे. प्रत्येकाची कहाणी काळजाला घरे पाडणारी.
विजयादेवी आपल्या नातेवाईकांसह गोरखपूरला निघाल्या होत्या. त्यांचा पती, भाऊ आणि अन्य दोन महिला त्यांना निरोप देण्यासाठी सीएसटीपर्यंत आल्या होत्या. विजयादेवींच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग आजही अगदी स्पष्ट आहे. ""स्थानकावरील स्वच्छतागृहात जाऊन मी परतत असतानाच अचानक फायरिंग सुरू झाली. लोक धावत होते. माझ्याही पायाला गोळी लागली. मी कोसळले; पण कोसळताना मेस्त्रीलाल मौर्य या माझ्या सख्ख्या भावाला गोळी लागल्याचे मी पाहिले. त्याला वाचवायची ताकद माझ्यात नव्हती. माझ्या डोळ्यासमोर त्याचा मृत्यू झाला. तो क्रूर हल्ला... मी आयुष्यात असा प्रसंग कधी पाहिला नव्हता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोक आणि क्रूरकर्म्याचा तो अमानुष गोळीबार आजही विसरता येत नाही. माझा जीव वाचला; पण भावाचा मृत्यू झाल्याची सल मनात कायम आहे. निरपराध लोकांची घरे उद्ध्वस्त करणाऱ्या दहशतवाद्यांना फाशीच दिली पाहिजे.''
विजयादेवींची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. पतीला पक्षाघात झाल्यामुळे घरची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. बांगड्यांचा व्यवसाय करून त्या घर चालवत असत; मात्र पायाला गोळी लागल्याने त्या आता पुरत्या जायबंदी झाल्या आहेत. त्यामुळे व्यवसाय बसला, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दहशतवादी हल्ल्यातून त्या बचावल्या असल्या, तरी रोजच्या लढाईने त्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्या सांगतात, दोन लहान मुलांना घेऊन आता मी परिस्थितीशी दोन हात करीत आहे.
......................
मनावरच्या जखमा अजूनही वाहत आहेत...
मुंबई : प्रवाशांनी खचाखच भरलेल्या सीएसटी रेल्वेस्थानकावर हातात एके-47 रायफल घेऊन अमानुषपणे गोळीबार करणारे दहशतवादी... जीवाच्या आकांताने धावणारे प्रवासी... धावता धावता रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेले लोक, त्यांच्या किंकाळ्या... रेल्वेस्थानकावर झालेले हॅण्डग्रेनेडचे स्फोट... दहशत आणि दहशतवाद्यांचा तो नंगानाच आजही "त्यांच्या' नजरेसमोर जसाच्या तसा उभा राहतो. दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी केवळ त्यांच्या शरीरावरच जखमा केल्या नाहीत; तर त्यांच्या मानसिकतेवरही आघात केलेला आहे. त्यांच्या मनावरच्या जखमा आजही ओल्याच आहेत.
ंत्या हल्ल्यात गोळ्या लागून अपंगत्व आलेल्या लोकांच्या अंगावर आजही तो प्रसंग काटा उभा करतो. तेव्हाच्या आठवणी सांगताना अनेकांच्या भावना अनावर होत होत्या. दहशतवादाबद्दलची प्रचंड चीड, संताप त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.
पूनम सिंग या आपला सहा वर्षांचा मुलगा सचिनला घेऊन, त्या दिवशी वाराणसीला निघाल्या होत्या. सीएसटी रेल्वेस्थानकावर कसाब व त्याच्या साथीदाराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोघेही जखमी झाले होते. ""सचिनच्या हाताला आणि पायाला दोन गोळ्या लागल्या. सुदैवाने आम्ही दोघेही बचावलो; पण सचिनच्या वाट्याला अपंगत्व आले. त्याच्या हातात रॉड घालण्यात आला आहे. पायाची त्वचा कापून, त्याच्या हाताला लावण्यात आली आहे. मृत्यूचे ते थैमान मला अजूनही विसरता येत नाही'', असे पूनम यांनी सांगितले.
रेल्वे पोलिस सुशांत पांडा हे त्या दिवशी सीएसटीला फलाट क्रमांक 1 वर होते. ""स्टेशनमध्ये स्फोटांचे आवाज आल्यानंतर काहीतरी गंभीर घडत असल्याची जाणीव मला झाली. तोवर दोन लोक फायरिंग करीत येत असल्याचे दिसले. मी लोकांना बाहेर काढत होतो, एवढ्यात माझ्या पोटात गोळी लागली आणि मी कोसळलो. दहशतवाद्यांचे ते अमानुष क्रौर्य आणि लोकांची झालेली ती कत्तल कधीही विसरता येणार नाही'', असे सांगताना पांडा यांच्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या होत्या.
त्या दिवशी विजय खोत गोव्याला निघाले होते. भावाची बायको व मुलगी सोबत होती. ते सांगतात, ""मी प्लॅटफॉर्मवरील टॉयलेटमध्ये जाऊन परत येत असताना अचानक स्फोटांचे आवाज ऐकू आले. पाठोपाठ फायरिंग सुरू झाले. प्लॅटफॉर्मवर एकच धावपळ उडाली. लोक सैरावैरा पळू लागले. मी अतिरेक्यांच्या डाव्या बाजूला होतो. दोन्ही अतिरेक्यांचे एकमेकास कव्हर करीत शांतपणे फायरिंग सुरू होते. त्यांचे चेहरे निर्विकार होते. एक गोळी माझ्या मगटावरच्या घड्याळाला भेदून हातात शिरली. मी खाली पडलो. अर्धवट शुद्धीत अतिरेक्यांचा तो हैदोस मी पाहत होतो. लोक रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडले होते. माझ्या समोरच धावणारे दोघे जण गोळ्या लागून कोसळले आणि बहुधा गतप्राण झाले. संपूर्ण स्टेशनवर जणू त्या दहशतवाद्यांचेच राज्य होते. सगळे लोक चिडीचूप होते. फक्त रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांचा आवाज ऐकू येत होता. मी अर्धवट शुद्धीत असताना मला हातगाडीवर घालून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजही गोळ्यांचा तो आवाज आणि त्यानंतर झालेला आक्रोश, रक्ताच्या थारोळ्यातील ती दृश्ये मला छळतात. नीट झोपसुद्धा लागत नाही.''
सोलापूरच्या शब्बीर दलाल यांची रुग्णालयातून नुकतीच सुटका झाली. त्यांच्या पायात दोन गोळ्या घुसल्या होत्या. त्यांना अपंगत्व आले नि त्यांचे घरच बसले. दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या शब्बीरचा आता परिस्थितीशी झगडा सुरू आहे. त्यांची आता एकच मागणी आहे- कसाबला फाशी द्या.
ंत्या हल्ल्यात गोळ्या लागून अपंगत्व आलेल्या लोकांच्या अंगावर आजही तो प्रसंग काटा उभा करतो. तेव्हाच्या आठवणी सांगताना अनेकांच्या भावना अनावर होत होत्या. दहशतवादाबद्दलची प्रचंड चीड, संताप त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.
पूनम सिंग या आपला सहा वर्षांचा मुलगा सचिनला घेऊन, त्या दिवशी वाराणसीला निघाल्या होत्या. सीएसटी रेल्वेस्थानकावर कसाब व त्याच्या साथीदाराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोघेही जखमी झाले होते. ""सचिनच्या हाताला आणि पायाला दोन गोळ्या लागल्या. सुदैवाने आम्ही दोघेही बचावलो; पण सचिनच्या वाट्याला अपंगत्व आले. त्याच्या हातात रॉड घालण्यात आला आहे. पायाची त्वचा कापून, त्याच्या हाताला लावण्यात आली आहे. मृत्यूचे ते थैमान मला अजूनही विसरता येत नाही'', असे पूनम यांनी सांगितले.
रेल्वे पोलिस सुशांत पांडा हे त्या दिवशी सीएसटीला फलाट क्रमांक 1 वर होते. ""स्टेशनमध्ये स्फोटांचे आवाज आल्यानंतर काहीतरी गंभीर घडत असल्याची जाणीव मला झाली. तोवर दोन लोक फायरिंग करीत येत असल्याचे दिसले. मी लोकांना बाहेर काढत होतो, एवढ्यात माझ्या पोटात गोळी लागली आणि मी कोसळलो. दहशतवाद्यांचे ते अमानुष क्रौर्य आणि लोकांची झालेली ती कत्तल कधीही विसरता येणार नाही'', असे सांगताना पांडा यांच्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या होत्या.
त्या दिवशी विजय खोत गोव्याला निघाले होते. भावाची बायको व मुलगी सोबत होती. ते सांगतात, ""मी प्लॅटफॉर्मवरील टॉयलेटमध्ये जाऊन परत येत असताना अचानक स्फोटांचे आवाज ऐकू आले. पाठोपाठ फायरिंग सुरू झाले. प्लॅटफॉर्मवर एकच धावपळ उडाली. लोक सैरावैरा पळू लागले. मी अतिरेक्यांच्या डाव्या बाजूला होतो. दोन्ही अतिरेक्यांचे एकमेकास कव्हर करीत शांतपणे फायरिंग सुरू होते. त्यांचे चेहरे निर्विकार होते. एक गोळी माझ्या मगटावरच्या घड्याळाला भेदून हातात शिरली. मी खाली पडलो. अर्धवट शुद्धीत अतिरेक्यांचा तो हैदोस मी पाहत होतो. लोक रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडले होते. माझ्या समोरच धावणारे दोघे जण गोळ्या लागून कोसळले आणि बहुधा गतप्राण झाले. संपूर्ण स्टेशनवर जणू त्या दहशतवाद्यांचेच राज्य होते. सगळे लोक चिडीचूप होते. फक्त रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांचा आवाज ऐकू येत होता. मी अर्धवट शुद्धीत असताना मला हातगाडीवर घालून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजही गोळ्यांचा तो आवाज आणि त्यानंतर झालेला आक्रोश, रक्ताच्या थारोळ्यातील ती दृश्ये मला छळतात. नीट झोपसुद्धा लागत नाही.''
सोलापूरच्या शब्बीर दलाल यांची रुग्णालयातून नुकतीच सुटका झाली. त्यांच्या पायात दोन गोळ्या घुसल्या होत्या. त्यांना अपंगत्व आले नि त्यांचे घरच बसले. दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या शब्बीरचा आता परिस्थितीशी झगडा सुरू आहे. त्यांची आता एकच मागणी आहे- कसाबला फाशी द्या.
स्कूल बस आता होणार अधिक सुरक्षित
परिवहन विभागाने उगारला नियमांचा दंडुका
मुंबई, ता. 26 : असुरक्षितपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि त्याची जबाबदारी झटकणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर परिवहन विभागाने आता नियमांचा दंडुका उगारला आहे. नवीन नियमावलीमुळे स्कूल बस आता अधिक सुरक्षित होणार आहेत.
परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, परिवहन विभागाचे आयुक्त दीपक कपूर यांच्या उपस्थितीत आज माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात "शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक' या विषयावर चर्चासत्र झाले. वाहतूक विभागाने प्रस्तावित नियमावलीबाबत या वेळी सूचना व हरकती ऐकून घेतल्या. या वेळी विद्यार्थी बस वाहतूक संघटनेने स्कूल बसचे आयुर्मान आठ वर्षे ठेवण्यास विरोध करीत ते वाढविण्याची मागणी केली. तसेच स्त्री काळजीवाहक मिळणार नाही, असा सूर लावला.
आजवर स्कूल बसला अपघात झाल्यास शाळा-व्यवस्थापन त्याची जबाबदारी झटकत असे; आता मात्र स्कूल बसच्या कंत्राटदारासह शाळेच्या मुख्याध्यापकांनाही जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे स्कूल बसच्या वाहतुकीकडे शाळा व्यवस्थापनाला लक्ष देणे भाग पडणार असून, विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीला लगाम बसू शकेल.
स्कूल बसचा रंग पिवळा असावा, त्यावर दोन्ही बाजूंना निळा अथवा लाल रंगाचा पट्टा असावा, दोन्ही बाजूंना स्कूल बस म्हणून पाटी असावी; अन्य कामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्कूल बसवर 10 इंचांचा निळ्या रंगाचा पट्टा असावा, स्कूल बसला उजव्या बाजूला आपत्कालीन दरवाजा असावा, स्कूल बसचालकाला वाहतुकीचा तीन वर्षांचा अनुभव असावा, चालक आणि काळजीवाहकाला पोलिसांकडून सद्वर्तनाचा दाखला घेणे बंधनकारक राहणार आहे. मुलींच्या स्कूल बसमध्ये महिला काळजीवाहक आवश्यक, बसचालकाचे वय 58 वर्षांपेक्षा जास्त नसावे, बसचालक आणि काळजीवाहक यांनी वाहतूक विभागाकडून आपत्कालीन प्रशिक्षण घ्यावे. स्कूल बस रस्त्यावर उभ्या न करता विद्यार्थ्यांची ने-आण शाळेच्या आवारातून करावी. प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, रक्तगट असे रेकॉर्ड असावे, खिडक्यांना ऍल्युमिनियमच्या जाळ्या बसवाव्यात आदी प्रस्तावित नियमावली आजच्या चर्चासत्रात मांडण्यात आली. परिवहन विभागाकडून या नियमावलीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ही नियमावली विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना लागू करण्यात येणार असून, स्कूल बसबाबत शाळांनाही जबाबदार धरले जाणार आहे.
या वेळी परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्कूल बस वाहतूकदार, पालक संघटना, शाळांचे प्रतिनिधी यांच्या सूचना ऐकून घेतल्या. राज्यातील अन्य शहरांतही चर्चासत्रे आयोजित केली जाणार असून, त्यानंतर या नियमावलीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
...........
नवी नियमावली
* स्कूल बस पिवळ्या रंगाच्या असाव्यात.
* उजव्या बाजूला आपत्कालीन दरवाजा असावा.
* आठ वर्षांपेक्षा जुन्या स्कूल बस वाहतुकीसाठी वापरू नयेत.
* बसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे रेकॉर्ड, प्रथमोपचाराची पेटी व आगप्रतिबंधात्मक यंत्रणा ठेवणे बंधनकारक.
* मुलींच्या स्कूल बसमध्ये महिला काळजीवाहक आवश्यक.
चौकट :
परवाना नसल्यास कारवाई
स्कूल बससाठी तयार करण्यात आलेले नियम विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, मारुती, टाटा सुमो आदी गाड्यांना लागू करण्यात येणार असून, त्यांना विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा परवाना घ्यावा लागणार आहे. परवाना नसलेल्या वाहनांवर कारवाई करू, अशी माहिती परिवहन सचिव संगीतराव यांनी दिली.
-----------------
मुंबई, ता. 26 : असुरक्षितपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि त्याची जबाबदारी झटकणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर परिवहन विभागाने आता नियमांचा दंडुका उगारला आहे. नवीन नियमावलीमुळे स्कूल बस आता अधिक सुरक्षित होणार आहेत.
परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, परिवहन विभागाचे आयुक्त दीपक कपूर यांच्या उपस्थितीत आज माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात "शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक' या विषयावर चर्चासत्र झाले. वाहतूक विभागाने प्रस्तावित नियमावलीबाबत या वेळी सूचना व हरकती ऐकून घेतल्या. या वेळी विद्यार्थी बस वाहतूक संघटनेने स्कूल बसचे आयुर्मान आठ वर्षे ठेवण्यास विरोध करीत ते वाढविण्याची मागणी केली. तसेच स्त्री काळजीवाहक मिळणार नाही, असा सूर लावला.
आजवर स्कूल बसला अपघात झाल्यास शाळा-व्यवस्थापन त्याची जबाबदारी झटकत असे; आता मात्र स्कूल बसच्या कंत्राटदारासह शाळेच्या मुख्याध्यापकांनाही जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे स्कूल बसच्या वाहतुकीकडे शाळा व्यवस्थापनाला लक्ष देणे भाग पडणार असून, विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीला लगाम बसू शकेल.
स्कूल बसचा रंग पिवळा असावा, त्यावर दोन्ही बाजूंना निळा अथवा लाल रंगाचा पट्टा असावा, दोन्ही बाजूंना स्कूल बस म्हणून पाटी असावी; अन्य कामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्कूल बसवर 10 इंचांचा निळ्या रंगाचा पट्टा असावा, स्कूल बसला उजव्या बाजूला आपत्कालीन दरवाजा असावा, स्कूल बसचालकाला वाहतुकीचा तीन वर्षांचा अनुभव असावा, चालक आणि काळजीवाहकाला पोलिसांकडून सद्वर्तनाचा दाखला घेणे बंधनकारक राहणार आहे. मुलींच्या स्कूल बसमध्ये महिला काळजीवाहक आवश्यक, बसचालकाचे वय 58 वर्षांपेक्षा जास्त नसावे, बसचालक आणि काळजीवाहक यांनी वाहतूक विभागाकडून आपत्कालीन प्रशिक्षण घ्यावे. स्कूल बस रस्त्यावर उभ्या न करता विद्यार्थ्यांची ने-आण शाळेच्या आवारातून करावी. प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, रक्तगट असे रेकॉर्ड असावे, खिडक्यांना ऍल्युमिनियमच्या जाळ्या बसवाव्यात आदी प्रस्तावित नियमावली आजच्या चर्चासत्रात मांडण्यात आली. परिवहन विभागाकडून या नियमावलीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ही नियमावली विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना लागू करण्यात येणार असून, स्कूल बसबाबत शाळांनाही जबाबदार धरले जाणार आहे.
या वेळी परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्कूल बस वाहतूकदार, पालक संघटना, शाळांचे प्रतिनिधी यांच्या सूचना ऐकून घेतल्या. राज्यातील अन्य शहरांतही चर्चासत्रे आयोजित केली जाणार असून, त्यानंतर या नियमावलीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
...........
नवी नियमावली
* स्कूल बस पिवळ्या रंगाच्या असाव्यात.
* उजव्या बाजूला आपत्कालीन दरवाजा असावा.
* आठ वर्षांपेक्षा जुन्या स्कूल बस वाहतुकीसाठी वापरू नयेत.
* बसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे रेकॉर्ड, प्रथमोपचाराची पेटी व आगप्रतिबंधात्मक यंत्रणा ठेवणे बंधनकारक.
* मुलींच्या स्कूल बसमध्ये महिला काळजीवाहक आवश्यक.
चौकट :
परवाना नसल्यास कारवाई
स्कूल बससाठी तयार करण्यात आलेले नियम विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, मारुती, टाटा सुमो आदी गाड्यांना लागू करण्यात येणार असून, त्यांना विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा परवाना घ्यावा लागणार आहे. परवाना नसलेल्या वाहनांवर कारवाई करू, अशी माहिती परिवहन सचिव संगीतराव यांनी दिली.
-----------------
अतिरेक्यांचे संरक्षण करावे लागते याची खंत
मुंबई, ता. 25 : हैवानालाही लाजवेल अशा पद्धतीने निरपराध नागरिकांची आणि पोलिसांची गोळ्या झाडून चाळण केली, त्या क्रूरकर्म्या अजमल कसाबचे आणि अतिरेक्यांच्या मृतदेहांचे संरक्षण करण्याची वेळ पोलिसांवर आलीय. त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील... देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या दहशतवाद्यांना एव्हाना फासावर चढवायला हवे होते; मात्र त्यांचे चोचले पुरविले जात आहेत. हीच गोष्ट मनाला डागण्या देतेय... अशा शब्दांत मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्याला पकडण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांची मुलगी वैशाली हिने "सकाळ'कडे आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली.
मुंबईवर झालेल्या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याला पकडण्यासाठी ओंबळे यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. त्यामुळे आज पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करण्याची संधी भारताला लाभली. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे; मात्र या हल्ल्यातील आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाही. याची खंत वैशालीसह सर्व हुतात्म्यांच्या नातेवाइकांना आहे.
अतिरेक्यांच्या एके-47 रायफलला वाघाच्या छातीने सामोरे जाणाऱ्या तुकाराम ओंबळे यांच्यातील प्रेमळ बाबांच्या आठवणी ओंबळे कुटुंबीयांच्या मनात कायम घर करून राहिलेल्या आहेत. या आठवणींना उजाळा देताना वैशालीला भावना आवरल्या नाहीत. ""बाबांना लहान मुले खूप आवडायची. त्यांच्याशी खेळायला त्यांना आवडायचे. चांगले माणूस म्हणून जागा. लोकांच्या उपयोगी पडा'', अशी त्यांची शिकवण होती. म्हणूनच मी शिक्षक व्हावे, असे त्यांचे स्वप्न होते. बाबांच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा कर्ता-धर्ता हरपला. त्यामुळे आमचे कशातच मन रमत नव्हते. मात्र या साऱ्या अडचणींवर मात करीत हे कुटुंब खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. मी बी.एड्. पूर्ण करून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे'', असे वैशाली अभिमानाने सांगते.
रक्षाबंधनच्या दिवशी ते आम्हाला त्यांना राखी बांधायला सांगत. आम्ही त्यांच्या मुली होतो आणि बहिणीही. असे त्यांचे प्रेमळ वागणे होते. गतवर्षी 26 नोव्हेंबरला मला केक खाण्याची इच्छा झाली होती. मी आईला म्हटले बाबांनी आज केक आणला, तर किती बरे होईल. तेवढ्यातच नाईट ड्युटी संपवून सकाळी 10 वाजता बाबा घरी आले. तेव्हा त्यांच्या हातात केक होता. मी त्यांना विचारले, "बाबा तुम्हाला कसे कळले, मला केक खायचा आहे...' त्यावर ते हसत म्हणाले, "मी तुमचा बाप आहे. मुलांची इच्छा बापालाच कळणार.' त्या वेळी पुढच्या संकटाची कोणालाच कल्पना आली नाही. त्याच दिवशी रात्री अतिरेक्याला पकडताना बाबा हुतात्मा झाले, असे सांगताना वैशालीचा कंठ दाटून आला.
मुंबईसह देशभरातील लोकांनी आम्हाला आधार दिला. लोक पाठीशी उभे राहिले. त्यामुळे आम्ही सावरू शकलो; पण आता सहानुभूतीच्या पाठलाग करणाऱ्या नजराही आम्हाला नकोशा वाटतात. शासनाने कितीही मदत दिली तरी आमचे बाबा परत येणार नाहीत. देशासाठी त्यांनी केलेल्या त्यागाचा, त्यांच्या शौर्याचा आम्हाला अभिमान आहेच; पण त्या एके-47 रायफलला वाघाच्या छातीने सामोरे जाणाऱ्या प्रेमळ बाबांच्या आठवणी मनात कायम घर करून राहिल्या आहेत.
इन्फोबॉक्स :
बदलीची टांगती तलवार आणि कामाचे अमर्याद तास, कमी पगार या समस्या असल्याने बाबांना आम्ही पोलिस दलात जावे, असे वाटत नव्हते; मात्र आपल्या खात्याचा त्यांना सार्थ अभिमान होता. कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याची त्यांची वृत्ती होती. त्याच भावनेतून प्राणाची आहुती दिली. 26/11 च्या घटनेतून धडा घेऊन सरकारने पोलिसांच्या कामाचे तास कमी केले पाहिजेत. त्यांना अत्याधुनिक शस्त्रे द्यावीत. सोई-सुविधा द्याव्यात, अशी मागणी तिने या वेळी केली.
........
मुंबईवर झालेल्या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याला पकडण्यासाठी ओंबळे यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. त्यामुळे आज पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करण्याची संधी भारताला लाभली. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे; मात्र या हल्ल्यातील आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाही. याची खंत वैशालीसह सर्व हुतात्म्यांच्या नातेवाइकांना आहे.
अतिरेक्यांच्या एके-47 रायफलला वाघाच्या छातीने सामोरे जाणाऱ्या तुकाराम ओंबळे यांच्यातील प्रेमळ बाबांच्या आठवणी ओंबळे कुटुंबीयांच्या मनात कायम घर करून राहिलेल्या आहेत. या आठवणींना उजाळा देताना वैशालीला भावना आवरल्या नाहीत. ""बाबांना लहान मुले खूप आवडायची. त्यांच्याशी खेळायला त्यांना आवडायचे. चांगले माणूस म्हणून जागा. लोकांच्या उपयोगी पडा'', अशी त्यांची शिकवण होती. म्हणूनच मी शिक्षक व्हावे, असे त्यांचे स्वप्न होते. बाबांच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा कर्ता-धर्ता हरपला. त्यामुळे आमचे कशातच मन रमत नव्हते. मात्र या साऱ्या अडचणींवर मात करीत हे कुटुंब खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. मी बी.एड्. पूर्ण करून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे'', असे वैशाली अभिमानाने सांगते.
रक्षाबंधनच्या दिवशी ते आम्हाला त्यांना राखी बांधायला सांगत. आम्ही त्यांच्या मुली होतो आणि बहिणीही. असे त्यांचे प्रेमळ वागणे होते. गतवर्षी 26 नोव्हेंबरला मला केक खाण्याची इच्छा झाली होती. मी आईला म्हटले बाबांनी आज केक आणला, तर किती बरे होईल. तेवढ्यातच नाईट ड्युटी संपवून सकाळी 10 वाजता बाबा घरी आले. तेव्हा त्यांच्या हातात केक होता. मी त्यांना विचारले, "बाबा तुम्हाला कसे कळले, मला केक खायचा आहे...' त्यावर ते हसत म्हणाले, "मी तुमचा बाप आहे. मुलांची इच्छा बापालाच कळणार.' त्या वेळी पुढच्या संकटाची कोणालाच कल्पना आली नाही. त्याच दिवशी रात्री अतिरेक्याला पकडताना बाबा हुतात्मा झाले, असे सांगताना वैशालीचा कंठ दाटून आला.
मुंबईसह देशभरातील लोकांनी आम्हाला आधार दिला. लोक पाठीशी उभे राहिले. त्यामुळे आम्ही सावरू शकलो; पण आता सहानुभूतीच्या पाठलाग करणाऱ्या नजराही आम्हाला नकोशा वाटतात. शासनाने कितीही मदत दिली तरी आमचे बाबा परत येणार नाहीत. देशासाठी त्यांनी केलेल्या त्यागाचा, त्यांच्या शौर्याचा आम्हाला अभिमान आहेच; पण त्या एके-47 रायफलला वाघाच्या छातीने सामोरे जाणाऱ्या प्रेमळ बाबांच्या आठवणी मनात कायम घर करून राहिल्या आहेत.
इन्फोबॉक्स :
बदलीची टांगती तलवार आणि कामाचे अमर्याद तास, कमी पगार या समस्या असल्याने बाबांना आम्ही पोलिस दलात जावे, असे वाटत नव्हते; मात्र आपल्या खात्याचा त्यांना सार्थ अभिमान होता. कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याची त्यांची वृत्ती होती. त्याच भावनेतून प्राणाची आहुती दिली. 26/11 च्या घटनेतून धडा घेऊन सरकारने पोलिसांच्या कामाचे तास कमी केले पाहिजेत. त्यांना अत्याधुनिक शस्त्रे द्यावीत. सोई-सुविधा द्याव्यात, अशी मागणी तिने या वेळी केली.
........
ठाकरे घराण्यात दुसरे बंड?
बाळासाहेबांची सून स्मिता ठाकरे कॉंग्रेसच्या वाटेवर
मुंबई, ता. 28 : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार न करता "आईसमोर सर्व पर्याय खुले आहेत. ती आपला निर्णय योग्य वेळी जाहीर करेल,' असे स्पष्ट करीत स्मिता ठाकरे यांच्या कॉंग्रेस प्रवेशाला त्यांचे पुत्र राहुल ठाकरे यांनी आज दुजोरा दिला. राज ठाकरे यांच्या बंडानंतर ठाकरे घराण्यात दुसऱ्या बंडाची शक्यता त्यामुळे निर्माण झाली असून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठीच हे प्रयत्न सुरू असल्याचे मानले जाते. स्मिता ठाकरे आणि राज्याचे महसूलमंत्री नारायण राणे यांची युतीचे सरकार असल्यापासून मतैक्य आहे.
शिवसेनेत गळचेपी होत असल्याची स्मिता यांची भावना झाली आहे. राज्यसभेवर जाण्यासाठी त्या इच्छुक होत्या; मात्र त्यांना डावलून पत्रकार भारतकुमार राऊत यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या "सामना'मध्ये लेख प्रसिद्ध करण्यास बंदी घातली गेली. तेव्हापासून त्या उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. आपल्याला उद्धव यांच्यामुळेच "मातोश्री' सोडावे लागले, अशी ठाम धारणा असतानाच पुढील घटनांमुळे या नाराजीत भर पडली. राज ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचे कधीही सख्य नव्हते. युतीच्या काळात अखेरच्या टप्प्यात राणे यांना मुख्यमंत्रिपदी आणण्यात स्मिता ठाकरे याच कारणीभूत होत्या. राणे आणि स्मिता यांच्यातील या एकीमुळेच त्यांचा कॉंग्रेसप्रवेश अनुकूल होण्यास राणेच जाबाबदार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे; मात्र त्याला राणे यांच्याकडून दुजोरा मिळाला नाही. ठाकरे कुटुंबातील वाद पुन्हा एकदा शिगेला पोचला असल्याने त्यात दबावतंत्राचा भाग म्हणून स्मिता ठाकरे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. कुटुंबाशी संपूर्णपणे संबंध तोडण्याची स्मिता ठाकरे यांची आत्ताच इच्छा दिसत नाही. आपल्या सासऱ्यांविषयी म्हणूनच त्यांनी कोणतेही कटू विधान केलेले नाही. शिवसेनेचा आत्मविश्वास ढळला असतानाच स्मिता ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्यास तो ठाकरे घराण्याला, पर्यायाने शिवसेनेला धक्का मानला जातो.
दिल्लीतून कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दिग्विजय सिंह हा विषय हाताळत असल्याचे येथे समजते. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्मिता यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीने आपण प्रभावीत झालो आहोत. कॉंग्रेसचे आणि आपले विचार जुळत असल्याचे त्यांनी सांगितले. मनसेमध्ये जाण्याचा आपला कधीच विचार नव्हता, असेही त्यांनी नमूद केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त करतानाच त्यांनी, ठाकरे घराण्यातील काही व्यक्तींनी आपले चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रातील अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला, असा खळबळजनक आरोप केला. बाळासाहेबांनी आपला लेख "सामना'मध्ये छापला नाही, अशी नाराजीही त्यांनी मुलाखतीत प्रकट केली. या पार्श्वभूमीवर आज राहुल ठाकरे यांनी आपल्या आईच्या वतीने पत्रकारांकडे खुलासा केला. "आईसमोर सर्व पर्याय खुले आहेत; मात्र कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय झालेला नाही. राजकारणाकडे ती सत्ताकेंद्र म्हणून नाही, तर सामाजिक कार्याच्या दृष्टीने पाहते,' असे सांगतानाच शिवसेनेत त्यांची गळचेपी झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. "माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात श्रद्धा आहे. त्यांना दुखविण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. ते आदरणीय राहतील. स्मिता ठाकरे या योग्य वेळी आपला निर्णय पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील,' असे राहुल यांनी स्पष्ट केले.
...............
चौकट :
उद्धव ठाकरे :
"प्रत्येक जण निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे,' या एका वाक्यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्मिता ठाकरे यांना आपल्या लेखी काहीही किंमत नसल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी याप्रकरणी कानावर हात ठेवले.
...............
ठाकरेंचा हिरवा कंदील
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी "स्मिता ठाकरे कॉंग्रेसमध्ये आल्यास त्यांचे स्वागत आहे. त्यांना विरोध असण्याचे कारण नाही,' असे सांगत त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला.
मुंबई, ता. 28 : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार न करता "आईसमोर सर्व पर्याय खुले आहेत. ती आपला निर्णय योग्य वेळी जाहीर करेल,' असे स्पष्ट करीत स्मिता ठाकरे यांच्या कॉंग्रेस प्रवेशाला त्यांचे पुत्र राहुल ठाकरे यांनी आज दुजोरा दिला. राज ठाकरे यांच्या बंडानंतर ठाकरे घराण्यात दुसऱ्या बंडाची शक्यता त्यामुळे निर्माण झाली असून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठीच हे प्रयत्न सुरू असल्याचे मानले जाते. स्मिता ठाकरे आणि राज्याचे महसूलमंत्री नारायण राणे यांची युतीचे सरकार असल्यापासून मतैक्य आहे.
शिवसेनेत गळचेपी होत असल्याची स्मिता यांची भावना झाली आहे. राज्यसभेवर जाण्यासाठी त्या इच्छुक होत्या; मात्र त्यांना डावलून पत्रकार भारतकुमार राऊत यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या "सामना'मध्ये लेख प्रसिद्ध करण्यास बंदी घातली गेली. तेव्हापासून त्या उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. आपल्याला उद्धव यांच्यामुळेच "मातोश्री' सोडावे लागले, अशी ठाम धारणा असतानाच पुढील घटनांमुळे या नाराजीत भर पडली. राज ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचे कधीही सख्य नव्हते. युतीच्या काळात अखेरच्या टप्प्यात राणे यांना मुख्यमंत्रिपदी आणण्यात स्मिता ठाकरे याच कारणीभूत होत्या. राणे आणि स्मिता यांच्यातील या एकीमुळेच त्यांचा कॉंग्रेसप्रवेश अनुकूल होण्यास राणेच जाबाबदार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे; मात्र त्याला राणे यांच्याकडून दुजोरा मिळाला नाही. ठाकरे कुटुंबातील वाद पुन्हा एकदा शिगेला पोचला असल्याने त्यात दबावतंत्राचा भाग म्हणून स्मिता ठाकरे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. कुटुंबाशी संपूर्णपणे संबंध तोडण्याची स्मिता ठाकरे यांची आत्ताच इच्छा दिसत नाही. आपल्या सासऱ्यांविषयी म्हणूनच त्यांनी कोणतेही कटू विधान केलेले नाही. शिवसेनेचा आत्मविश्वास ढळला असतानाच स्मिता ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्यास तो ठाकरे घराण्याला, पर्यायाने शिवसेनेला धक्का मानला जातो.
दिल्लीतून कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दिग्विजय सिंह हा विषय हाताळत असल्याचे येथे समजते. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्मिता यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीने आपण प्रभावीत झालो आहोत. कॉंग्रेसचे आणि आपले विचार जुळत असल्याचे त्यांनी सांगितले. मनसेमध्ये जाण्याचा आपला कधीच विचार नव्हता, असेही त्यांनी नमूद केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त करतानाच त्यांनी, ठाकरे घराण्यातील काही व्यक्तींनी आपले चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रातील अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला, असा खळबळजनक आरोप केला. बाळासाहेबांनी आपला लेख "सामना'मध्ये छापला नाही, अशी नाराजीही त्यांनी मुलाखतीत प्रकट केली. या पार्श्वभूमीवर आज राहुल ठाकरे यांनी आपल्या आईच्या वतीने पत्रकारांकडे खुलासा केला. "आईसमोर सर्व पर्याय खुले आहेत; मात्र कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय झालेला नाही. राजकारणाकडे ती सत्ताकेंद्र म्हणून नाही, तर सामाजिक कार्याच्या दृष्टीने पाहते,' असे सांगतानाच शिवसेनेत त्यांची गळचेपी झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. "माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात श्रद्धा आहे. त्यांना दुखविण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. ते आदरणीय राहतील. स्मिता ठाकरे या योग्य वेळी आपला निर्णय पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील,' असे राहुल यांनी स्पष्ट केले.
...............
चौकट :
उद्धव ठाकरे :
"प्रत्येक जण निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे,' या एका वाक्यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्मिता ठाकरे यांना आपल्या लेखी काहीही किंमत नसल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी याप्रकरणी कानावर हात ठेवले.
...............
ठाकरेंचा हिरवा कंदील
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी "स्मिता ठाकरे कॉंग्रेसमध्ये आल्यास त्यांचे स्वागत आहे. त्यांना विरोध असण्याचे कारण नाही,' असे सांगत त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला.
तिसऱ्या दिवशीही "कॅट'चा सावळागोंधळ
देशभरातील चार हजार विद्यार्थ्यांना फटका
मुंबई, ता. 30 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम)च्या कॉमन ऍप्टिट्यूड टेस्ट अर्थात "कॅट' परीक्षेतील तांत्रिक बिघाडाचा सावळागोंधळ आज तिसऱ्या दिवशीही कायम होता. त्यामुळे मुंबई, बंगलोर आणि गाझियाबाद येथील पाच केंद्रांवरील विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित राहावे लागले. या तीन दिवसांत देशभरातील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना या गोंधळाचा फटका बसला आहे.
गेल्या शुक्रवारपासून ही परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडाचे विघ्न आल्याने देशभरातील अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षाच देता आली नाही. आज मुंबईतील साबुसिद्दिकी कॉलेज, फादर ऍग्नेल कॉलेज, वांद्रे येथील परीक्षा केंद्रांवर तांत्रिक बिघाडाचा सावळागोंधळ झाल्याने अनेक जणांना परीक्षा न देताच मागे परतावे लागले. बंगलोर येथील गार्डन सिटी कॉलेज आणि गाझियाबाद येथील एका परीक्षा केंद्रावरही असाच गोंधळ उडाला. काल बंगलोर (11 ठिकाणी), भोपाळ (आठ ठिकाणी), लखनौ (सहा ठिकाणी), दिल्ली (पाच ठिकाणी), गाझियाबाद (चार ठिकाणी) तसेच वाराणसी, हैदराबाद, भुवनेश्वर, चंडिगड, नागपूर, कोलकत्ता, कोइमतूर आदी ठिकाणीही सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा होऊ शकली नव्हती. देशातील सात आयआयएम इन्स्टिट्यूट व अन्य महाविद्यालयांतील प्रवेशासाठी ही परीक्षा होत आहे. या वर्षी प्रथमच ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्याचा फियास्को झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान, परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी दिली जाणार असून त्यांच्यासाठी सुधारित वेळापत्रक ई-मेल व एसएमएसच्या माध्यमातून कळवले जाईल, असे "आयआयएम'कडून सांगण्यात आल्याचे एका परीक्षार्थीने सांगितले.
चौकट.....
दोष कुणाचा?
सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले युजर्स नेम आणि पासवर्ड संगणकामार्फत स्वीकारले न जाणे या समस्येने सोमवारीही परीक्षार्थींचा पिच्छा पुरवला. त्यामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. व्हायरसमुळे हा तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता परीक्षा संचालकांमार्फत व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कॅटचे वर्ग चालविणाऱ्या टाइम इन्स्टिट्यूटने मात्र यावर आक्षेप नोंदवत "आयआयएम'मधील अप्रशिक्षित लोकांमुळे यंत्रणेत गोंधळ झाल्याचा आरोप केला आहे. व्हायरस असेल तर ऍन्टिव्हायरसचा वापर का केला नाही, असा सवाल "टाइम'ने केला आहे.
मुंबई, ता. 30 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम)च्या कॉमन ऍप्टिट्यूड टेस्ट अर्थात "कॅट' परीक्षेतील तांत्रिक बिघाडाचा सावळागोंधळ आज तिसऱ्या दिवशीही कायम होता. त्यामुळे मुंबई, बंगलोर आणि गाझियाबाद येथील पाच केंद्रांवरील विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित राहावे लागले. या तीन दिवसांत देशभरातील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना या गोंधळाचा फटका बसला आहे.
गेल्या शुक्रवारपासून ही परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडाचे विघ्न आल्याने देशभरातील अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षाच देता आली नाही. आज मुंबईतील साबुसिद्दिकी कॉलेज, फादर ऍग्नेल कॉलेज, वांद्रे येथील परीक्षा केंद्रांवर तांत्रिक बिघाडाचा सावळागोंधळ झाल्याने अनेक जणांना परीक्षा न देताच मागे परतावे लागले. बंगलोर येथील गार्डन सिटी कॉलेज आणि गाझियाबाद येथील एका परीक्षा केंद्रावरही असाच गोंधळ उडाला. काल बंगलोर (11 ठिकाणी), भोपाळ (आठ ठिकाणी), लखनौ (सहा ठिकाणी), दिल्ली (पाच ठिकाणी), गाझियाबाद (चार ठिकाणी) तसेच वाराणसी, हैदराबाद, भुवनेश्वर, चंडिगड, नागपूर, कोलकत्ता, कोइमतूर आदी ठिकाणीही सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा होऊ शकली नव्हती. देशातील सात आयआयएम इन्स्टिट्यूट व अन्य महाविद्यालयांतील प्रवेशासाठी ही परीक्षा होत आहे. या वर्षी प्रथमच ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्याचा फियास्को झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान, परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी दिली जाणार असून त्यांच्यासाठी सुधारित वेळापत्रक ई-मेल व एसएमएसच्या माध्यमातून कळवले जाईल, असे "आयआयएम'कडून सांगण्यात आल्याचे एका परीक्षार्थीने सांगितले.
चौकट.....
दोष कुणाचा?
सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले युजर्स नेम आणि पासवर्ड संगणकामार्फत स्वीकारले न जाणे या समस्येने सोमवारीही परीक्षार्थींचा पिच्छा पुरवला. त्यामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. व्हायरसमुळे हा तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता परीक्षा संचालकांमार्फत व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कॅटचे वर्ग चालविणाऱ्या टाइम इन्स्टिट्यूटने मात्र यावर आक्षेप नोंदवत "आयआयएम'मधील अप्रशिक्षित लोकांमुळे यंत्रणेत गोंधळ झाल्याचा आरोप केला आहे. व्हायरस असेल तर ऍन्टिव्हायरसचा वापर का केला नाही, असा सवाल "टाइम'ने केला आहे.
विक्रांत'ला मुंबईकरांचा सलाम
ंमुंबई : भारतीय नौदलाची एकेकाळी शान असलेली "आयएनएस-विक्रांत' ही विमानवाहू युद्धनौका नौदल सप्ताहाच्या निमित्ताने मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली असून, विजयाची अनोखी गाथा ठरलेल्या या युद्धनौकेला पाहण्यासाठी आबालवृद्धांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. तीन दिवसांत 28 हजार मुंबईकरांनी "विक्रांत'च्या पराक्रमाला सलाम केला.
नौदलाच्या सेवेतून "विक्रांत' निवृत्त झाली असली, तरी आजही तिच्याबद्दलचे आकर्षण प्रत्येकाच्या मनात कायम आहे. भारतीय नौदलाचे सामर्थ्य नागरिकांना पाहता यावे यासाठी या युद्धनौकेचे टायगर गेटजवळ वस्तुसंग्रहालयात रूपांतर करण्यात आले असून, पराक्रमाच्या खुणा आपल्या अंगावर मिरविणाऱ्या "विक्रांत'ला पाहून अनेकांचा उर अभिमानाने भरून येतो. पाकिस्तानबरोबर झालेल्या 1971 च्या युद्धात "विक्रांत'ने अजोड
कामगिरी बजावली होती. शत्रुराष्ट्राच्या नौदलाचे कंबरडे "विक्रांत'ने मोडले होते. त्यामुळे ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या गळ्यातील ताईत बनली. पराक्रम गाजविणाऱ्या या युद्धनौकेला भंगारात न काढता तिचा इतिहास आजच्या पिढीसाठी जिवंत ठेवण्यात आला आहे. नौदल सप्ताहानिमित्त सध्या 6 डिसेंबरपर्यंत "विक्रांत' मुंबईकरांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे तिला पाहण्यासाठी मुंबईकरांची रीघ लागली आहे. "विक्रांत'च्या पराक्रमाची गाथा ऐकलेली असल्याने तिला प्रत्यक्ष पाहण्याचा मोह वयोवृद्धांनाही आवरता येत नसल्याचे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडे पाहिल्यानंतर जाणवते.
युद्धनौकेचा प्रचंड विस्तारलेला डेक, त्यावरील सी-हॉक बॉम्बर विमाने, चेतक हेलिकॉप्टर, सी हॅरीअर, बरजेट अलाईज, मशीन्सगन्स्... हे सारे कुतूहलपूर्ण न्याहाळतानाच मनोमन तिला सॅल्यूट करायला नागरिक विसरत नाहीत. देशासाठी "विक्रांत'ने बजावलेल्या कामगिरीमुळे देशाभिमानाने उर भरून येतो.
असा आहे इतिहास
"विक्रांत'चे मूळ नाव "एचएमएस हेरकुलर्स' (आर-49) होते. इंग्लंडमधील विकेर आर्मस्ट्रॉंग / हारलॅण्ड वुल्फ यांनी या अजस्र युद्धनौकेची बांधणी केली. 22 सप्टेंबर 1945 रोजी ब्रिटनच्या सेवेत ती दाखल झाली. दुसऱ्या महायुद्धात तिने पराक्रम गाजवला. त्यानंतर भारताने "एचएमएस हेरकुलर्स' खरेदी करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 1957 मध्ये इंग्लंडने ती भारताला विकली. त्या वेळी इंग्लंडमधील भारताच्या उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी करारावर स्वाक्षरी केली. 1961 मध्ये विक्रांत भारतात आली. मुंबईतील बॅलार्ड पिअर येथे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिचे स्वागत केले आणि "एचएमएस हेरकुलर्स'चे नाव बदलून संस्कृत नावावरून "विक्रांत' म्हणजे "धैर्य' असे तिचे नामकरण करण्यात आले.
अजोड कामगिरी
भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यानंतर 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या बांगलादेशमुक्तीच्या युद्धात "विक्रांत'ने अजोड कामगिरी करीत आपले नाव सार्थकी लावले. पाकिस्तानचा धुव्वा उडविला. "विक्रांत'च्या डेकवरून उडणाऱ्या बॉम्बर्सनी ऑक्सबाजारमध्ये बॉम्बिंग करून हलकल्लोळ उडविला. पाकिस्तानला प्रतिकार करण्याची संधीच दिली नाही. बांगलादेशचे युद्ध भारताने जिंकले. प्रीतम सिंग हे या युद्धनौकेचे पहिले कमांडिंग ऑफिसर होते. वीस वर्षे भारतीय नौदलाची सेवा केल्यानंतर "विक्रांत' निवृत्त झाली; मात्र "विक्रांत'च्या पराक्रमाची गाथा आजही या युद्धनौकेवर जाणाऱ्या प्रत्येकाला स्फूर्ती देते. म्हणून आजही मुंबईकरांची पावले "विक्रांत'कडे वळत आहेत.
.......
अशी आहे "विक्रांत'
जेस्टिक क्लास
19,500 टन वजन
704 फूट लांबी
128 फूट रुंदी
............
नौदलाच्या सेवेतून "विक्रांत' निवृत्त झाली असली, तरी आजही तिच्याबद्दलचे आकर्षण प्रत्येकाच्या मनात कायम आहे. भारतीय नौदलाचे सामर्थ्य नागरिकांना पाहता यावे यासाठी या युद्धनौकेचे टायगर गेटजवळ वस्तुसंग्रहालयात रूपांतर करण्यात आले असून, पराक्रमाच्या खुणा आपल्या अंगावर मिरविणाऱ्या "विक्रांत'ला पाहून अनेकांचा उर अभिमानाने भरून येतो. पाकिस्तानबरोबर झालेल्या 1971 च्या युद्धात "विक्रांत'ने अजोड
कामगिरी बजावली होती. शत्रुराष्ट्राच्या नौदलाचे कंबरडे "विक्रांत'ने मोडले होते. त्यामुळे ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या गळ्यातील ताईत बनली. पराक्रम गाजविणाऱ्या या युद्धनौकेला भंगारात न काढता तिचा इतिहास आजच्या पिढीसाठी जिवंत ठेवण्यात आला आहे. नौदल सप्ताहानिमित्त सध्या 6 डिसेंबरपर्यंत "विक्रांत' मुंबईकरांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे तिला पाहण्यासाठी मुंबईकरांची रीघ लागली आहे. "विक्रांत'च्या पराक्रमाची गाथा ऐकलेली असल्याने तिला प्रत्यक्ष पाहण्याचा मोह वयोवृद्धांनाही आवरता येत नसल्याचे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडे पाहिल्यानंतर जाणवते.
युद्धनौकेचा प्रचंड विस्तारलेला डेक, त्यावरील सी-हॉक बॉम्बर विमाने, चेतक हेलिकॉप्टर, सी हॅरीअर, बरजेट अलाईज, मशीन्सगन्स्... हे सारे कुतूहलपूर्ण न्याहाळतानाच मनोमन तिला सॅल्यूट करायला नागरिक विसरत नाहीत. देशासाठी "विक्रांत'ने बजावलेल्या कामगिरीमुळे देशाभिमानाने उर भरून येतो.
असा आहे इतिहास
"विक्रांत'चे मूळ नाव "एचएमएस हेरकुलर्स' (आर-49) होते. इंग्लंडमधील विकेर आर्मस्ट्रॉंग / हारलॅण्ड वुल्फ यांनी या अजस्र युद्धनौकेची बांधणी केली. 22 सप्टेंबर 1945 रोजी ब्रिटनच्या सेवेत ती दाखल झाली. दुसऱ्या महायुद्धात तिने पराक्रम गाजवला. त्यानंतर भारताने "एचएमएस हेरकुलर्स' खरेदी करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 1957 मध्ये इंग्लंडने ती भारताला विकली. त्या वेळी इंग्लंडमधील भारताच्या उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी करारावर स्वाक्षरी केली. 1961 मध्ये विक्रांत भारतात आली. मुंबईतील बॅलार्ड पिअर येथे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिचे स्वागत केले आणि "एचएमएस हेरकुलर्स'चे नाव बदलून संस्कृत नावावरून "विक्रांत' म्हणजे "धैर्य' असे तिचे नामकरण करण्यात आले.
अजोड कामगिरी
भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यानंतर 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या बांगलादेशमुक्तीच्या युद्धात "विक्रांत'ने अजोड कामगिरी करीत आपले नाव सार्थकी लावले. पाकिस्तानचा धुव्वा उडविला. "विक्रांत'च्या डेकवरून उडणाऱ्या बॉम्बर्सनी ऑक्सबाजारमध्ये बॉम्बिंग करून हलकल्लोळ उडविला. पाकिस्तानला प्रतिकार करण्याची संधीच दिली नाही. बांगलादेशचे युद्ध भारताने जिंकले. प्रीतम सिंग हे या युद्धनौकेचे पहिले कमांडिंग ऑफिसर होते. वीस वर्षे भारतीय नौदलाची सेवा केल्यानंतर "विक्रांत' निवृत्त झाली; मात्र "विक्रांत'च्या पराक्रमाची गाथा आजही या युद्धनौकेवर जाणाऱ्या प्रत्येकाला स्फूर्ती देते. म्हणून आजही मुंबईकरांची पावले "विक्रांत'कडे वळत आहेत.
.......
अशी आहे "विक्रांत'
जेस्टिक क्लास
19,500 टन वजन
704 फूट लांबी
128 फूट रुंदी
............
सरकारचे दुग्धविकास खाते डबघाईला
मंत्र्यांनीच वाचला अपयशाचा पाढा
ंमुंबई, ता. 2 : राज्य शासनाचा दुग्धविकास विकास विभाग डबघाईला आला आहे, अशा स्पष्ट शब्दात सरकारच्या अपयशाची कबुली देत दुग्धविकास मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाकडे मदतीची मागणी केली.
ंमहानंद दुग्ध शाळेच्या टेट्रोफिनो प्रकल्पाचे भूमिपूजन आज गोरेगाव येथे राऊत यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना राऊत यांनी स्वतःच्याच खात्याचे अपयश मांडले. "राज्य सरकारच्या दुग्धविकास खात्याची अवस्था चिंताजनक आहे. त्याला पुनरुज्जीवित करण्याची गरज असून त्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने घ्यावी', असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
""शासनाच्या "आरे' व महासंघाच्या "महानंद' यांनी एकमेकांशी स्पर्धा न करता एकत्रित काम करावे. महाराष्ट्र दूधपुरवठ्यात अन्य राज्यांच्या मागे आहे. आता केवळ पश्चिम महाराष्ट्राच्या जीवावर राहता येणार नाही. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश येथेही दुग्धविकास व्हावा. दुग्ध संकलन व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने पुढाकार घ्यावा,'' असे सूचित केले. तर दुग्धविकास राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी ""शासनाचा "पावडर फ्लान्ट' महासंघाने चालवायला घ्यावा'', असा प्रस्ताव मांडत शासन सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचे मान्य करीत राऊत यांच्या सुरात सूर मिसळला.
एकेकाळी डबघाईला आलेल्या महानंदला आता ऊर्जितावस्था आली असून महानंदच्या ब्रॅण्डखाली आज महासंघाने रसगुल्ले, सोनपापडी, गुलाबजाम हे दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा शुभारंभ पशुदुग्ध आणि मत्स्यव्यवसाय खात्याचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते केला. तसेच विस्तारित कामगार भवनाचे उद्घाटन देवकर यांच्या हस्ते झाले. महासंघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी "आरे'च्या स्टॉलवर महानंदाची उत्पादने ठेवावीत, अशी मागणी केली. टेट्रोफिनोच्या माध्यमातून ग्राहकांना भेसळविरहित दुधाचा पुरवठा होईल, असा दावा केला. या प्रकल्पासाठी 16 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून 6 महिन्यांत हा प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
...........
ंमुंबई, ता. 2 : राज्य शासनाचा दुग्धविकास विकास विभाग डबघाईला आला आहे, अशा स्पष्ट शब्दात सरकारच्या अपयशाची कबुली देत दुग्धविकास मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाकडे मदतीची मागणी केली.
ंमहानंद दुग्ध शाळेच्या टेट्रोफिनो प्रकल्पाचे भूमिपूजन आज गोरेगाव येथे राऊत यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना राऊत यांनी स्वतःच्याच खात्याचे अपयश मांडले. "राज्य सरकारच्या दुग्धविकास खात्याची अवस्था चिंताजनक आहे. त्याला पुनरुज्जीवित करण्याची गरज असून त्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने घ्यावी', असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
""शासनाच्या "आरे' व महासंघाच्या "महानंद' यांनी एकमेकांशी स्पर्धा न करता एकत्रित काम करावे. महाराष्ट्र दूधपुरवठ्यात अन्य राज्यांच्या मागे आहे. आता केवळ पश्चिम महाराष्ट्राच्या जीवावर राहता येणार नाही. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश येथेही दुग्धविकास व्हावा. दुग्ध संकलन व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने पुढाकार घ्यावा,'' असे सूचित केले. तर दुग्धविकास राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी ""शासनाचा "पावडर फ्लान्ट' महासंघाने चालवायला घ्यावा'', असा प्रस्ताव मांडत शासन सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचे मान्य करीत राऊत यांच्या सुरात सूर मिसळला.
एकेकाळी डबघाईला आलेल्या महानंदला आता ऊर्जितावस्था आली असून महानंदच्या ब्रॅण्डखाली आज महासंघाने रसगुल्ले, सोनपापडी, गुलाबजाम हे दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा शुभारंभ पशुदुग्ध आणि मत्स्यव्यवसाय खात्याचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते केला. तसेच विस्तारित कामगार भवनाचे उद्घाटन देवकर यांच्या हस्ते झाले. महासंघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी "आरे'च्या स्टॉलवर महानंदाची उत्पादने ठेवावीत, अशी मागणी केली. टेट्रोफिनोच्या माध्यमातून ग्राहकांना भेसळविरहित दुधाचा पुरवठा होईल, असा दावा केला. या प्रकल्पासाठी 16 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून 6 महिन्यांत हा प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
...........
ऐक्याचा केवळ जप; नेत्यांची तोंडे परस्परविरुद्धच
मुंबई, ता. 4 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणदिन आणि शिवाजी पार्कच्या हिरवळीवरील रिपब्लिकन ऐक्याच्या कोरड्या घोषणा, हे वर्षानुवर्षाचे समीकरण आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत मर्यादित अर्थाने ऐक्य झाले; पण त्याचा परिणाम मात्र रिपब्लिकन जनता अधिक विमनस्क होण्यात झाला. त्यामुळे येत्या रविवारी ऐक्याची राहुटी शिवाजी पार्कवर पडणार की नाही, याबाबत कार्यकर्त्यांत शंका आहे.
भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी 6 डिसेंबरनिमित्त बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी "मला यावर काही बोलायचे नाही', असे सांगून विषय संपविला.
बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या गोरगरीब जनतेचा महासागर 6 डिसेंबर (महापरिनिर्वाणदिन) रोजी दादर येथील चैत्यभूमीवर लोटतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी जनता बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी गोळा होते. ही आयतीच संधी साधून रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटाचे नेते आपापल्या स्वतंत्र सभा घेऊन भाषणे ठोकतात. वेळोवेळी ऐक्याची गाजराची पुंगी वाजविली जाते. ऐक्य व्हावे अशी आजवर जनतेची इच्छा व तसा दबाव असे; आता मात्र या ऐक्यावर विश्वास राहिलेला नाही. हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले. रिपब्लिकनच्या काही गटातटांनी रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे यांच्यासह एकत्रित येऊन एकीकृत रिपब्लिकन म्हणून रिडालोसला सोबत घेऊन निवडणूक लढवली; पण रिपब्लिकन पक्षाला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. त्यामुळे यावेळी ऐक्याच्या घोषणेतील हवा गेली असून नेत्यांना काहीतरी वेगळी घोषणा करावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या ऐक्यात रिपब्लिकनचे प्रमुख गट सामील झाले नाहीत. भारिपचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह डॉ. राजेंद्र गवई, टी. एम. कांबळे बाहेर राहिले. त्यामुळे महापरिनिर्वाणदिनाला येणाऱ्या जनतेसमोर होणाऱ्या एकीकृत रिपब्लिकन पक्षाच्या अभिवादन सभेत ऍड. प्रकाश आंबेडकर सामील न झाल्याने अपयश आले, असे दाखविण्याचा प्रयत्न हे नेते करण्याची शक्यता आहे. ऍड. आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत. त्यांनी ऐक्य करून त्याचे नेतृत्व करावे, अशी भूमिका मांडत प्रा. जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले यांनी आंबेडकरांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
"प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत', असे रामदास आठवले आणि कवाडे यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. ऐक्यातून बाहेर पडून पुन्हा कॉंग्रेसच्या गोटात दाखल झालेल्या डॉ. राजेंद्र गवई यांनीही "प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यासह प्रमुख नेत्यांचे ऐक्य झाले तरच आपल्याला त्यात रस आहे. अन्यथा वाघ आणि उंदरांचे ऐक्य होऊ शकत नाही', असे सांगत ऐक्यात फारसा रस नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे यावेळीही ऐक्याचे वारे कोरडेच राहणार असून नेते मात्र एकमेकांवर कुरघोडी करणार, असे मानले जाते.
मुंबई, ता. 4 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणदिन आणि शिवाजी पार्कच्या हिरवळीवरील रिपब्लिकन ऐक्याच्या कोरड्या घोषणा, हे वर्षानुवर्षाचे समीकरण आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत मर्यादित अर्थाने ऐक्य झाले; पण त्याचा परिणाम मात्र रिपब्लिकन जनता अधिक विमनस्क होण्यात झाला. त्यामुळे येत्या रविवारी ऐक्याची राहुटी शिवाजी पार्कवर पडणार की नाही, याबाबत कार्यकर्त्यांत शंका आहे.
भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी 6 डिसेंबरनिमित्त बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी "मला यावर काही बोलायचे नाही', असे सांगून विषय संपविला.
बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या गोरगरीब जनतेचा महासागर 6 डिसेंबर (महापरिनिर्वाणदिन) रोजी दादर येथील चैत्यभूमीवर लोटतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी जनता बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी गोळा होते. ही आयतीच संधी साधून रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटाचे नेते आपापल्या स्वतंत्र सभा घेऊन भाषणे ठोकतात. वेळोवेळी ऐक्याची गाजराची पुंगी वाजविली जाते. ऐक्य व्हावे अशी आजवर जनतेची इच्छा व तसा दबाव असे; आता मात्र या ऐक्यावर विश्वास राहिलेला नाही. हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले. रिपब्लिकनच्या काही गटातटांनी रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे यांच्यासह एकत्रित येऊन एकीकृत रिपब्लिकन म्हणून रिडालोसला सोबत घेऊन निवडणूक लढवली; पण रिपब्लिकन पक्षाला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. त्यामुळे यावेळी ऐक्याच्या घोषणेतील हवा गेली असून नेत्यांना काहीतरी वेगळी घोषणा करावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या ऐक्यात रिपब्लिकनचे प्रमुख गट सामील झाले नाहीत. भारिपचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह डॉ. राजेंद्र गवई, टी. एम. कांबळे बाहेर राहिले. त्यामुळे महापरिनिर्वाणदिनाला येणाऱ्या जनतेसमोर होणाऱ्या एकीकृत रिपब्लिकन पक्षाच्या अभिवादन सभेत ऍड. प्रकाश आंबेडकर सामील न झाल्याने अपयश आले, असे दाखविण्याचा प्रयत्न हे नेते करण्याची शक्यता आहे. ऍड. आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत. त्यांनी ऐक्य करून त्याचे नेतृत्व करावे, अशी भूमिका मांडत प्रा. जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले यांनी आंबेडकरांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
"प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत', असे रामदास आठवले आणि कवाडे यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. ऐक्यातून बाहेर पडून पुन्हा कॉंग्रेसच्या गोटात दाखल झालेल्या डॉ. राजेंद्र गवई यांनीही "प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यासह प्रमुख नेत्यांचे ऐक्य झाले तरच आपल्याला त्यात रस आहे. अन्यथा वाघ आणि उंदरांचे ऐक्य होऊ शकत नाही', असे सांगत ऐक्यात फारसा रस नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे यावेळीही ऐक्याचे वारे कोरडेच राहणार असून नेते मात्र एकमेकांवर कुरघोडी करणार, असे मानले जाते.
शिक्षण विभागाला "संयुक्त मंडळा'चा विसर
ंमुंबई, ता. 30 : प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लागावेत या उद्देशाने सरकारने शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या "संयुक्त मंडळाचा' सरकारलाच विसर पडला आहे. या मंडळाच्या वर्षातून दोन बैठका घेण्याची तरतूद असताना गेल्या सहा वर्षांत कशीबशी एकच बैठक घेण्यात आली. यातून शिक्षणाप्रती असलेल्या सरकारी अनास्थेचा आणखी एक नमुना पुढे आला आहे.
राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या अनेक संघटना कार्यरत आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांबाबत या संघटनांशी शासन वेळोवेळी स्वतंत्रपणे चर्चा करते. शिक्षक संघटनांच्या मागण्यांचा आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी सरकारने 18 जून 2003 रोजी "संयुक्त मंडळा'ची स्थापना केली. शालेय शिक्षण राज्यमंत्री या मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असून, शिक्षण सहसंचालक (प्राथमिक), पुणे यांची सचिव म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय शालेय शिक्षण सचिव हे या मंडळाचे पदसिद्ध सदस्य आहेत. शिक्षक आमदार, प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आदींचा या संयुक्त मंडळात समावेश आहे. प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांची चर्चा करून, त्यावरील उपाययोजनांची शासनाला शिफारस करणे आदी या मंडळाची उद्दिष्टे आहेत. हे संयुक्त मंडळ कायमस्वरूपी असेल आणि त्याच्या एका वर्षात दोन बैठक घेतल्या जाव्यात, असे यासंबंधीच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे; मात्र याकडे शासनानेच सोईस्करपणे दुर्लक्ष केले आहे. या मंडळाची पहिली सभा शासन निर्णय जारी झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी म्हणजे 13 जुलै 2006 रोजी घेण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत एकही सभा झालेली नाही. त्यामुळे हे मंडळ स्थापन करण्यामागील हेतूलाच हरताळ फासला गेला असून, शिक्षकांचे प्रश्नही "जैसे थे' राहिले आहेत, असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संयुक्त कृती समितीचे प्रसिद्धिप्रमुख गिरीश भातखंडे यांनी सांगितले.
शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकार शिक्षणासारख्या महत्त्वाच्या खात्याला पूर्णवेळ मंत्री देऊ शकत नाही. अर्थसंकल्पात निधीची तरतूद करीत नाही, त्या सरकारकडून आणखी काय होणार, अशी टीका त्यांनी केली. संयुक्त मंडळाच्या बैठकीचे आपणास कधीही निमंत्रण आलेले नाही, असे त्यांनी सांगितले.
-----------------
राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या अनेक संघटना कार्यरत आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांबाबत या संघटनांशी शासन वेळोवेळी स्वतंत्रपणे चर्चा करते. शिक्षक संघटनांच्या मागण्यांचा आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी सरकारने 18 जून 2003 रोजी "संयुक्त मंडळा'ची स्थापना केली. शालेय शिक्षण राज्यमंत्री या मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असून, शिक्षण सहसंचालक (प्राथमिक), पुणे यांची सचिव म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय शालेय शिक्षण सचिव हे या मंडळाचे पदसिद्ध सदस्य आहेत. शिक्षक आमदार, प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आदींचा या संयुक्त मंडळात समावेश आहे. प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांची चर्चा करून, त्यावरील उपाययोजनांची शासनाला शिफारस करणे आदी या मंडळाची उद्दिष्टे आहेत. हे संयुक्त मंडळ कायमस्वरूपी असेल आणि त्याच्या एका वर्षात दोन बैठक घेतल्या जाव्यात, असे यासंबंधीच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे; मात्र याकडे शासनानेच सोईस्करपणे दुर्लक्ष केले आहे. या मंडळाची पहिली सभा शासन निर्णय जारी झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी म्हणजे 13 जुलै 2006 रोजी घेण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत एकही सभा झालेली नाही. त्यामुळे हे मंडळ स्थापन करण्यामागील हेतूलाच हरताळ फासला गेला असून, शिक्षकांचे प्रश्नही "जैसे थे' राहिले आहेत, असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संयुक्त कृती समितीचे प्रसिद्धिप्रमुख गिरीश भातखंडे यांनी सांगितले.
शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकार शिक्षणासारख्या महत्त्वाच्या खात्याला पूर्णवेळ मंत्री देऊ शकत नाही. अर्थसंकल्पात निधीची तरतूद करीत नाही, त्या सरकारकडून आणखी काय होणार, अशी टीका त्यांनी केली. संयुक्त मंडळाच्या बैठकीचे आपणास कधीही निमंत्रण आलेले नाही, असे त्यांनी सांगितले.
-----------------
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर रामदास आठवले एकाकी
मुंबई, ता. 18 : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार रामदास आठवले यांनी आज पाठिंबा देत आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने रिपब्लिकन डावी लोकशाही समितीच्या घटक पक्षात खळबळ उडाली. रिडालोसमधील संयुक्त महाराष्ट्रवादी घटक पक्षांनी आठवलेंच्या या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत या मागणीला रिडालोसचा यत्किंचितही पाठिंबा नाही, असे स्पष्ट केले.
स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मागणीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविल्यानंतर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने पुन्हा डोके वर काढले आहे. रामदास आठवले यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पाठिंबा दिला. त्यासाठी 22 डिसेंबर रोजी विदर्भातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर रिपब्लिकनमार्फत निदर्शने करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. "वैदर्भीय जनतेच्या मागणीचा विचार करून स्वतंत्र विदर्भाची निर्मिती केली पाहिजे,' असे मत आठवले यांनी व्यक्त केले. मनसे आणि शिवसेना यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला विरोध करून वैदर्भीय जनतेच्या मागणीचा, त्यांच्या भावनांचा अनादर केला असून, त्यांनी आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, असा उपदेशाचा डोसही आठवले यांनी या वेळी दिला.
दरम्यान, रिडालोसच्या लोकसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात संयुक्त महाराष्ट्राच्या भूमिकेचा स्वीकार करण्यात आला असताना रिडालोसमधील मोठा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या या पूर्णतः वेगळ्या मागणीमुळे घटक पक्षात अस्वस्थता पसरली आहे. "स्वतंत्र विदर्भाची मागणी म्हणजे कुणाच्या तरी लग्नाच्या मांडवात आपल्या मुलाची मुंज उरकून घेण्याचा प्रकार आहे', अशी बोचरी टीका शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केली. "आठवले यांच्या मागणीशी आम्ही यत्किंचितही सहमत नाही. रिडालोसमध्ये आहोत म्हणून आम्ही त्यांच्या मागणीशी सहमत नाही, आंदोलनाला पाठिंबा देणार नाही', असे एन. डी. पाटील यांनी सांगितले;
तर भाकपचे सरचिटणीस कॉ. प्रकाश रेड्डी यांनीदेखील भाकपची भूमिका संयुक्त महाराष्ट्राची असून, आठवले यांचा तो वैयक्तिक निर्णय असल्याचे स्पष्ट केले. "समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र या भूमिकेसाठी आम्ही काम करीत असून, महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असे रेड्डी यांनी ठामपणे सांगितले. जनता दल (सेक्युलर) पक्षही संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कर्ता असल्याने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीमुळे आठवले एकाकी पडले आहेत. नजीकच्या काळात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा रिडालोसच्या विभाजनास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
..................................
स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मागणीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविल्यानंतर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने पुन्हा डोके वर काढले आहे. रामदास आठवले यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पाठिंबा दिला. त्यासाठी 22 डिसेंबर रोजी विदर्भातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर रिपब्लिकनमार्फत निदर्शने करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. "वैदर्भीय जनतेच्या मागणीचा विचार करून स्वतंत्र विदर्भाची निर्मिती केली पाहिजे,' असे मत आठवले यांनी व्यक्त केले. मनसे आणि शिवसेना यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला विरोध करून वैदर्भीय जनतेच्या मागणीचा, त्यांच्या भावनांचा अनादर केला असून, त्यांनी आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, असा उपदेशाचा डोसही आठवले यांनी या वेळी दिला.
दरम्यान, रिडालोसच्या लोकसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात संयुक्त महाराष्ट्राच्या भूमिकेचा स्वीकार करण्यात आला असताना रिडालोसमधील मोठा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या या पूर्णतः वेगळ्या मागणीमुळे घटक पक्षात अस्वस्थता पसरली आहे. "स्वतंत्र विदर्भाची मागणी म्हणजे कुणाच्या तरी लग्नाच्या मांडवात आपल्या मुलाची मुंज उरकून घेण्याचा प्रकार आहे', अशी बोचरी टीका शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केली. "आठवले यांच्या मागणीशी आम्ही यत्किंचितही सहमत नाही. रिडालोसमध्ये आहोत म्हणून आम्ही त्यांच्या मागणीशी सहमत नाही, आंदोलनाला पाठिंबा देणार नाही', असे एन. डी. पाटील यांनी सांगितले;
तर भाकपचे सरचिटणीस कॉ. प्रकाश रेड्डी यांनीदेखील भाकपची भूमिका संयुक्त महाराष्ट्राची असून, आठवले यांचा तो वैयक्तिक निर्णय असल्याचे स्पष्ट केले. "समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र या भूमिकेसाठी आम्ही काम करीत असून, महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असे रेड्डी यांनी ठामपणे सांगितले. जनता दल (सेक्युलर) पक्षही संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कर्ता असल्याने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीमुळे आठवले एकाकी पडले आहेत. नजीकच्या काळात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा रिडालोसच्या विभाजनास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
..................................
दलित समाजातील युवकांचा मनसेकडे ओढा
मुंबई, ता. 7 : रिपब्लिकन पक्षाच्या गटातटांना आंबेडकरी जनता कंटाळलेली असतानाच आता उरलीसुरलेली युवाशक्तीही मनसेकडे आकर्षित होत आहे. चैत्यभूमीवर अभिवादनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आंबेडकरी समाजातील युवकांशी संवाद साधला असता बहुतांशी युवकांनी आपल्याला राज ठाकरेंचा करिष्मा खुणावत असल्याचे सांगितले. दलित तरुणांचा ओढा मनसेकडे असल्याने रिपब्लिकन नेतेही चिंतेत पडले आहेत.
रिपब्लिकन पक्षाची अनेक शकले झाली आहेत. ऐक्याच्या आणाभाका नेत्यांनी प्रत्येक महापरिनिर्वाणदिनी घेतल्या. पुढे त्या मोडल्याही. नेत्यांच्या आपापसातील कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळलेल्या आंबेडकरी जनतेचा नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. पक्षाकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. परिणामी परिब्लिकन पक्षाचा उरलासुरला जनाधारही तुटला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे प्रकर्षाने दिसून आले. दलित पॅंथर भरात असताना रिपब्लिकन चळवळीकडे आकृष्ट झालेला युवक पॅंथर फुटल्यानंतर संभ्रमात पडला. रिपब्लिकन पक्षात सध्या युवा कार्यकर्त्यांची वानवा निर्माण झाली असून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी अस्तित्वात नाही. या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर दाखल झालेल्या आंबेडकरी समाजातील युवकांशी संवाद साधला असता सध्या युवकांत असणारा "मनसे बूम' येथेही जाणवला. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या गटातटाच्या राजकारणाला आपण कमालीचे कंटाळलो असल्याचे युवकांनी सांगितले. तुम्हाला कोणत्या पक्षाचे काम करायला आवडेल, असे विचारले असता बहुतांशी युवकांनी "मनसे' असे उत्तर दिले. "राज ठाकरे यांचा करारी स्वभाव आवडतो. मनसेत जातपात मानली जात नाही. त्यामुळे त्या पक्षात काम करायला आवडेल', असे पाचोरा येथून आलेल्या दिनेश ब्राम्हणे या युवकाने सांगितले. कोकणातून आलेल्या रूपेश कांबळे या युवकाला मनसेच्या झेंड्यात निळा रंग असल्याने हा पक्ष आंबेडकरी विचारांना मानणारा आहे, असे वाटते. "राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकातील विचारांचा अनेक वेळा दाखला दिला आहे. त्यामुळे मनसे अन्य पक्षांपेक्षा बरा वाटतो', असे त्याने सांगितले.
नागपूर, जालना, पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातून आलेल्या युवकांनीही आपल्याला मनसेचे राजकारण आवडते, अशी प्रतिक्रिया दिली. तर "मनसे'चे राजकारण बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या परस्परविरोधी आहे. त्यामुळे हा पक्ष आंबेडकरी विचारांचा विरोधक असल्याचे मत अमर कांबळे, अरुण मोरे या युवकांनी नोंदविले. मनसेचे मारझोडीचे राजकारण घातक असल्याचेही काहींनी नमूद केले.
दरम्यान, युवकांचा बदलता कल पाहून रिपब्लिकन नेत्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळेच रामदास आठवले यांना मनसेचे राजकारण आंबेडकरी विचारांच्या विरोधी असल्याची टीका चैत्यभूमीवरील जाहीर सभेत करावी लागली. प्रा. जोगेंद्र कवाडे, ऍड्. संघराज रूपवते यांनाही मनसेच्या झेंड्यातील निळ्या रंगाला युवकांनी भुलू नये, असे आवाहन करावे लागले. तसेच रिपब्लिकन पक्षांची युवक संघटना मजबूत करून तरुणांना रोखण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही जाहीर केले.
..................
रिपब्लिकन पक्षाची अनेक शकले झाली आहेत. ऐक्याच्या आणाभाका नेत्यांनी प्रत्येक महापरिनिर्वाणदिनी घेतल्या. पुढे त्या मोडल्याही. नेत्यांच्या आपापसातील कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळलेल्या आंबेडकरी जनतेचा नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. पक्षाकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. परिणामी परिब्लिकन पक्षाचा उरलासुरला जनाधारही तुटला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे प्रकर्षाने दिसून आले. दलित पॅंथर भरात असताना रिपब्लिकन चळवळीकडे आकृष्ट झालेला युवक पॅंथर फुटल्यानंतर संभ्रमात पडला. रिपब्लिकन पक्षात सध्या युवा कार्यकर्त्यांची वानवा निर्माण झाली असून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी अस्तित्वात नाही. या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर दाखल झालेल्या आंबेडकरी समाजातील युवकांशी संवाद साधला असता सध्या युवकांत असणारा "मनसे बूम' येथेही जाणवला. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या गटातटाच्या राजकारणाला आपण कमालीचे कंटाळलो असल्याचे युवकांनी सांगितले. तुम्हाला कोणत्या पक्षाचे काम करायला आवडेल, असे विचारले असता बहुतांशी युवकांनी "मनसे' असे उत्तर दिले. "राज ठाकरे यांचा करारी स्वभाव आवडतो. मनसेत जातपात मानली जात नाही. त्यामुळे त्या पक्षात काम करायला आवडेल', असे पाचोरा येथून आलेल्या दिनेश ब्राम्हणे या युवकाने सांगितले. कोकणातून आलेल्या रूपेश कांबळे या युवकाला मनसेच्या झेंड्यात निळा रंग असल्याने हा पक्ष आंबेडकरी विचारांना मानणारा आहे, असे वाटते. "राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकातील विचारांचा अनेक वेळा दाखला दिला आहे. त्यामुळे मनसे अन्य पक्षांपेक्षा बरा वाटतो', असे त्याने सांगितले.
नागपूर, जालना, पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातून आलेल्या युवकांनीही आपल्याला मनसेचे राजकारण आवडते, अशी प्रतिक्रिया दिली. तर "मनसे'चे राजकारण बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या परस्परविरोधी आहे. त्यामुळे हा पक्ष आंबेडकरी विचारांचा विरोधक असल्याचे मत अमर कांबळे, अरुण मोरे या युवकांनी नोंदविले. मनसेचे मारझोडीचे राजकारण घातक असल्याचेही काहींनी नमूद केले.
दरम्यान, युवकांचा बदलता कल पाहून रिपब्लिकन नेत्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळेच रामदास आठवले यांना मनसेचे राजकारण आंबेडकरी विचारांच्या विरोधी असल्याची टीका चैत्यभूमीवरील जाहीर सभेत करावी लागली. प्रा. जोगेंद्र कवाडे, ऍड्. संघराज रूपवते यांनाही मनसेच्या झेंड्यातील निळ्या रंगाला युवकांनी भुलू नये, असे आवाहन करावे लागले. तसेच रिपब्लिकन पक्षांची युवक संघटना मजबूत करून तरुणांना रोखण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही जाहीर केले.
..................
रिपब्लिकन युवक कार्यकर्ते बनणार "पॅंथर'
मुंबई, ता. 9 : दलित समाजातील युवकांच्या "मनसे'प्रवासामुळे रिपब्लिकन नेते आता खडबडून जागे झाले असून, हातातून निसटणाऱ्या युवाशक्तीला रोखण्याची गरज त्यांना प्रकर्षाने जाणवू लागली आहे. यासाठी "रिपब्लिकन युवक संघटनांची नव्याने बांधणी करून, त्या संघटनेलाच "पॅंथर' बनवले जाणार आहे', असे रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी खासदार रामदास आठवले यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
नेत्यांच्या सुंदोपसुंदीला कंटाळलेली दलित जनता रिपब्लिकन पक्षापासून दूर गेली आहे. शिवसेनेचे वारे जोरदार वाहत असताना आक्रमक राजकारणामुळे दलित युवक शिवसेनेकडे आकर्षिला गेला होता. शिवशक्ती आणि भीमशक्तीचे नारेही काही काळ दिले गेले; मात्र शिवसेनेचे हिंदुत्वाचे राजकारण आंबेडकरी विचारांच्या युवकांच्या पचनी पडणारे नसल्याचे लक्षात आल्याने शिवसेनेशी घरोबा झाला नाही. शिवशक्ती-भीमशक्तीच्या नाऱ्यांतील आवाज क्षीण झाला. सध्या राज ठाकरे यांच्या मनसेकडे तरुणांचा ओढा आहे. यातून दलित समाजाचा युवकही सुटलेला नाही. चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आलेल्या आंबेडकरी समाजातील अनेक युवकांनी आपल्याला मनसे खुणावत असल्याचे सांगत नव्या "राज'कारणाची दिशा स्पष्ट केली.
रिपब्लिकन पक्षाची भावी पिढी मनसेसारख्या पक्षात दाखल झाली, तर रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका बसण्याची भीती नेत्यांना सतावू लागली आहे. त्यामुळे भविष्यात दलित तरुणांच्या फुरफुरणाऱ्या बाहूंना, त्यांच्या मनगटातील ताकदीला रिपब्लिकन पक्षातच आक्रमक कार्यक्रम देण्याची गरज नेत्यांना वाटू लागली आहे. त्यासाठी ज्येष्ठ कवी पद्मश्री नामदेव ढसाळ, रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
दलित समाजातील युवकाला अन्य पक्षांत जाण्यापासून रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या काळात रिपब्लिकन युवक संघटनेलाच "दलित पॅंथर'सारखे स्वरूप व आक्रमक कार्यक्रम देण्यात येईल, असे आठवले यांनी सांगितले.
""नेते संधिसाधू असतील; पण आंबेडकरी युवक विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेला असतो. औटघटकेच्या राजकारणासाठी त्याने मनसेत जाऊ नये. राजकारणासाठी नाही; तर आंबेडकरी मिशनसाठी काम करावे, राजकारणासाठी बाबासाहेबांचे नाव घेणाऱ्यांवर भाळू नये'', असे आवाहन प्रा. कवाडे यांनी केले. "ऐक्यात विलीन झालेल्या गटांच्या युवक संघटनांची एकत्रित "युथ फोर्स' उभी करून, त्यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात आक्रमक कार्यक्रम देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे' कवाडे म्हणाले.
समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची परंपरा राज ठाकरे चालवतील, असे मला वाटत होते; मात्र त्यांच्या डोक्यात यादवी आहे. त्यामुळे देश तुटण्याचा धोका असून, त्याचा सर्वाधिक फटका दलितांना बसेल. त्यामुळे आंबेडकरी विचारांचा खरा तरुण मनसेकडे जाणार नाही, असे मला वाटते, असे सांगत नामदेव ढसाळ यांनी दलित तरुणांना व्यापक कार्यक्रम देण्याचा रिपब्लिकन पक्ष प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट केले.
-----------------------
नेत्यांच्या सुंदोपसुंदीला कंटाळलेली दलित जनता रिपब्लिकन पक्षापासून दूर गेली आहे. शिवसेनेचे वारे जोरदार वाहत असताना आक्रमक राजकारणामुळे दलित युवक शिवसेनेकडे आकर्षिला गेला होता. शिवशक्ती आणि भीमशक्तीचे नारेही काही काळ दिले गेले; मात्र शिवसेनेचे हिंदुत्वाचे राजकारण आंबेडकरी विचारांच्या युवकांच्या पचनी पडणारे नसल्याचे लक्षात आल्याने शिवसेनेशी घरोबा झाला नाही. शिवशक्ती-भीमशक्तीच्या नाऱ्यांतील आवाज क्षीण झाला. सध्या राज ठाकरे यांच्या मनसेकडे तरुणांचा ओढा आहे. यातून दलित समाजाचा युवकही सुटलेला नाही. चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आलेल्या आंबेडकरी समाजातील अनेक युवकांनी आपल्याला मनसे खुणावत असल्याचे सांगत नव्या "राज'कारणाची दिशा स्पष्ट केली.
रिपब्लिकन पक्षाची भावी पिढी मनसेसारख्या पक्षात दाखल झाली, तर रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका बसण्याची भीती नेत्यांना सतावू लागली आहे. त्यामुळे भविष्यात दलित तरुणांच्या फुरफुरणाऱ्या बाहूंना, त्यांच्या मनगटातील ताकदीला रिपब्लिकन पक्षातच आक्रमक कार्यक्रम देण्याची गरज नेत्यांना वाटू लागली आहे. त्यासाठी ज्येष्ठ कवी पद्मश्री नामदेव ढसाळ, रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
दलित समाजातील युवकाला अन्य पक्षांत जाण्यापासून रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या काळात रिपब्लिकन युवक संघटनेलाच "दलित पॅंथर'सारखे स्वरूप व आक्रमक कार्यक्रम देण्यात येईल, असे आठवले यांनी सांगितले.
""नेते संधिसाधू असतील; पण आंबेडकरी युवक विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेला असतो. औटघटकेच्या राजकारणासाठी त्याने मनसेत जाऊ नये. राजकारणासाठी नाही; तर आंबेडकरी मिशनसाठी काम करावे, राजकारणासाठी बाबासाहेबांचे नाव घेणाऱ्यांवर भाळू नये'', असे आवाहन प्रा. कवाडे यांनी केले. "ऐक्यात विलीन झालेल्या गटांच्या युवक संघटनांची एकत्रित "युथ फोर्स' उभी करून, त्यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात आक्रमक कार्यक्रम देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे' कवाडे म्हणाले.
समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची परंपरा राज ठाकरे चालवतील, असे मला वाटत होते; मात्र त्यांच्या डोक्यात यादवी आहे. त्यामुळे देश तुटण्याचा धोका असून, त्याचा सर्वाधिक फटका दलितांना बसेल. त्यामुळे आंबेडकरी विचारांचा खरा तरुण मनसेकडे जाणार नाही, असे मला वाटते, असे सांगत नामदेव ढसाळ यांनी दलित तरुणांना व्यापक कार्यक्रम देण्याचा रिपब्लिकन पक्ष प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट केले.
-----------------------
राज्यातील विद्यापीठांत क्रीडासंचालकांची वानवा
मुंबई, ता. 13 : मुंबई आणि एसएनडीटी विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठांत क्रीडासंचालकांच्या पदाला गेल्या 10 ते 15 वर्षांत सरकारने मान्यताच दिलेली नसल्याने विद्यापीठांचे शारीरिक शिक्षण व क्रीडाविषयक धोरण अशक्त झाले आहे. तसेच राज्यातील शेकडो महाविद्यालयांमध्ये क्रीडाशिक्षकांची वानवा निर्माण झाली आहे. शिक्षण आयोगाने शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विषय सक्तीचा केला असतानाही सरकारचे क्रीडाविषयक धोरण मात्र याबाबतीत उदासीन आहे.
शिक्षण आयोगाने 1980मध्ये शारीरिक शिक्षण हा शिक्षणाचा अविभाज्य भाग असल्याचे घोषित केले होते. शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 1994 मध्ये शारीरिक शिक्षण हा विषय सक्तीचा करण्यात आला. शारीरिक शिक्षणाबाबत शासनाचे कायदे असले तरी त्यांची अंमलबजावणी करण्याचा शासनाचाच इरादा नसल्याचे दिसून येते. त्यामुळे हे सारे कायदे कागदावरच राहिले आहेत. शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरे करणाऱ्या मुंबई विद्यापीठात गेल्या दहा वर्षांत क्रीडा संचालकपदाला अधिकृत मान्यता मिळालेली नाही. विद्यापीठांतील नियुक्त्यांना सरकारची मान्यता लागते. मुंबई विद्यापीठाने1997 पासून तब्बल तीन ते चार वेळा विद्यापीठाला क्रीडा संचालक मिळावा यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला; मात्र या पदाला मान्यता देण्याबाबत सरकारी पातळीवर दिरंगाई केली जात आहे. क्रीडासंचालक म्हणून मुंबई विद्यापीठाने नियुक्त केलेले यू. एन. केंद्रे हे सरकारच्या मान्यतेविनाच गेली 10 वर्षे मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचा गाडा हाकीत आहेत. त्यांचा पगार विद्यापीठाच्या निधीतून द्यावा लागत आहे. एसएनडीटी विद्यापीठाच्या क्रीडासंचालक म्हणून लिन्डा डेनिस या गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. मात्र एसएनडीटी विद्यापीठातही क्रीडासंचालक पदाला मान्यता नाही. पुणे विद्यापीठात हे पद रिक्त झाल्यानंतर आजतागायत भरण्यात आलेले नाही. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, सोलापूर या विद्यापीठांतही शासनाच्या तुघलकी कारभारामुळे क्रीडा संचालकाची वानवा आहे. विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या शेकडो महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकांची पदे भरलेली नाहीत.
शारीरिक शिक्षण, क्रीडाविषयक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यापीठात शिकविला जातो. मात्र हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षकपदी नेमणूक होत नसल्याने त्यांना घरीच बसावे लागते. त्यामुळे शासन या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्यापीठांना क्रीडासंचालक व शिक्षक देणार आहे का, असा सवाल केला जात आहे. विद्यापीठाला अधिकृत क्रीडासंचालक तत्काळ न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनविसेचे उपाध्यक्ष मनोज टेकाडे यांनी दिला आहे.
............
शिक्षण आयोगाने 1980मध्ये शारीरिक शिक्षण हा शिक्षणाचा अविभाज्य भाग असल्याचे घोषित केले होते. शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 1994 मध्ये शारीरिक शिक्षण हा विषय सक्तीचा करण्यात आला. शारीरिक शिक्षणाबाबत शासनाचे कायदे असले तरी त्यांची अंमलबजावणी करण्याचा शासनाचाच इरादा नसल्याचे दिसून येते. त्यामुळे हे सारे कायदे कागदावरच राहिले आहेत. शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरे करणाऱ्या मुंबई विद्यापीठात गेल्या दहा वर्षांत क्रीडा संचालकपदाला अधिकृत मान्यता मिळालेली नाही. विद्यापीठांतील नियुक्त्यांना सरकारची मान्यता लागते. मुंबई विद्यापीठाने1997 पासून तब्बल तीन ते चार वेळा विद्यापीठाला क्रीडा संचालक मिळावा यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला; मात्र या पदाला मान्यता देण्याबाबत सरकारी पातळीवर दिरंगाई केली जात आहे. क्रीडासंचालक म्हणून मुंबई विद्यापीठाने नियुक्त केलेले यू. एन. केंद्रे हे सरकारच्या मान्यतेविनाच गेली 10 वर्षे मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचा गाडा हाकीत आहेत. त्यांचा पगार विद्यापीठाच्या निधीतून द्यावा लागत आहे. एसएनडीटी विद्यापीठाच्या क्रीडासंचालक म्हणून लिन्डा डेनिस या गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. मात्र एसएनडीटी विद्यापीठातही क्रीडासंचालक पदाला मान्यता नाही. पुणे विद्यापीठात हे पद रिक्त झाल्यानंतर आजतागायत भरण्यात आलेले नाही. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, सोलापूर या विद्यापीठांतही शासनाच्या तुघलकी कारभारामुळे क्रीडा संचालकाची वानवा आहे. विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या शेकडो महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकांची पदे भरलेली नाहीत.
शारीरिक शिक्षण, क्रीडाविषयक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यापीठात शिकविला जातो. मात्र हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षकपदी नेमणूक होत नसल्याने त्यांना घरीच बसावे लागते. त्यामुळे शासन या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्यापीठांना क्रीडासंचालक व शिक्षक देणार आहे का, असा सवाल केला जात आहे. विद्यापीठाला अधिकृत क्रीडासंचालक तत्काळ न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनविसेचे उपाध्यक्ष मनोज टेकाडे यांनी दिला आहे.
............
धान्यापासून दारू : सत्ताधारी-विरोधकांचा "एकच प्याला'
तेव्हा आर. आर. यांनी आवाज का उठवला नाही?
ंमुंबई, ता. 14 : धान्यापासून दारू गाळण्याच्या प्रकल्पांना यापुढे परवानगी दिली जाणार नाही, ही गृहमंत्री आर. आर. पाटील यांची घोषणा फसवी आहे. सन 2007 मध्ये सरकारने धान्यापासून दारू गाळण्यास मंजुरी दिली तेव्हा उपमुख्यमंत्रिपदी असणारे आबा मूग गिळून का बसले होते, असा सवाल भीमशक्ती विचार मंचचे अध्यक्ष चेतन कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
धान्याधारीत मद्यार्क योजनेचा लाभ उठविण्यात सत्ताधारी पक्षातील माजी मंत्री, नेते यांचाच पुढाकार असून सत्ताधारी आणि विरोधकांचे धोरण एकाच प्याल्यातले आहे, असा आरोप त्यांनी केला. धान्यापासून दारू गाळण्यास मोठ्या प्रमाणावर सुरवात झाल्यास सर्वसामान्य माणसाच्या तोंडचा घास हिरावला जाईल. सरकारने राज्याची मधुशाला करण्याचे धोरण आखले आहे, अशी चौफेर टीका सरकारच्या निर्णयावर झाल्यानंतर यापुढे धान्यापासून दारू गाळण्याच्या प्रकल्पांना मंजुरी दिली जाणार नाही, असे आर. आर. पाटील यांनी घोषित केले; मात्र आबांचे हे आश्वासन म्हणजे निव्वळ जनतेची दिशाभूल असल्याचा आरोप कांबळे यांनी केला. राज्य मंत्रिमंडळाने सन 2007 मध्ये राज्यात 23 धान्याधारित मद्यार्क प्रकल्पांना मंजुरी दिली असून त्यांना मुक्त हस्ते सबसिडी दिली आहे. तेव्हा आबांना सर्वसामान्यांची आठवण झाली नाही का? त्यांनी त्या वेळी मौन धारण का केले, असे प्रश्न कांबळे यांनी उपस्थित केले.
राज्यात यापूर्वीच सोलापूर, लातूर, अमरावती, सातारा येथे धान्यापासून दारू गाळण्याचे प्रकल्प सुरू आहेत. साधारणतः 25 हजार टन ज्वारीपासून एक कोटी लिटर दारू गाळली जाते. जर सर्वच कारखाने पूर्ण क्षमतेने दारू गाळू लागले तर जनतेला खायला अन्न मिळणार नाही. सडलेल्या धान्यापासून दारू गाळली जाईल, असे सरकारमार्फत सांगितले जात असले, तरी असे किती टन धान्य सडते? या माध्यमातून लोकांना जास्त पैसे मिळाले, तर शेतकरी धान्य दारूसाठी सडवणार नाहीत, याची खात्री कोण देणार? त्यामुळे धान्यापासून दारू गाळण्यास परवानगीच देऊ नये, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.
धान्याधारित मद्यार्क योजनेचा लाभ उठविण्यासाठी सत्ताधारी पक्षातील माजी मंत्री, नेते आणि त्यांचे नातेवाईक आघाडीवर आहेत. विरोधी पक्षही त्यात मागे नाहीत. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे खासदार गोविंदराव आदिक, माजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा पालवे यांच्यासह बड्या नेत्यांचे दारू गाळण्याचे प्रकल्प माहितीच्या अधिकारात उपलब्ध झाल्याचे कांबळे यांनी सांगितले.
हे आहेत प्रकल्पांचे संचालक
- विराज अल्कोहोल ऍण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. कपारी, शिराळा. संचालक : मानसिंग नाईक, रामसिंग नाईक.
- अल्कोप्लस प्रोड्युसर्स प्रा. लि. संचालक : अमित आणि धीरज (विलासराव देशमुख यांचे पुत्र).
- मे. आनंद डिस्टिलरीज, अमरावती. संचालक : आनंद व अभय भमोरे.
- मे. धवल प्रतापसिंह मोहिते-पाटील ऍग्रो इंडस्ट्रीज, सोलापूर. संचालक : धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील, प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील.
- मे. व्हिक्टोरिया ऍग्रो फूड प्रोसेसिंग. संचालक : संभाजीराव दिलीपराव पाटील.
- जी. एन. ऍग्रो केमिकल्स, सोलापूर. संचालक : शशिकांत बिराजदार (उपमहापौर, नवी मुंबई).
- मे. रॅडरीक एन. व्ही. डिस्टिलरीज. संचालक : पंकजा चारुदत्त पालवे, चारुदत्त पालवे. (गोपीनाथ मुंडे यांची कन्या व जावई).
- मे. मुकुंदराज शुगर मॅन्युफॅक्चरिंग, बीड. संचालक : विमल मुंदडा (माजी आरोग्यमंत्री).
- मे. सिद्धिविनायक एंटरप्रायजेस, कोल्हापूर. संचालक : विनायक सुभाष सोनावणे, विक्रांत सोनावणे.
.......................
ंमुंबई, ता. 14 : धान्यापासून दारू गाळण्याच्या प्रकल्पांना यापुढे परवानगी दिली जाणार नाही, ही गृहमंत्री आर. आर. पाटील यांची घोषणा फसवी आहे. सन 2007 मध्ये सरकारने धान्यापासून दारू गाळण्यास मंजुरी दिली तेव्हा उपमुख्यमंत्रिपदी असणारे आबा मूग गिळून का बसले होते, असा सवाल भीमशक्ती विचार मंचचे अध्यक्ष चेतन कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
धान्याधारीत मद्यार्क योजनेचा लाभ उठविण्यात सत्ताधारी पक्षातील माजी मंत्री, नेते यांचाच पुढाकार असून सत्ताधारी आणि विरोधकांचे धोरण एकाच प्याल्यातले आहे, असा आरोप त्यांनी केला. धान्यापासून दारू गाळण्यास मोठ्या प्रमाणावर सुरवात झाल्यास सर्वसामान्य माणसाच्या तोंडचा घास हिरावला जाईल. सरकारने राज्याची मधुशाला करण्याचे धोरण आखले आहे, अशी चौफेर टीका सरकारच्या निर्णयावर झाल्यानंतर यापुढे धान्यापासून दारू गाळण्याच्या प्रकल्पांना मंजुरी दिली जाणार नाही, असे आर. आर. पाटील यांनी घोषित केले; मात्र आबांचे हे आश्वासन म्हणजे निव्वळ जनतेची दिशाभूल असल्याचा आरोप कांबळे यांनी केला. राज्य मंत्रिमंडळाने सन 2007 मध्ये राज्यात 23 धान्याधारित मद्यार्क प्रकल्पांना मंजुरी दिली असून त्यांना मुक्त हस्ते सबसिडी दिली आहे. तेव्हा आबांना सर्वसामान्यांची आठवण झाली नाही का? त्यांनी त्या वेळी मौन धारण का केले, असे प्रश्न कांबळे यांनी उपस्थित केले.
राज्यात यापूर्वीच सोलापूर, लातूर, अमरावती, सातारा येथे धान्यापासून दारू गाळण्याचे प्रकल्प सुरू आहेत. साधारणतः 25 हजार टन ज्वारीपासून एक कोटी लिटर दारू गाळली जाते. जर सर्वच कारखाने पूर्ण क्षमतेने दारू गाळू लागले तर जनतेला खायला अन्न मिळणार नाही. सडलेल्या धान्यापासून दारू गाळली जाईल, असे सरकारमार्फत सांगितले जात असले, तरी असे किती टन धान्य सडते? या माध्यमातून लोकांना जास्त पैसे मिळाले, तर शेतकरी धान्य दारूसाठी सडवणार नाहीत, याची खात्री कोण देणार? त्यामुळे धान्यापासून दारू गाळण्यास परवानगीच देऊ नये, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.
धान्याधारित मद्यार्क योजनेचा लाभ उठविण्यासाठी सत्ताधारी पक्षातील माजी मंत्री, नेते आणि त्यांचे नातेवाईक आघाडीवर आहेत. विरोधी पक्षही त्यात मागे नाहीत. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे खासदार गोविंदराव आदिक, माजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा पालवे यांच्यासह बड्या नेत्यांचे दारू गाळण्याचे प्रकल्प माहितीच्या अधिकारात उपलब्ध झाल्याचे कांबळे यांनी सांगितले.
हे आहेत प्रकल्पांचे संचालक
- विराज अल्कोहोल ऍण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. कपारी, शिराळा. संचालक : मानसिंग नाईक, रामसिंग नाईक.
- अल्कोप्लस प्रोड्युसर्स प्रा. लि. संचालक : अमित आणि धीरज (विलासराव देशमुख यांचे पुत्र).
- मे. आनंद डिस्टिलरीज, अमरावती. संचालक : आनंद व अभय भमोरे.
- मे. धवल प्रतापसिंह मोहिते-पाटील ऍग्रो इंडस्ट्रीज, सोलापूर. संचालक : धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील, प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील.
- मे. व्हिक्टोरिया ऍग्रो फूड प्रोसेसिंग. संचालक : संभाजीराव दिलीपराव पाटील.
- जी. एन. ऍग्रो केमिकल्स, सोलापूर. संचालक : शशिकांत बिराजदार (उपमहापौर, नवी मुंबई).
- मे. रॅडरीक एन. व्ही. डिस्टिलरीज. संचालक : पंकजा चारुदत्त पालवे, चारुदत्त पालवे. (गोपीनाथ मुंडे यांची कन्या व जावई).
- मे. मुकुंदराज शुगर मॅन्युफॅक्चरिंग, बीड. संचालक : विमल मुंदडा (माजी आरोग्यमंत्री).
- मे. सिद्धिविनायक एंटरप्रायजेस, कोल्हापूर. संचालक : विनायक सुभाष सोनावणे, विक्रांत सोनावणे.
.......................
"व्हीजेटीआय'ला हवाय
मुंबई, ता. 16 : वीरमाता जिजाबाई तंत्रशिक्षण संस्थेचे (व्हीजेटीआय) अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबतचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारला सादर केला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. के. जी. नारायणखेडेकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
"व्हीजेटीआय'ला सन 2004 मध्ये स्वायत्तता मिळाली होती. या कालावधीत संस्थेची कामगिरी समाधानकारक आहे. संस्थेची स्वायत्ततेची पाच वर्षांची मुदत संपली आहे. सहा वर्षांच्या आत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मुदतवाढ अपेक्षित आहे. स्वायत्त विद्यापीठ म्हणून पाच वर्षे काम केल्यावर शिक्षण संस्था "अभिमत विद्यापीठा'चा दर्जा मिळविण्यास पात्र ठरते. "व्हीजेटीआय'ने पात्रता पूर्ण केल्याने अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी संस्थेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिक्षण संस्थेतील प्राध्यापकांची एक समिती हा प्रस्ताव तयार करण्यात गुंतली आहे. हा प्रस्ताव मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकार यांच्यामार्फत विद्यापीठ अनुदान आयोगाला सादर केला जाणार असल्याचे डॉ. नारायणखेडेकर यांनी सांगितले.
व्हीजेटीआय सध्या मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. संस्थेच्या कामकाजाची माहिती मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकारला द्यावी लागते; मात्र अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास व्हीजेटीआयला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदान मिळू शकेल. स्वत:च्या संकल्पना राबविता येतील, शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना स्वत:च्या संस्थेची पदवी देता येईल. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अनुदान मिळाल्याने शिक्षण संस्थेच्या विकासाला वेग येऊ शकेल. राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठ यांचा शिक्षणसंस्थेत थेट हस्तक्षेप राहणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
..............
"व्हीजेटीआय'ला सन 2004 मध्ये स्वायत्तता मिळाली होती. या कालावधीत संस्थेची कामगिरी समाधानकारक आहे. संस्थेची स्वायत्ततेची पाच वर्षांची मुदत संपली आहे. सहा वर्षांच्या आत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मुदतवाढ अपेक्षित आहे. स्वायत्त विद्यापीठ म्हणून पाच वर्षे काम केल्यावर शिक्षण संस्था "अभिमत विद्यापीठा'चा दर्जा मिळविण्यास पात्र ठरते. "व्हीजेटीआय'ने पात्रता पूर्ण केल्याने अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी संस्थेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिक्षण संस्थेतील प्राध्यापकांची एक समिती हा प्रस्ताव तयार करण्यात गुंतली आहे. हा प्रस्ताव मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकार यांच्यामार्फत विद्यापीठ अनुदान आयोगाला सादर केला जाणार असल्याचे डॉ. नारायणखेडेकर यांनी सांगितले.
व्हीजेटीआय सध्या मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. संस्थेच्या कामकाजाची माहिती मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकारला द्यावी लागते; मात्र अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास व्हीजेटीआयला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदान मिळू शकेल. स्वत:च्या संकल्पना राबविता येतील, शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना स्वत:च्या संस्थेची पदवी देता येईल. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अनुदान मिळाल्याने शिक्षण संस्थेच्या विकासाला वेग येऊ शकेल. राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठ यांचा शिक्षणसंस्थेत थेट हस्तक्षेप राहणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
..............
"स्कूल बस'ची नियमावली महिनाभरात लागू
ंमुंबई, ता.17 : स्कूल बसमधून होणारी असुरक्षित व बेकायदा वाहतूक रोखण्यासाठी परिवहन विभागाने तयार केलेल्या प्रस्तावित नियमावलीला येत्या महिनाभरात अंतिम स्वरूप देण्यात येईल. या कालावधीत असुरक्षित वाहतूक करणाऱ्यांची व त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची गय केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे परिवहन आयुक्त दीपक कपूर यांनी "सकाळ'शी बोलताना दिला.
स्कूल बसमधून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असुरक्षित व बेकायदा वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने स्कूल बससाठी काटेकोर नियमावली तयार केली आहे. यामुळे स्कूल बस म्हणून कालबाह्य झालेल्या गाड्या वापरणारे स्कूल बसचालक, असुरक्षित वाहतूक आणि त्याकडे कानाडोळा करणाऱ्या शाळांना चाप बसणार आहे. गेल्या काही महिन्यांत स्कूल बसला झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुढाकार घेऊन नवी नियमावली तयार केली आहे. मुंबई, पुणे येथे पालक शाळा, स्कूल बसचे मालक, चालक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या नियमावलीबाबत सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या.
येत्या 21 डिसेंबरला नागपूर येथे शेवटची बैठक होणार आहे. त्यानंतर स्कूल बसबाबतच्या नियमावलीला अंतिम स्वरूप देऊन तिची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे कपूर यांनी सांगितले.
दरम्यान स्कूल बसमधून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकडे परिवहन विभागाची करडी नजर आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. अपघात झाल्यास जबाबदार
असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
............
स्कूल बसमधून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असुरक्षित व बेकायदा वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने स्कूल बससाठी काटेकोर नियमावली तयार केली आहे. यामुळे स्कूल बस म्हणून कालबाह्य झालेल्या गाड्या वापरणारे स्कूल बसचालक, असुरक्षित वाहतूक आणि त्याकडे कानाडोळा करणाऱ्या शाळांना चाप बसणार आहे. गेल्या काही महिन्यांत स्कूल बसला झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुढाकार घेऊन नवी नियमावली तयार केली आहे. मुंबई, पुणे येथे पालक शाळा, स्कूल बसचे मालक, चालक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या नियमावलीबाबत सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या.
येत्या 21 डिसेंबरला नागपूर येथे शेवटची बैठक होणार आहे. त्यानंतर स्कूल बसबाबतच्या नियमावलीला अंतिम स्वरूप देऊन तिची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे कपूर यांनी सांगितले.
दरम्यान स्कूल बसमधून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकडे परिवहन विभागाची करडी नजर आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. अपघात झाल्यास जबाबदार
असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
............
Subscribe to:
Comments (Atom)